September 2011

दसरा सण मोठा

- अजित पैंगीणकर

नऊ दिवस चालणारा हिंदूंचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस दुर्गा देवीचा उत्सव असतो. त्याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. दुर्गा किंवा काली ही ज्या प्रमाणे ब्राह्मणांची कुलदेवता आहे, त्याप्रमाणे अनेक क्षत्रियांचीही ती कुलदेवता आहे. देवीच्या देवळातूनही सार्वत्रिक रीतीने हा उत्सव केला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना होते. लहानशा मातीच्या ढिगार्‍यावर गहू पेरून त्यावर मातीचा घट ठेवतात. घटावर देवीची स्थापना करतात. नऊ दिवस देवीचे पूजन करतात. रोज माळ घालणे, कुमारीचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, ब्राह्मण सुवासिनींना भोजन घालणे, हे आचार विविध कुळात पाळले जातात.

ऐतिहासिक पारगड किल्ला

- चंद्रकांत रामा गावस

सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुका आहे. चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला मोडतो. चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि. मी. अंतरावर निसर्गरम्य तिळारी प्रकल्पापासून पुढे कोल्हापूर - सिंधुदुर्ग सीमेवर ऐतिहासिक पारगड किल्ला आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस. टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्‍यांपर्यंत जाते. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा ऐतिहासिक किल्ला पाहणे पर्यटकांसाठी एक दुग्धशर्करायुक्त योग आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ या दृष्टिकोनातून या किल्ल्याचे जतन व विकास करावयास प्रारंभ केला आहे.

पार्से गावची श्री देवी भगवती महिषासुरमर्दिनी

- विजय प्रभू पार्सेकर देसाई नानेरवाडा-पेडणे.

बुधवार २८ सप्टेंबरपासून नवरात्रौत्सव सुरू झालेला आहे. प्राचीन काळी आणि मध्ययुगीन भारतात ज्या प्रमुख उपास्य देवता होत्या, त्यात श्री देवी भगवतीचे स्थान आणि महात्म्य फार मोठे आहे, असे इतिहास सांगतो. देवी भगवतीचे उपासक एका विशिष्ट तत्वज्ञानाचे भोक्ते होते. आणि म्हणूनच प्रत्येक गावात भगवती मंदिर आहे. काही ठिकाणी ते निराळ्या नावानेही आहे. आमचा पार्से गाव त्याला अपवाद कसा असणार? येथील भगवतीचे देऊळ हजार वर्षांपेक्षाही पुरातन असून हे पूर्वी चावडेवाड्यावर होते. माझे पूर्वज केशव परोब यांस मर्दुमकी गाजवल्याबद्धल आदिलशाहकडून अकरा गावे वतन आणि पालखी देऊन त्यांना ‘राजमान्य राजश्री पालखीपदस्य केशव उपाख्य आबासाहेब प्रभू पार्सेकर देसाई’ म्हणून गौरवण्यात आले. त्यांनी सातशे वर्षांपूर्वी चावडेवाड्यावरून आई भगवतीची स्थापना सध्याच्या ठिकाणी केली. माझे पणजोबा जिवाजी उपाख्य आपासाहेब प्रभू पार्सेकर देसाईंनी सभागृह आणि नंतर माझ्या आजोबांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बाहेरील मंडप आणि एक दीपस्तंभ बांधण्यात आला. आई भगवती ही आमची कुलदेवता आणि ग्रामदेवताही आहे. पूर्वाश्रमीचे परोब हे स्थलांतरित नसून पार्से गावातील वायडोंगरी येथील. म्हणूनच त्यांची कुल आणि ग्रामदेवता एकच आहे. इतरांचे तसे नाही.

सोपटेही गेले!

दयानंद सोपटे यांच्या रूपाने भाजपाचा दुसरा आमदार अटकळीप्रमाणेच राजीनामा देऊन काल कॉंग्रेसच्या वाटेला लागला. आणखी एक दोघेही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून कॉंग्रेसच्या पंढरीची वाट चालू लागतील याविषयी आता काही संशय उरलेला नाही. पाटणेकरांनी पक्ष सोडताना ‘डिचोलीचा विकास आणि मतदारसंघासाठी शंभर नोकर्‍यां’चे आश्वासन मिळाल्याचे कारण पुढे केले होते. सोपट्यांना कदाचित ‘पेडण्याच्या विकासा’चे आश्वासन मिळाले असेल. काणकोण आणि मुरगावचा ‘विकास’ही कॉंग्रेसला करावासा वाटतो आहे. मतदारसंघ पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या बिकट पेचप्रसंगातून सोपटे यांना गमावण्याची पाळी भाजपावर आली आहे. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे सोपटे यांना मतदारसंघ उरला नव्हता. त्यामुळे ते गेला काही काळ अस्वस्थ होतेच. पक्षाने त्यांना उत्तर गोव्याचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असली तरी ही केवळ निवडणुकीपुरती जबाबदारी असल्याने सोपटे नाराज होते. त्यानंतर आपले काय होणार ही चिंता त्यांना सतावत असावी. सध्याच्या राजकारणामध्ये एकदा बाहेर फेकली गेलेली माणसे वैयक्तिक करिश्मा गाठीशी नसेल तर पुन्हा कधी त्या वर्तुळात परतत नाहीत हे सोपटे यांना पुरते ठाऊक आहे.

