या १० राज्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवल्यास जिंकलो

0
183

>> पंतप्रधानांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ही राज्ये आज देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्ये आहेत. यावेळी पंतप्रधानांनी या १० राज्यांनी जर कोरोनावर नियंत्रण मिळवले तर देश ही कोरोनाविरोधातील लढाई जिंकेल असे सांगितले. यावेळी मोदी यांनी, करोनावर मात करण्यासाठी काही मार्गदर्शनही केले.

जर या दहा राज्यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले तर देश ही लढाई जिंकेल. कोरोनाच्या केसेसचे ७२ तासांमध्ये अहवाल, जास्तीजास्त चाचण्या यामुळे आपण या महामारीवर मात करू शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.

देशात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी सर्वाधिक या दहा राज्यांमध्ये आहेत. यासाठी आम्ही आज समिक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या या चर्चेतील एकमेकांच्या अनुभवातून खुप काही शिकण्यास मिळाले असून एक बाबही लक्षात आली. जर या दहा राज्यांना कोरोनावर मात करण्यास यश मिळाले तर आपला देश ही लढाई जिंकू शकेल, असे मोदी यावेळी म्हणाले.