खाण घोटाळाप्रकरणी सरकारवर सरदेसाई यांची जोरदार टीका

0
96

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी समाज माध्यमावर टाकलेल्या एका व्हिडिओतून राज्यात झालेल्या ३५ हजार कोटी रु.च्या खाण घोटाळ्यासंबंधी राज्य सरकारला कित्येक प्रश्‍न विचारले आहेत. बेकायदा खाण घोटाळ्यातील पैसे वसूल करून घ्यावेत असा आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिला. त्याला आता कित्येक वर्षे झाली असे सांगून २०१२ ते २०२१ पर्यंत सरकारने किती पैसे वसूल केले याची माहिती द्यावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे. राज्यात १३६ खाणी असून ३५ हजार कोटी रु.चा घोटाळा झाल्याचा दावा भाजपनेच विरोधी बाकांवर असताना केला होता. मात्र, २०१२ साली सत्तेवर आलेल्या भाजपने आतापर्यंत खाण घोटाळ्यातील एकही पैसा वसूल केला नसल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. न्यायाला विलंब म्हणजे न्याय देणे टाळणे होय, असेही सरदेसाई यांनी सदर व्हिडिओतून स्पष्ट केलेे आहे.