दयानंद सोपटे यांचा भाजपला रामराम

Story Summary: 

दयानंद सोपटे व राजेश पाटणेकर यांचे कॉंग्रेस सदस्यत्वाचे अर्ज स्वीकारताना प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर. सोबत उपसभापती माविन गुदिन्हो, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व इतर. (छाया : नंदेश कांबळी)

दयानंद सोपटे यांचा भाजपला रामराम

Story Summary: 

आमदारकीचा राजीनामा

गेल्या साडेचार वर्षांच्या काळात सत्तेवर नसतानाही मुख्यमंत्री दिगंबर कामत व अन्य मंत्र्यांच्या सहकार्याने पेडणे मतदारसंघाचा विकास केला, इतकेच नव्हे तर सुमारे २०० गरीब युवकांना नोकर्‍या दिल्या. नव्या मतदारसंघ रचनेनुसार पेडणे मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढविण्याची संधी नाही. पेडण्यातील चार पंचायती मांद्रे मतदारसंघात गेल्या. दि. १४ सप्टेंबर रोजी तेथे झालेल्या प्रमुख भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी मांद्रेची उमेदवारी विद्यमान आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांना जाहीर केली. त्याचक्षणी आपण पक्षत्याग करून कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, असे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

मांद्रे मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण कॉंग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. कॉंग्रेस पक्षाचे भाषिक व सांस्कृतिक धोरण आपल्याला मान्य आहे काय, असा प्रश्‍न विचारला असता, ते तेथील कार्यकर्त्यांना, मतदारांना मान्य आहे म्हणूनच त्यांनी कॉंग्रेस प्रवेशास पाठिंबा दिल्याचे सोपटे यांनी सांगितले.

पाटणेकर व सोपटे यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

Story Summary: 

भाजपचे माजी आमदार राजेश पाटणेकर व पेडणेचे माजी आमदार तथा भाजपच्या उत्तर गोवा निवडणूक समितीचे अध्यक्ष असलेले दयानंद सोपटे यांनी काल संध्याकाळी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत येथील कॉंग्रेसभवनमध्ये येऊन पक्ष प्रवेश केला. प्रदेश अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष बळकट करण्यास अधिक मदत होईल, असे सांगितले.

यावेळी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व पंचायतमंत्री बाबू आजगावकर उपस्थित होते. सोपटे यांच्या प्रवेशामुळे पेडणे तालुक्यात कॉंग्रेस संघटित होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया आजगावकर यांनी व्यक्त केली. आरोग्यमंत्र्यांनी या दोघांच्याही कॉंग्रेस प्रवेशाचे स्वागत केले.

उमेदवारीचे कोणालाही आश्‍वासन नाही

Story Summary: 

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पुनरुच्चार

कॉंग्रेस हा सर्वांना सामावून घेणारा पक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सोपटे व पाटणेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे संघटना अधिक बळकट होईल, असे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याचे पक्षाने कुणालाही आश्‍वासन दिलेले नाही. तसे आश्‍वासन देण्याची पक्षाची पद्धत नाही.

विश्‍वासाला तडा : पार्सेकर

पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी पक्षांतर केल्याने भाजपाने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्‍वासास तडे गेले आहेत असे भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील सोपटे यांना पक्षाने जिल्हा पंचायत सदस्य ते आमदारकीपर्यंत पोचवले याची आठवण त्यांनी करून दिली. सोपटे यांच्या जाण्याने भाजपाचे नुकसान होणार नाही फक्त कॉंग्रेसमधील उमेदवारांची संख्या वाढणार आहे.

