बिहार, झारखंडमध्ये दोघा पत्रकारांची अज्ञांताकडून हत्या

0
85

बिहारमधील एक वरिष्ठ पत्रकार व झारखंडमधील एक टीव्ही रिपोर्टर मिळून काल दोघा पत्रकारांना अज्ञातांनी गोळ्या घालून ठार केले. या हत्यांचा बिहारमध्ये पत्रकारांना तीव्र निषेध केला. बिहारच्या सिवान जिल्ह्यात ‘हिंदुस्तान’ या हिंदी दैनिकाचे वरिष्ठ पत्रकार राजदेव रंजन हे काल संध्याकाळी आपल्या मोटरसायकलवरून जात असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या घातल्या. इस्पितळात नेताना ते मरण पावले. झारखंडमधील एका वृत्त वाहिनीचे रिपोर्टर अखिलेश प्रताप सिंग (३५) यांनाही अज्ञातांनी गोळ्या घालून ठार मरण्यात आले. मुख्यमंत्री रघुबार दास यांनी या घटनेचा निषेध केला आहे.