चोेवीस तासांत कोरोनाने तिघांचा मृत्यू, १०५ बाधित

0
63

कोविडमुळे काल राज्यात तिघाजणांचा मृत्यू झाला. तर कोरोनाचा संसर्ग झालेले १०५ नवे रुग्ण काल राज्यात सापडले. त्यामुळे कोविडमुळे राज्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता ३२०१ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १,७३,९५८ एवढी झाली आहे.

काल १०८ जण कोविडमुक्त झाल्याने त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १,६९,८७७ एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णसंंख्या आता ८७७ एवढी आहे. काल नव्याने ५३०४ जणांशी कोरोनासाठी चाचणी करण्यात आल्याने आतापर्यंत राज्यात करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या १२,०८ ८१७ एवढी झाली आहे.