तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन

0
3

भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश पाल यांना दिवसभर अस्वस्थ वाटत होते, यामुळे त्यांना राजीव गांधी जनरल इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि अँजिओ टेस्ट करण्यास सांगितले होते. मात्र त्यांना वाचवता आले नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, ते एक सक्षम आणि वचनबद्ध अधिकारी होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताची सागरी सुरक्षा मजबूत करण्यात मोठी प्रगती करत असल्याचे सांगून श्रद्धांजली वाहिली. राजनाथ सिंह यांनी काल चेन्नईत तटरक्षक दलाच्या सागरी बचाव आणि समन्वय केंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. महासंचालक राकेश पाल हे समारंभाचे सूत्रसंचालन करण्यासाठी चेन्नईत होते.