आता विजय पै खोतांकडे लक्ष

डिचोलीचे माजी आमदार राजेश पाटणेकर व पेडण्याचे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या पाठोपाठ आता पुढील दोन दिवसांत काणकोणचे भाजप आमदार विजय पै खोत यांचा कॉंग्रेस प्रवेश निश्‍चित झाल्याचे कळते. त्यांनाही काणकोण मतदारसंघातून कॉंग्रेसची उमेदवारी मिळेल.

पणजीत एटीएम फोडण्याच्या प्रयत्न

चौघांना अटक

शुक्रवारी उशीरा रात्री गस्त घालतेवेळी पणजी पोलिसांनी एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असताना चौघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशन सिंग (२०), बिहार, संतोष जगदाळे (२५), महाड - रायगड, बाळाजी नलावडे (२४), सोलापूर आणि अस्लम मुलानी (१८), उस्मानाबाद हे पणजीतील एका बारमध्ये कामास होते. त्यावेळी त्यांनी सांतिनेज - पणजी जंक्शनवरील धनलक्ष्मी बँकेचे एटीएम फोडण्याची योजना आखली. तसा त्यांनी प्रयत्नही केला मात्र तो अयशस्वी ठरला.

‘फोर्स’च्या बंदला सासष्टी वगळता अल्प प्रतिसाद

प्राथमिक शाळांच्या इंग्रजीकरणाच्या प्रश्‍नावर फोर्स या संघटनेने काल सर्व अनुदानीत शाळा बंद ठेवण्याची हाक दिली असली तरी सासष्टीतील काही शाळा वगळता अन्य ठिकाणी पालकांनी शाळा बंद ठेवण्याचा प्रस्तावास विरोध केल्याने ‘फोर्स’ला प्रतिसाद मिळू शकला नाही.

Congress formally inducts its two prized catches into the party fold; while one has reportedly been assured of a job quota, the other is likely to get a mandrem ticket

Shah commission will take public accounts committee report into consideration while presenting its own over the illegal mining activity in the state, says Dr. U V Singh

मुखर्जी व चिदंबरम-वादावर पडदा

‘फुटलेला’ लेखा समिती अहवाल सभागृहात मांडू देणार नाही

Story Summary: 

कॉंग्रेस नेत्यांचा इशारा

सार्वजनिक लेखा समितीचा अहवाल सभापतींच्या पटलावर ठेवण्यापूर्वी तो फोडणे गैर आहे. त्यामुळे तो सभागृहात मांडण्यास आपल्या पक्षाचे आमदार हरकत घेतील, असे गोव्याचे प्रभारी जगमितसिंग ब्रार व सचिव सुधाकर रेड्डी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

सार्वजनिक लेखा समितीवर कॉंग्रेसचे आमदार सदस्य म्हणून होते, परंतु या समितीचे अध्यक्ष असलेले विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी त्यांना विश्‍वासात घेतले नव्हते, असे ब्रार यांनी सांगितले. या बाबतीत समितीवर असलेल्या कॉंग्रेस आमदारांची मते घेऊन ते जबाबदार असल्यास त्यांना समितीवरून बाहेर पडण्यास सांगणार असल्याचे ब्रार यांनी सांगितले.

सोपटेही आज कॉंग्रेसवासी?

Story Summary: 

डिचोलीचे भाजपचे माजी आमदार राजेश पाटणेकर यांचा आज संध्याकाळी कॉंग्रेस प्रवेश होणार असल्याने त्यांच्याबरोबर पेडण्याचे आमदार दयानंद सोपटेही कॉंग्रेस प्रवेश करणार असल्याची चर्चा काल होती.

गोव्याचे प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी भाजपमधील आमदारांना फोडण्याचे काम करीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसला आणखी बाहेरील आमदार आणण्याची गरज नाही, असे कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोपटे काय करतील हे आज स्पष्ट होऊ शकेल.

टूजी स्पेक्ट्रम नोंद

Story Summary: 

मुखर्जी व चिदंबरमकडून एकत्रितपणे वादावर पडदा

टूजी स्पेक्ट्रमविषयक नोंदीवरून उठलेल्या वादावर काल अर्थमंत्री प्रणव मुखर्जी व गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी एकत्रितपणे पडदा टाकला. दोन्ही मंत्र्यांनी काल पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शिद यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

स्पेक्ट्रम नोंदीत व्यक्त झालेली मते ही आपली वैयक्तिक नाहीत. उपलब्ध तथ्ये व माहितीच्या आधारे तर्क व स्पष्टीकरणे या नोंदीत आहेत ती आपली मते नव्हेत असे मुखर्जी यांनी स्पष्ट केले.

