भ्रष्टाचारी आणि तत्त्वहीन कॉंग्रेसला पर्याय म्हणून केवळ राष्ट्रीय व सामाजिक विचारसरणी व तत्त्वांकडे मोहित होऊन, एक तत्त्वनिष्ठ पक्ष म्हणून भाजपकडे वळलेल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा बळी देण्याच्या भाजपच्या या कृतीने, सगळ्यांचा भ्रमनिरास केलेला आहे. भाजपचे कॉंग्रेसीकरण आता पूर्ण झालेले आहे अशी कडवट प्रतिक्रिया भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केली आहे.