>> गाड्यांतील व स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना
रेल्वे स्थानके आणि गाड्यांमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे प्रशासन एक नवीन योजना अमला आणण्यात येणार आहे. रेलगाड्यातील जागांच्या क्षमतेनुसारच तिकिटे दिली जाणार आहेत. ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा फक्त काही टक्के जास्त तिकिटे विकली जातील. ही व्यवस्था राखीव आणि सामान्य श्रेणीतील तिकिटांसाठी लागू असेल. सामान्य तिकिटांसाठी, ही मर्यादा निश्चित जागांच्या दीडपट असेल, म्हणजेच फक्त मर्यादित प्रवासीच बोगीमध्ये प्रवास करू शकतील.
तिकिटे ट्रेननुसार विकली जाणार आहेत. म्हणजे प्रवाशांना ज्या ट्रेनमधून प्रवास करायचा आहे तो क्रमांक जनरल तिकिटावर नमूद केला जाईल. सध्या या तिकिटांवर ट्रेनचा क्रमांक नसतो. जनरल डब्यातील प्रवाशांची संख्या निश्चित नसल्याने क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे अशा डब्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढतात व त्यामुळे डब्यांमध्ये गर्दी दिसून येते. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी रेल्वेची ही योजना आहे.
पुढील 4 ते 6 महिन्यांत प्रणाली
स्टेशन मॅनेजरला तिकिटांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देण्याची तयारी सुरू आहे. एकूण गाड्यांची संख्या आणि त्यांच्या प्रवासी क्षमतेनुसार तिकीट विक्री थांबवू शकेल असा अधिकार त्याला देण्यात येणार आहे. जनरल तिकिटांमध्ये आणखी एक सुविधा जोडता येईल. ही प्रणाली पुढील 4 ते 6 महिन्यांत पूर्णपणे लागू केली जाईल. प्रवासाच्या 24 तास आधी तिकीट खरेदी करून प्रवासी कोणत्याही ट्रेनने त्यांच्या गंतव्यस्थानावर जाऊ शकतात. त्यांच्या विक्रीवरही कोणतेही बंधन नाही. गंतव्यस्थानावर जाणारी ट्रेन कोणतीही असो, जोपर्यंत प्रवासी सामान्य तिकिटे मागतो तोपर्यंत रेल्वे त्यांना देईल, परंतु नवीन प्रणालीमध्ये त्यांची संख्या मर्यादित अशी माहिती देण्यात आली आहे.
गर्दीमुळे चेंगराचेंगरी
15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. या काळात प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असूनही, रेल्वे प्रतितास 1500 तिकिटे देत असल्याचे उघड झाले. प्रयागराजला जाणाऱ्या फक्त 5 गाड्या होत्या. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
3 ते 4 पट अधिक प्रवासी
सध्या, अमर्यादित जनरल तिकिटे विकली जातात. यामुळे, प्रत्येक ट्रेनमध्ये सामान्य बोगीच्या बसण्याच्या क्षमतेपेक्षा 3 ते 4 पट जास्त प्रवासी प्रवास करतात. यामुळे स्थानके आणि प्लॅटफॉर्मवर नेहमीच गर्दी असते. सणांच्या काळात अनेक प्रवासी शौचालयात उभे राहून प्रवास करतात. सध्या, ऑनलाइन आणि काउंटरवरून किती तिकिटांची विक्री झाली आहे याची प्रत्यक्ष माहिती नसते, मात्र या नवीन प्रणालीमध्ये हा डेटा उपलब्ध असेल.