>> पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये 24 तासांत दोन वेळा झाली बैठक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानमंतर संपूर्ण देशात संतापाची लाट असून, या हल्ल्याला जशात तसे उत्तर द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 24 तासांत दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली. या बैठकीत राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्याच्या तयारीची पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताची भूदल, नौदल आणि वायूदल अशी तिन्ही दले सज्ज आहेत, असे राजनाथ सिंह यांनी बैठकीत पंतप्रधानांना सांगितले. त्यामुळे आता पुढे नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर पाकिस्तानवर कठोर निर्बंध घातले आहेत. प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारताविरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 24 तासांत काल दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रविवारी रात्री पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीला फक्त राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटे चर्चा
झाली होती.
पहलगाम हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख म्हणजेच सीडीएस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. त्यामुळे बैठकीत मोठी रणनीती ठरल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांची पंतप्रधानांसोबत 40 मिनिटे चर्चा झाली.
‘त्या’ दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागेना
भारतीय सैन्याकडून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागू शकलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या एकूण दहशतवाद्यांपैकी तीन दहशतवादी हे पाकिस्तानातील आहेत. त्यातील एक दहशतवादी हा स्थानिक आहे. या सर्वांचाच भारतीय सैन्याकडून शोध घेतला जात आहे.
26 राफेल-एम विमानांसाठी करार
पहलगाम हल्ल्यानंतर तणावाच्या वातावरणात भारताने संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा एक मोठा करार रेला आहे. कल भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल-एम विमानांसाठी तब्बल 63 हजार कोटी रुपयांचा करार झाला. या करारांतर्गत भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून 26 राफेल मरीन विमाने खरेदी केली जाणार आहेत. या कारारावेळी भारताचे प्रतिनिधित्व संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी केले. यावेळी नौदलाचे उपप्रमुख ॲडमिरल के. स्वामिनाथन हे सुद्धा उपस्थित होते.