कोरोनाने एकही बळी नाही

0
93

काल गुरूवारी राज्यात कोरोनाबाधित ९५ रुग्ण सापडले असून एकाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही. कोरोनामुळे राज्यात बळींची संख्या ७०३ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनाचा संसर्ग झालेले ९५ रुग्ण सापडले असून राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार १३१ एवढी झाली आहे. राज्यात कोरोनाचे सध्याचे रुग्ण १२१३ एवढे आहेत अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

काल दिवसभारत १५९ जण कोरोनामुक्त झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची राज्यातील संख्या ४७ हजार २१५ झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१० टक्के एवढे आहे.
आतापर्यंत ३,६६,१७४ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या १३,७१७ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २५,४९१ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.