देशभरात पुन्हा एकदा अचानक वातावरणात मोठा बदल झाल्याचे दिसून येत असून भारतीय हवामान खात्याकडून देशातील जवळजवळ 17 राज्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच दक्षिण व उत्तर भारतातील राज्यांचा समावेश आहे.
उत्तर भारतासह दक्षिण भारतातही या बदलत्या हवामानामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून देशातील जवळपास 17 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण भारतातही पाऊस
दक्षिण भारतामध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.