नवीन वाहतूक कायदा निवडणुकीनंतर अंमलात

0
85

नव्या वाहतूक कायद्याची अंमलबजावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्यात या कायद्याची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीनंतर अर्थात एप्रिल २०२२ पासून होणार असल्याची माहिती वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी काल दिली.
नवीन वाहतूक कायद्याची एप्रिल २०२२ पासून अंमलबजावणी करण्याबाबत अनौपचारिक निर्णय घेतला आहे. या संदर्भातील फाईल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पाठवण्यात आली आहे, असे मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले.