तमिळनाडू येथे पावसामुळे चार मृत्यू, अनेक घरांची हानी

0
24

तमिळनाडूत मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांत चार जणांचा मृत्यू झाला. तसेच १६ गुरे वाहून गेली व ६० हून अधिक घरांचे नुकसान झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. पावसामुळे अनेक धरणांतून पाणी सोडण्यात आले असून महामार्गाना नद्यांचे स्वरूप आले आहे. पुंडी, चोलावरम, पुझल, चेंबरमबक्कम ऐआणि थेरवी कंडीगाई आदी धरणांतून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. चेन्नईतील अनेक भागांत दोन फुटांहून अधिक पाणी साचले होते.