सांतआंद्रेतील काही कार्यकर्त्यांनी काल आझाद मैदानावर येऊन वरील घटनेचा निषेध करून सरकार विरोधात घोषणा दिल्या. काल संध्याकाळपर्यंत भाजपच्या एकाही आमदाराने तसेच पदाधिकार्यांने वाघ यांची चौकशी केली नाही.
पर्रीकर यांच्यावर विश्वास ठेवून प्रथमच सांतआंद्रेतून भाजप उमेदवार निवडून दिला, असे कायादो यांनी सांगितले. भाजपने तेथील जनतेचा विश्वासघात केल्याचे कायादो यांनी सांगितले.