दिल्लीत जंगलराज ः केजरीवाल

0
91

दिल्लीत सध्या पूर्ण जंगलराज निर्माण झाले असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. राज्यातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण आणण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व नायब राज्यपाल नजीब जंग यांना अपयश आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

रविवारी ईशान्य दिल्लीतील ब्रह्मपुरी भागात ५० वर्षीय महिला व तिच्या दोन मुलांचा खून झाल्याच्या अनुषंगाने बोलताना केजरीवाल यांनी ही टीका व आरोप केला आहे.
दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान आणि नायब राज्यपाल यांनी काही तरी करावे असे आवाहन त्यांनी केले.
दिल्ली पोलीस केंद्रीय गृह खात्याखाली असल्याने कायदा व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांना दिल्ली सरकार खाली आणावे अशी मागणी आम आदमी पक्ष करीत आहे. दिल्ली पोलिसांना आपल्या अधिकाराखाली आणता यावे यासाठी दिल्ली सरकारने दिल्लीला राज्य दर्जा देणार्‍या विधेयकाचा मसुदा जारी केला होता.