शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 अंतर्गत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणासाठी जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) पाठवण्याचे निर्देश
दिले आहेत.
यासंबंधीचे परिपत्रक शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी काल जारी केले. राज्यात तिसरी, सहावी, नववी आणि दहावीसाठी एनईपी 2020 लागू केले आहे. एनईपी 2020 अंतर्गत व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणावर भर दिला जात आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे कोणत्या शैक्षणिक क्षेत्राकडे वळले याचीही नोंद ठेवावी. विद्यालयातील मुलांना आयटीआय केंद्रात पाठविण्यासाठी बालरथ गाड्यांचा वापर केला जाऊ शकतो, असेही शिक्षण संचालकांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.