केंद्र सरकारकडून रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

0
333

शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने काल रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतींत क्विंटलमागे ५० रू. ते ३०० रू. वाढ घोषित केली. लोकसभेत कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ही घोषणा केली. गव्हाचा किमान दर ५० रुपयांनी वाढणार असून चण्याला २५० रुपयांची, तर मसूरला ३०० रुपयांची वाढ मिळेल.