शेतकर्‍यांचे आता जंतर मंतरवर आंदोलन

0
90

कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकर्‍यांनी गुरुवारी जंतर मंतरकडे आपला मोर्चा वळवला आहे. जंतरमंतरवर आंदोलन करण्याची रितसर परवानगी शेतकर्‍यांना दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन राजधानी दिल्लीत सुरू असताना शेतकरी जंतर मंतरवर किसान संसद भरवणार आहेत. यामध्ये भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हेदेखील सहभागी होणार आहेत. शेतकरी नेते राकेश टिकैत सिंघु सीमेकडे रवाना झाले आहेत. आम्ही संसदेच्या कामकाजावरही लक्ष ठेवून असल्याचे टिकैत यांनी सांगितले.