मद्य विक्री बंद केल्यास १ लाख रुपये मिळणार

0
17

बिहारमध्ये दारू बंदी कायद्याच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी बिहार मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मद्य विक्री करणे सोडल्यास गरीब कुटुंबांना सरकारकडून एक लाखाचे आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. ताडीचा व्यवसाय करणार्‍यांसाठीही ही योजना लागू असणार आहे. दारू आणि ताडीचा व्यवसाय करणार्‍या गरीब कुटुंबांच्या पूनर्वसनासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांना नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिहार सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर या योजनेला मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती आणि जमातींमधील कुटुंबीयांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. एप्रिल २०१६ मध्ये बिहारमध्ये दारू बंदी कायदा लागू करण्यात आला आहे.