महाराष्ट्रात अनलॉक नाहीच; निर्बंध कायम

0
46

महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये अनलॉकची घोषणा केली. शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे देखील जाहीर केले; मात्र त्यानंतर काही तासांतच महाराष्ट्र सरकारने अनलॉकचा निर्णय अद्याप झालेला नसून, प्रस्ताव विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले आहेत.

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थांबलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा नाही, हे निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत, महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे असे आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.