कोरोनाने कालही बळी नाही

0
247

काल शुक्रवारी राज्यात कोरोनाबाधित नवे १०४ रुग्ण सापडल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३५ एवढी झाली आहे. तसेच राज्यात काल एकाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही. कोरोनामुळे राज्यात बळींची संख्या ७०३ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाचा संसर्ग झालेले राज्यात कोरोनाचे सध्याचे रुग्ण ११८७ एवढे आहेत अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

काल दिवसभारत १३० जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची राज्यातील संख्या ४७ हजार ३४५ झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१६ टक्के एवढे आहे. काल खात्यातर्फे १६४४ स्वॅबची चाचणी करण्यात आली.