एक-दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध ः तानावडे

0
180

राज्यात वाढू लागलेल्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी येत्या एक दोन दिवसांत आवश्यक ते कडक निर्बंध घालण्यात येतील अशी माहिती काल भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

राज्यात पूर्णपणे टाळेबंदीची शक्यता त्यांनी नाकारली. मात्र कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन लोकांवर कडक निर्बंध घालण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने एकूण परिस्थिती भयावह आहे. या पार्श्‍वभूमीवर आता लोकांवर कडक निर्बंध घालावेच लागणार असल्याचे तानावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. मोठ्या जमावावर बंदी घालण्यात येणार असून त्या संबंधी येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मात्र यावेळी त्यांनी पालिका निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.