मोबाईल टॉवर्सच्या २०० चोरलेल्या बॅटर्‍या पकडल्या

गोव्यातील विविध मोबाईल टॉवर्सच्या चोरलेल्या बॅटर्‍या राज्याबाहेर घेऊन जात असलेला ट्रक परवा रात्री म्हापसा पोलिसांनी कोलवाळ येथे पकडला. ट्रकात २५ लाख किमतीच्या २०० बॅटर्‍या होत्या. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. चोरीच्या बॅटर्‍या पेडणे, इब्रामपूर, हंसापूर, डिचोली व इतरत्र भागातल्या असल्याचे म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले.

येत्या महिन्यापासून गोमेकॉत मूत्रपिंडरोपण

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येत्या महिन्यापासून मूत्रपिंडरोपण शास्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोमेकॉत ही व्यवस्था नसल्याने सध्या रुग्णांना खासगी इस्पितळात या शस्त्रक्रियेसाठी जावे लागत असून गोव्यातील बहुतेक रुग्ण हे या शस्त्रक्रियेसाठी बेळगाव, बेंगलोर, मणिपाल आदी ठिकाणी जात असल्याचे डॉ. जिंदाल यांनी सांगितले.

गोमेकॉत १ व २ ऑक्टोबर रोजी रुग्ण सुरक्षा परिषदेचे आयोजन

गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १ व २ ऑक्टोबर असे दोन दिवस रुग्ण सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. व्ही. एच. जिंदाल यांनी सांगितले.

‘सच्चर’च्या शिफारसींची अंमलबजावणी व्हावी : अन्वर

रंगनाथ मिश्रा व सच्चर आयोगाने मुस्लिम समाजासाठी केलेल्या १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस तारीक अन्वर यांनी केले.

प्रदेश कॉंग्रेस कार्यकारिणी आज जाहीर होणार

विजय सरदेसाई, वालंका सरचिटणीसपदी

शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात यांनी विजय सरदेसाई यांची प्रदेश समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती व्हावी म्हणून कॉंग्रेस नेत्यांवर दबाव आणल्यानंतर सरदेसाई यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतल्याचे कळते. आज यादी जाहीर होणार आहे.

टूजी : अनिल अंबानींच्या सहभागाविषयी तपास

टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातून सीबीआयने टाटा व व्हिडियोकॉन समूहांना क्लिन चिट दिली मात्र अनिल अंबानी यांच्या सहभागाविषयी तसाप जारी असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयास दिली. क्लिन चिट मिळालेल्यांच्या सहभागाविषयी पुरावे सापडले नसल्याचे त्यांनी सांगितले.

कारच्या धडकेने पादचारी ठार

काल वेळ्ळी येथील दोन रस्त्यांच्या संगमावर मारुती कारने धडक दिल्याने आल्फोंसो टोनी फर्नांडिस (६५) हा पादचारी ठार झाला तर एन. डी. माझारेलो (३६) हा जखमी झाला. जखमीस मडगाव येथील हॉस्पिसियु हॉस्पिटलात दाखल केले आहे.

पोस्टाच्या कारभारामुळे नोकरीची मुलाखत हुकली

पेडणे येथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नागझर येथे पत्र पोहोचण्यास एक महिन्याचा कालावधी लागल्याने नागझर येथील एका होतकरू युवकाला सरकारी नोकरीची मुलाखत हुकली.

दुर्गामाता भक्तीचा शारदीय नवरात्रौत्सव

- रमेश सावईकर

‘नवरात्र’ हा नऊ दिवस चालणारा हिंदूंचा एक महत्वपूर्ण उत्सव आहे. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव नवमीपर्यंत चालतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे आश्‍विन शुद्ध दशमी ‘विजया दशमी’ ‘दसरा’ संबोधून साजरा होतो. शरद ऋतुच्या प्रारंभी येणारा नवरात्रौत्सव ‘शारदीय नवरात्र’ या नावानेही संबोधला गेला आहे. दुर्गामाता (देवी) चा हा उत्सव विविध धार्मिक विधींसह भारतातील बंगाल, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यांत प्रामुख्याने मोठ्या थाटात आणि भक्तीभावाने साजरा होतो. दुर्गामातेची महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती ही तीन रूपे. नवरात्रीचे पहिले तीन दिवस ‘महाकाली’ची पूजा व प्रार्थना होते. त्यामुळे आपणातील सर्व अपवित्र गोष्टींचा नाश होतो अशी भावना बाळगून कालीदेवीची भक्त सेवा करतात. पुढचे तीन दिवस (४, ५ व ६) ‘महालक्ष्मी’ च्या रूपात दुर्गामातेची पूजा होते.

