गोवंश रक्षा समिती देणार राजकारण्यांना इशारा

0
114

संबंधित ठराव आज संमत करणार
पणजी (प्रतिनिधी): गोवंशाच्या रक्षणाच्या बाबतीत सत्ताधारी तसेच विरोधी राजकारण्यांना इशारा देण्यासंबंधीचे महत्वाचे ठराव आज संमत करणार असल्याचे गोरक्षा समितीचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी सांगितले. ईद असो किंवा फेस्त असो. त्यांच्या नावाखाली गुरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होते. ती पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीसाठी गोरक्षा समितीने शनिवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. गोवंशाच्या रक्षणासाठी समाजात जागृती निर्माण करणार असे परब यांनी सांगितले. काल आझाद मैदानावर पंचकुडी गायित्री महायज्ञ करण्यात आला. गोहत्त्या बंद करण्यासाठी आमदार, मंत्र्यांना चांगली बुध्दी देवो, यासाठी वरील महायज्ञ केल्याचे परब यांनी सांगितले. गायित्री परिवाराचे अध्यक्ष लक्ष्मण जोशी यांनी मार्गदर्शन केले. भारत स्वाभिमानचे कमलेश बांदेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश गाडगीळ, हिंदू जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोळुंके, गोप्रेमी बाप्तीश डायस आदींची भाषणे झाली. कामधेनू योजनेसाठी देशी गायींचा वापर करण्याची जोरदार मागणी वक्त्यांनी केली.