दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद

0
261

म्यानमार सीमेनजिक असलेल्या मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे तीन जवान शहीद झाले. पीपल्स लिबरेशन आर्मी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून, यात सहा जवानही गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी आधी आयईडीचा स्फोट घडवून आणला. त्यानंतर जवानांवर बेछूट गोळीबार केला. यानंतर लष्कराने परिसरात शोधमोहीम हाती घेतली आहे. आसाम रायफल्सची तुकडी सीमेलगत असलेल्या खोंगटाळ येथील त्यांच्या छावणीवर जात होती. त्यावेळी आयईडीचा भयंकर स्फोट झाला. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.