न्यायालयाने लोकशाही वाचवली : कामत

0
69

साखळी पालिकेत नगराध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा जो दारुण पराभव शुक्रवारी झाला त्यावरून राज्यात भाजप सरकारचा शेवट जवळ आला असल्याचे संकेत असून उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा लोकशाही वाचवल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

विजय हा शेवटी सत्याचाच होत असतो याचे दर्शन काल पुन्हा एकदा घडले. मुख्यमंत्र्यांनी आपला पराभव रोखण्यासाठी सगळे प्रयत्न केले. पण त्यात त्यांना अपयश आल्याचे कामत म्हणाले. आपले घटनात्मक हक्क अबाधित ठेवण्यासाठी लोकांना न्यायालयात धाव घ्यावी लागते हे दुर्दैवी असल्याचे सांगून न्यायालयाने योग्य असा निवाडा दिल्याने लोकांचा न्यायपालिकेवरील विश्‍वास वृद्धिंगत होण्यास मदत झाली असल्याचे ते म्हणाले.