स्वच्छ प्रतिमेची गरज

बेकायदेशीर खाण घोटाळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या खुर्चीवर तीर साधू पाहणार्‍या महत्त्वाकांक्षी व्यक्तींचे इरादे दिल्लीश्वर पक्ष निरीक्षकांनी कामत यांना पाठबळ दिल्याने तूर्त उद्ध्वस्त झाले आहेत. पक्षाचे पाठबळ कामत यांना आहे असे म्हणण्यापेक्षा सद्यपरिस्थितीत आपल्या एका मुख्यमंत्र्याला गैरकारभाराच्या आरोपावरून सत्तेवरून पायउतार व्हावे लागते आहे, असे चित्र कॉंग्रेस नेतृत्वाला निर्माण होऊ द्यायचे नाही, हाच त्याचा खरा अर्थ आहे. केंद्रात सध्या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरून वातावरण तापलेले असताना आणि गोव्यात निवडणुकाही तोंडावर असताना येथे नेतृत्वबदल घडवायचा म्हणजे खाण घोटाळ्यातील त्यांचा सहभाग मान्य केल्यासारखे झाले असते. विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असते ते वेगळेच. त्यामुळे शाह आयोगाचा अहवाल अद्याप आलेला नसल्याचे कारण देत ब्रार यांनी का’तांना अभय दिले. कॉंग्रेसमधील नव्या संस्कृतीनुसार पक्ष निरीक्षकांनी प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केली. आता त्याचा अहवाल ते श्रेष्ठींना देतील. मग जो काही निर्णय व्हायचा तो होईल. जी आमदार मंडळी त्यांना परवा भेटली, त्या प्रत्येकाने काय सांगितले हे जरी गुलदस्त्यात असले, तरी यापैकी अनेकांनी आपल्या कागाळ्या नक्कीच उगाळल्या असतील.

The fate of 18 more mining leases is in balance as the Bengaluru-based chief conservator of forests asks the state forest department to review their cases from the angle of wildlife clearances

No Election Ticket for the next assembly elections if a congressman is indicted by the shah commission, assures congress’ Goa Desk Incharge Jagmeet brar

नेतृत्वबदलाचा प्रश्‍नच नाही : ब्रार

Story Summary: 

पत्रकारांशी बोलताना कॉग्रेसचे गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार. सोबत (बसलेले) बाबूश मोन्सेर्रात, चचिर्र्ल आलेमांव, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, कॉंग्रेस सरचिटणीस सुधाकर रेड्डी. (उभे) फ्रान्सिस सिल्वेरा, पांडुरंग मडकईकर, आलेक्स रेजिनाल्ड, आग्नेल फर्नांडिस, बाबू कवळेकर, ज्योकीम आलेमांव, प्रताप गावस.

नेतृत्वबदलाचा प्रश्‍नच नाही : ब्रार

Story Summary: 

गोव्यातील बेकायदेशीर खाण व्यवसाय प्रकरणात दिगंबर कामत यांचा संबंध नसल्याने नेतृत्व बदलाचा प्रश्‍नच येत नाही असे कॉंग्रेसचे गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसच्या आमदार, मंत्री व पक्ष पदाधिकार्‍यांच्या बैठकीतही नेतृत्व बदलाची मागणी झाली नाही, असे ब्रार यांनी सांगितले. काल झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह कॉंग्रेसचे मंत्री-आमदार मिळून १३ जणांची उपस्थिती होती.

बेकायदा खाण घोटाळ्याचा अभ्यास करून आपण कॉंग्रेस अध्यक्षांना अहवाल सादर करणार असल्याचे श्री. ब्रार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खाण व्यवसायविषयी शाह आयोगाचा अहवाल आल्यावर कॉंग्रेसची समिती त्याचा अभ्यास करेल असेही त्यांनी सांगितले. कालच्या चर्चेवेळी राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांचीही उपस्थिती होती.

५ रोजी भाजपचा विधानसभेवर मोर्चा

Story Summary: 

दिगंबर कामत सरकारच्या गैरकृत्यांवर आवाज उठवण्यासाठी येत्या ५ ऑक्टोबर रोजी अधिवेशनाच्या दिवशी गोवा विधानसभेवर भाजपतर्फे मोर्चा आणण्यात येणार असल्याचे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषेदत सांगितले. लोकांचे विविध प्रश्‍न व समस्यांवर आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

१९ डिसेंबर २०१० ते १९ डिसेंबर २०११ हे गोवा मुक्तीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या वर्षी राज्यातील गरीब लोकांसाठी सरकारतर्फे विविध नव्या योजना सुरू कराव्यात असा सूर विधानसभेतून व्यक्त करण्यात आला होता.

