खाण कामगार मंचचा आरोप
राज्यातील खाणबंदीचा दि. १८ रोजी होणार्या जिल्हा पंचायत निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून एका आठवड्यात खाणीसाठीचे पर्यावरण दाखले मिळविण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जनतेला गाजर दाखविल्याचा आरोप खाण कामगार मंचचे निमंत्रक ऍड. सुहास नाईक यांनी केला आहे.यापूर्वीही भाजप सरकारने अशीच आश्वासने देऊन खाण कामगारांची फसवणूक केली होती. निवडणूक झाल्यानंतर या आश्वासनालाही सरकार हरताळ फासेल, असे नाईक यांनी सांगितले. आता जनता मंत्र्यांना प्रश्न विचारू लागली आहे. सध्याचे भाजप सरकार कामगारविरोधी आहे. १०८ रुग्णवाहिका कामगार, सुरक्षा रक्षक रस्त्यावर उतरले आहेत.