भाजपशी युतीसाठी घाई नाही : उध्दव ठाकरे

0
78

महाराष्ट्रात भाजपशी युती करण्याची शिवसेनेला घाई नसून या संदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल असे वक्तव्य शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी काल येथे केले. विधानसभा निवडणुकानंतर ठाकरे काल येथे आले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केले. टोलविरोधी आंदोलनाची सुरुवात कोल्हापूरमध्ये झाल्याने राज्यातील नवीन सरकारने कोल्हापूरला टोलमुक्त करावे अशी मागणीही त्यानी केली. केंद्र सरकारने बेळगावचे नामकरण बेळगावी असे करण्यास मान्यता दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.