पवनहंस हेलिकॉप्टर कंपनीही सापडली आर्थिक संकटात

0
108

>> कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत

कगङ्गिशर आणि जेट एअरवेजनंतर आता पवनहंस ही हेलिकॉप्टर कंपनीही आर्थिक संकटात सापडली आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली असून आता कंपनीकडे कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. सन २०१८-१९ मध्ये कंपनीला सुमारे ८९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्जही आहे. अशा परिस्थितीत कंपनीकडे एप्रिल महिन्याचे पगार देण्याचीही आर्थिक परिस्थिती नाही. सरकारने गेल्या वर्षी पवनहंस विकण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, कंपनीच्या स्थितीला कंपनीच जबाबदार असल्याचे म्हणत कर्मचार्‍यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी दर्शवलेली आहे.

कंपनीची स्थिती बिघडण्यामागे रोहिणी हेलिपोर्टवर खर्च करण्यात आलेले सुमारे १२५ कोटी रुपये हे देखील एक कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हे हेलिपोर्ट सुरुवातीचे काही दिवस चालले, मात्र नंतर ते शटडाउन केले गेले. यातून कंपनीला एका रुपयाचाही ङ्गायदा झालेला नाही.

पवनहंसला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे मार्ग शोधले जात असून त्याचाच एक भाग म्हणून पवनहंसने कॉस्ट कटिंगही सुरू केले आहे.