अर्थसंकल्पातील घोषणांसाठी प्रस्ताव तयार करण्याची अधिकाऱ्यांना सूचना

0
3

मुख्यमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

राज्य अर्थसंकल्पीय आश्वासनांची जलदगती आणि सुव्यवस्थितीकरण अंमलबजावणी आणि केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणांसाठी प्रस्ताव तातडीने तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारी योजनांच्या अंमलबजावणी आणि अर्थसंकल्पीय अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव आणि सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक पर्वरी येथे काल घेतली. या बैठकीत अंमलबजावणी सुव्यवस्थित करण्यावर आणि नागरिकांना प्रभावी सेवा देण्यावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. केंद्रीय अर्थसंकल्पीय घोषणेतील प्रस्ताव प्राधान्यक्रमाने तयार झाले पाहिजेत. एप्रिल अखेरपर्यंत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकारी योजनांची अंमलबजावणी सुव्यवस्थित करणे आणि सार्वजनिक सेवांचे वितरण सुधारणे यावरही लक्ष केंद्रित करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच, आगामी नीती आयोगाच्या बैठकीच्या तयारीचाही आढावा घेण्यात आला, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.