आणखी हजारभर नोकर्‍यांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Story Summary: 

मागास जाती जमातींसाठी सहकारी सोसायट्या

लोकायुक्त विधेयकावर सोमवारी निर्णय

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षण खात्याच्या इंदिरा बालरथ योजनेसाठी चालक व मदतनीस मिळून १६८ पदे, तसेच पोलीस खात्यातील ५० उपनिरीक्षकांच्या पदांसह सुमारे १ हजार नवीन पदे तयार करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याचे कळते.

बैठकीत मागास जाती जमातीसाठी खास सहकारी सोसायट्या स्थापन करण्यासंबंधीची योजना तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली.

ती स्पेक्ट्रम नोंद पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीवर आधारित

प्रणव मुखर्जी यांचे पत्र

तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम टूजी स्पेक्ट्रम घोटाळा रोखू शकले असते ही सध्याचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठविलेली व सध्या वादग्रस्त बनलेली नोंद पंतप्रधान कार्यालयातील माहितीच्या आधारे बनविण्यात आल्याचे मुखर्जी यांनी म्हटले आहे. यासंबंधी त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग व कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्रे पाठविली आहेत.

अफझल गुरुला दयेसाठी ठराव जम्मू काश्मीर विधानसभेत रोखला

संसद हल्लाप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या अफझल गुरु याला दया दाखवावी असा ठराव जम्मू काश्मीर विधानसभेत येऊच शकला नाही. अपक्ष आमदार शेख अब्दुल रशीद यांनी हा खासगी ठराव सादर केला होता. मात्र सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले व तो चर्चेसाठी येऊ शकला नाही.

म्हादई लवादाच्या वकीलांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

तिघांना आयएएस दर्जा

फोंडा शहर बकाल होत चाललेय

- अशोक पार्सेकर, कोडार-फोंडा.

परवाचीच गोष्ट, सोमवारचा दिवस होता. फोंड्याच्या जुन्या बसस्थानकावर सकाळी उतरलो, प्रवाशांची बरीच गर्दी होती. प्रत्येकजण बसगाडीची प्रतीक्षा करीत नाकपुड्या हाताच्या बोटांनी आवळून उभे होते. कसली तरी दुर्गंधी पसरली होती. मलाही त्याची जाणीव झाल्याबरोबर मीही चट्‌कन नाकपुड्या आवळल्या. कुणी म्हणाले, गटारातून दुर्गंधी पसरली आहे. गटारावर लाद्या आहेत, पण आत काय घाण साचली असेल याचा अंदाज करता आला.

तेलंगणाची आग

गेले वर्षभर खदखदणारे स्वतंत्र तेलंगणाचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचले आहे. ज्या तीव्रतेने या आंदोलनाचा वणवा भडकला आहे ते पाहाता केंद्र सरकारला जास्त काळ या विषयावर मिठाची गुळणी घेऊन बसता येणार नाही. खरे तर सोनिया गांधींच्या वाढदिवसाचे निमित्त काढून ज्या घिसाडघाईने स्वतंत्र तेलंगणा निर्मितीची घोषणा पी. चिदंबरम यांनी दोन वर्षांपूर्वी करून सोडली, त्यातूनच काट्याचा नायटा होत गेला. आंध्रमध्ये त्या घोषणेच्या विरोधात उसळलेल्या हिंसाचारानंतर सरकारला आपलेच शब्द गिळावे लागले. सर्वसहमती गरजेची असल्याचे सांगत तो विषय शीतपेटीत ढकलण्याचा प्रयत्न झाला. श्रीकृष्ण समितीकडे बोटे दाखवून आपल्या अंगावरील जबाबदारी झटकण्याचाही पुरेपूर प्रयत्न झाला. परंतु श्रीकृष्ण समितीने सहा शिफारशींचा अहवाल सादर करून पुन्हा चेंडू केंद्राच्या कोर्टातच ढकललेला असल्याने फार काळ त्याची टोलवाटोलवी करता येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ समजावी. तेलंगणासमर्थकांची एकजूट बळकट आहे हे काही काळापूर्वी ज्या प्रकारे तेथील आमदार, खासदारांनी राजीनामे फेकले त्यावरून कळून चुकते.

