रिवणात नारळ चोरीप्रकरणी १९ जणांना अटक

0
120

केरी-रिवण येथे जमिनीत घुसखोरी करून नारळ काढल्याच्या तक्रारीवरून केपे पोलिसांनी १९ जणांना अटक केली. दि. १७ मार्च रोजी आपल्या रिवण येथील बागायतीत घुसून वीस हजार नारळ तोडल्याची व आपल्या मजूरांना धमकावल्याची तक्रार प्रभात प्रभाकर पै वेर्णेकर यांनी केपे पोलिसांत नोंदवली होती त्याला अनुसरून केपे पोलिसांनी कारवाई केली.वेर्णेकर यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावर वेळीप गटाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळल्यावर पोलिसांनी १९ जणांना अटक केली.
अटक केलेल्यांमध्ये रोहिदास वेळीप, सुधाकर वेळीप, विनायक वेळीप, तुळशीदास वेळीप, लक्ष्मण वेळीप, अंकुष वेळीप, जानू वेळीप, बोमो वेळीप, रामा वेळीप, महेश वेळीप, महेंद्र वेळीप, दयावती वेळीप, शिरपुटो वेळीप, दत्ता वेळीप, कृष्णा वेळीप, आनंद वेळीप, भास्कर वेळीप, राजीव वेळीप यांचा समावेश आहे. तर वेळीप गटाने सदर जमीन आपली असल्याचा दावा केला आहे.