मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

0
4

>> विरोधकांच्या मागणीला अखेर यश

गृहमंत्रालयाने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार झाला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या काही दिवसांतच राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंग यांनी मणिपूरमध्ये तब्बल 21 महिने जातीय हिंसाचार सुरू राहिल्यानंतर राजीनामा दिली होता. मणिपूरमधील हिंसाचारात जवळपास 200 हून अधिक जणांचा मृ्‌‍त्यू झाला आहे तर हजारो लोक विस्थापित देखील झाले आहेत. मणिपूरमध्ये मे 2023 पासून मेतेई आणि कुकी-झो समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे.

मणिपूरमध्ये यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार होते. नोव्हेंबर 2024 मध्ये, कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) ने एन. बिरेन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेस आणि इतर राजकीय विरोधकांकडून सातत्याने केली जात होती.