वन खात्याकडून १९ खाणींचा परवाना मागे

आणखी १००० पदांना मंत्रिमंडळाची मंजुरी

मडगाव पालिकेची कारवाई

Story Summary: 

मडगाव पालिकेने माडेल येथील घाऊक मासळी बाजाराजवळ उभारलेल्या ९ बेकायदेशीर झोपड्या काल मोडल्या. (छाया : गणादीप शेल्डेकर)

कॉंग्रेस प्रभारी ब्रार आज गोव्यात

Story Summary: 

बेकायदा खाण प्रकरणी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी जगमितसिंग ब्रार आज गोव्यात येत असून आपल्या गोवा भेटीत ते सभापती प्रतापसिंह राणे, पक्षाचे आमदार तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस व मगो या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहेत. त्याचा अहवाल ते श्रेष्ठींना सादर करतील.

दरम्यान, काल कॉंग्रेसच्या मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन त्यांना नैतिक पाठिंबा व्यक्त केला.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या पाठोपाठ गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर खाण प्रकरणी गंभीर स्वरुपाचे आरोप झाले

खासदार लाचखोरी प्रकरणी सुधीन्द्र कुलकर्णी यांना कोठडी

Story Summary: 

सन २००८ मधील खासदार सौदेबाजी प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सहकारी सुधीन्द्र कुलकर्णी यांचा अंतरिम जामीन अर्ज काल फेटाळल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. कुलकर्णी हे अमेरिकेत असल्याने गेल्या सहा सप्टेंबरला व १९ सप्टेंबरला न्यायालयापुढे हजर होऊ शकले नव्हते. काल ते न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने गेल्या १९ रोजीच्या सुनावणीत पुढील सुनावणीस श्री. कुलकर्णी हजर न राहिल्यास त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा इशारा दिला होता.

न्यायालयात हजर होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की आपण खासदार लाचखोरी प्रकरणाला वाचा फोडली. भ्रष्टाचार नष्ट करणे हाच त्यामागील उद्देश होता.

चिदंबरम यांच्याविरुद्धच्या कागदपत्रांस सीबीआयकडून न्यायालयात आक्षेप

Story Summary: 

जनता पक्षाचे प्रमुख डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप करणारी जी कागदपत्रे सादर केली आहेत, त्याचा अभ्यास करण्याची तयारी केंद्र सरकारच्या वतीने दाखवली गेली असता, केंद्रीय गुप्तचर विभागाने काल त्याला हरकत घेतली. आम्ही काय करू ते कोणी आमच्या तोंडून वदवून घेऊ शकत नाही. आम्ही सरकारपेक्षा स्वायत्त व स्वतंत्र आहोत, असे सीबीआयचे वकील के के वेणुगोपाल यांनी न्यायालयात सांगितले.

सीबीआयने चिदंबरम यांची टूजी स्पेक्ट्रम प्रकरणातील भूमिकाही पडताळून पाहावी अशी मागणी याचिकादार स्वामी यांनी केली आहे.

विवाहितेच्या खूनप्रकरणी मावसभावास अटक

मूळ धारवाड येथील पण दवर्ली येथे राहणार्‍या रेणुका यमणप्पा हंगनअली (२०) या विवाहित महिलेचा खून करून तिचा मृतदेह दवर्ली रावणफोंड येथे संगमाजवळ निर्जन स्थळी टाकून दिलेला परवा रात्री सापडला. १८ सप्टेंबरपासून ती बेपत्ता होती. याप्रकरणी पोलिसांनी तिचा मावसभाऊ चंदप्पा गंगनवार याला अटक केली आहे. कोर्टाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

चांदेल गोळीबार प्रकरणी आरोपीस जंगलात अटक

चांदेल हंसापूर येथील गोळीबारप्रकरणी संशयित आरोपी ना’देव लाडू गावस यास पेडणे पोलिसांनी २७ रोजी दुपारी हणखणे जंगलात पकडले. परवा गोळीबार करून तो फरारी झाला होता. त्यांच्यावर भारतीय संहित दंड संहितेच्या ३०७ अन्वये ठार मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे. परवाना नसताना दुसरे बंदुक बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर आणखी तक्रार नोंदवली जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी माहिती दिली.

उपजिल्हाधिकारी, मामलेदारांच्या बदल्या

राज्यातील उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून त्या खालीलप्रमाणे आहेत.

विद्यार्थ्यांच्या सर्वंकष मूल्यमापनासाठी ५५०० शिक्षकांना विशेष प्रशिक्षण

सर्व शिक्षा अभियान योजनेखाली राज्यातील ५५०० शिक्षकांना १० दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून विद्यार्थ्यांचे सर्वंकष व आकारिक मूल्यमापन कसे करावे याविषयीची इत्यंभूत माहिती या प्रशिक्षणातून वरील शिक्षकांना देण्यात येणार असल्याचे सर्व शिक्षा अभियानच्या सूत्रांनी सांगितले.

