लखीमपूर खीरी हत्याकांड; कॉंग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन

0
54

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरणी कॉंग्रेसने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. लखीमपूर हिंसाचारप्रकरणी तपशीलवार तथ्य सादर करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या सात सदस्यीय शिष्टमंडळाच्या नेमणुकीची मागणी करणारे एक निवेदन कॉंग्रेसने राष्ट्रपतींना दिले आहे.

कॉंग्रेसच्या या शिष्टमंडळात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार ए. के. अँटनी, खासदार मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी, खासदार के. सी. वेणुगोपाल आणि खासदार अधीर रंजन चौधरी या नेत्यांचा समावेश असेल असे निवेदनात म्हटले आहे.