काश्मीरी युवकांच्या हाती लॅपटॉप हवा : मोदी

0
103

प्रत्येक भारतीय हा काश्मीरवर प्रेम करत असून, प्रत्येक भारतीयाची काश्मीरला जायची इच्छा आहे. विकासाच्या माध्यमातून आम्ही काश्मीर मुद्द्याचे समाधान शोधत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंगळवारी म्हटले.

मध्यप्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यान मोदी बोलत होते. पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, काश्मीरसह भारतातील प्रत्येकाला स्वातंत्र असून, काश्मीरी युवकांचे आयुष्य प्रकाशमय करायचे आहे, काश्मीरमधील युवकांच्या हातात दगडांऐवजी लॅपटॉप अथवा क्रिकेटची बॅट असावी. जम्मू-काश्मीरमध्ये आम्हालाही बदल हवा आहे. काश्मीरी नागरिकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. प्रत्येक समस्येवर आम्ही तोडगा शोधत आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये काहीजण दिशाभूल करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, सरकार वातावरण शांत करत आहे. कोणताही विषय हा चर्चेने सुटू शकतो, असेही मोदी म्हणाले.