जवानांमुळे भारताची सीमा मजबूत ः मोदी

0
13

>> हिमाचल प्रदेशमध्ये जवानांसोबत पंतप्रधानांनी साजरी केली दिवाळी

आमच्या जवानांना नेहमीच या शूर वसुंधराचा वारसा आहे. त्यांच्या छातीत ती आग आहे ज्याने नेहमीच शौर्याचे उदाहरण निर्माण केले आहे. आपले सैनिक जीव धोक्यात घालून नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. जवान हे सीमेवरील देशाची सर्वात मजबूत भिंत असल्याचे आपल्या सैनिकांनी नेहमीच सिद्ध केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हिमाचल प्रदेशमध्ये सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी यंदाही दिवाळीचा सण सैनिकांसोबत साजरा करताना हिमाचल प्रदेश येथील लेपचा येथे जाऊन सैनिकांसोबत उत्सवाचा आनंद लुटला. पंचप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते दरवर्षी दिवाळी सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत साजरी करतात. यंदा त्यांनी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या जवानांना, तुम्ही उत्साहाने आणि उर्जेने भरलेले आहात. 140 कोटी लोकांचा हा मोठा परिवार तुमचा असल्याचे तुम्ही मानता. देश तुमचा ऋणी आहे. दिवाळीच्या काळात तुमच्या कल्याणासाठी दिवाही लावला जातो. जिथे राम आहे तिथे अयोध्या आहे. माझ्यासाठी आमचे सैन्य ज्या ठिकाणी तैनात आहे ते मंदिरापेक्षा कमी नाही. तुम्ही जिथे आहात त्याच ठिकाणी माझा सण असल्याचे सांगितले. समाधान आणि आनंदाने भरलेला हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि देशवासीयांसाठी दिवाळीत नवीन प्रकाश घेऊन येईल. हा माझा विश्वास आहे.
दरम्यान, दीपावली उत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

दरवर्षी जवानांसोबत दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर 2014 मध्ये त्यांनी सियाचीन ग्लेशियर, 2015 मध्ये पंजाबमधील अमृतसर, 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौर आणि 2017 मध्ये काश्मीरमधील गुरेझ येथे 2018 मध्ये, पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये, 2019 मध्ये जम्मू विभागातील राजौरीमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी 2020 मध्ये राजस्थानमधील जैसलमेर, 2021 मध्ये राजौरी जिल्ह्यातील नौशहरा आणि 2022 मध्ये कारगिलमध्ये दिवाळी साजरी केली.