मुंबई विमानतळावर टळला दोन विमानांचा अपघात

0
5

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी मोठा अपघात टळला. यावेळी एकाच धावपट्टीवर दोन विमाने एकत्र दिसली. इंडिगोचे विमान धावपट्टीवर उतरत होते, तर त्याच्या पुढे एअर इंडियाचे विमान टेक ऑफ करण्याच्या तयारीत होते. मात्र, दोन्हीही विमानांनी एकमेकांना टक्कर देणे टाळले. या प्रकरणाला उत्तर देताना नागरी विमान वाहतूक संचालनालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. इंडिगोचे विमान दिल्लीला आणि एअर इंडियाचे विमान तिरुवनंतपुरमला जाणार होते. एअर इंडियाचे विमान मुंबई ते तिरुवनंतपुरम या उड्डाणासाठी सज्ज होते. दरम्यान, इंडिगोचे विमानही याच धावपट्टीवर उतरताना दिसले. इंडिगोचे हे विमान इंदौरहून दिल्लीला जात होते. लँडिंग आणि टेक ऑफ झाले, त्याचवेळी विमानतळावर धोकादायक स्थिती निर्माण झाली होती व त्यामुळे मोठा अपघात होऊ शकत होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.