राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. मात्र ८० जणबाधित सापडले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत ९५ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९३५ असून मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३१९१ आहे.
गेल्या चोवीस तासांत राज्यात ५६४२ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७३,६०६ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्क्यांवर पोहोचले आहे. इस्पितळांतून काल ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
९५ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत कोरोनामुक्त झालेल्याची संख्या ९५ असून सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६९,४८० एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १४ जणांना भरती करण्यात आले. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ६६ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. राज्यात आतापर्यंत ११,८९,१७२ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.