उसगाव येथील गोवा मांस प्रकल्प प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणी पूर्ण करून निवाडा राखून ठेवला आहे. या निवाड्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गोवंश सुरक्षा समितीने बाहेरून गुरे आणून मारण्यास बंदी घालण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला आहे.
मांस विक्री करणार्या व्यापार्यांनी न्यायालयाने गुरे मारण्यास दिलेली स्थगिती उठविण्याची मागणी करणारा अर्ज केला आहे.