बोगस दाखलादिल्याने पंचपद रद्द

बेकायदेशीर बांधकामाकरिता बोगस ना हरकत दाखला दिल्याबद्दल सुकूर पंचायतीच्या सरपंच शीतल आरोलकर यांचे सदस्यपद पंचायत संचालनालयाने पंचायत राज्य कायदा १९९४ कलम २१०/अ अन्वये रद्दबातल केले असल्याचे घोषित केले आहे.

आज मंत्रिमंडळ बैठक

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

पेडणे पोलिसात तक्रार;एकास अटक

लग्नाचे आमिष दाखवून गौरीश शेणवी याने आपणावर बलात्कार केल्याची तक्रार एका मुलीने पेडणे पोलिसात केली आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली असून दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

सुनावणीस गैरहजर; जॉन फर्नांडिसविरुद्ध वॉरंट

जिलेटिन स्फोटप्रकरणी अटकपूर्व जामीन नाकारला

पक्ष नव्हे, ही तर भक्ष्य संस्कृती!

- दिलीप बोरकर

एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याने पाच वर्षे आपल्या विधानसभा मतदारसंघात जीव तोडून कार्य करावे, तळागाळात पक्षाची प्रतिमा तयार करावी, नवनवीन कार्यकर्ते तयार करावेत, आपण या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत गेलो तर गेली पाच वर्षे मतदारसंघाच्या केलेल्या अभ्यासाचा ङ्गायदा करून घेऊन सदर मतदारसंघाचे प्रश्‍न समर्थपणे विधानसभेत मांडून मतदारसंघाची स्वप्नपूर्ती करू अशी स्वप्ने बाळगणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्याला डावलून, विरोधी पक्षाच्या आमदारास ङ्गोडून जर त्याला पक्षाची उमेदवारी देण्याचे एखाद्या पक्षाने ठरवले तर तन मन धनाने कार्य करत आलेल्या त्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे काय होईल?

मुळाशी जाण्याची गरज

मातीला जेवढे ‘खोदून खोदून’ विचाराल, तेवढे ती अधिकाधिक सांगून जाते म्हणतात. राज्यात सध्या खळबळ माजवणार्‍या खनिज घोटाळ्यासंदर्भातही असेच म्हणता येईल. वरवरचे आरोप करण्यापेक्षा आज त्याच्या मुळाशी जाण्याची गरज निर्माण झाली आहे. गोवा मुक्तिपूर्वकाळापासून गोव्यात हा व्यवसाय आहे. परंतु आज ज्या प्रकारे अमर्याद लुटालुटीचे खाण हे साधन बनले आहे, तो प्रकार पूर्वी नव्हता. कोणत्याही अन्य व्यवसायासारखाच हा व्यवसाय आहे आणि जशी इतर रोजगारांवर रोजीरोटीसाठी माणसे अवलंबून असतात, तशाच प्रकारे या व्यवसायावरही कुटुंबेच्या कुटुंबे पोसली गेली. खाणमालक आणि गावकरी यांच्यामध्ये भावनिक जवळीक असे आणि गावच्या अडीअडचणीला खाणमालकाचा मदतीचा हातही असायचा. त्यामुळे संघर्षाची स्थिती प्रारंभी कधी उद्भवल्याची नोंद गोव्याच्या इतिहासात नाही. मात्र, परिस्थिती पुढे पालटत गेली. हा व्यवसाय म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच आहे असे वाटल्याने स्वार्थी, मतलबी माणसे झपाट्याने या व्यवसायात घुसली.

Shah Commission seeks details of environmental clearances given by former environment Minister Andimuttu raja to several miining leases in Goa flouting the laid down norms

BJP guns for Chief Minister Digambar Kamat’s resignation but congress says no immediate change in leadership in Goa

योगमार्ग - राजयोग (सत्य - २०)

- डॉ. सीताकांत घाणेकर

प्रत्येक माणसावर वेगवेगळे प्रसंग ओढवतात. जीवनात अनेक समस्या येतात. विविध संकटे उभी राहतात. सामान्य माणूस भांबावून जातो. आपण चांगले वागतो तरी देखील असे का घडते...? याचे उत्तर त्याला सापडत नाही. म्हणूनच नैसर्गिक नियमांचा अभ्यास थोडातरी हवा. कळत न कळत आमच्या हातून चांगले-वाईट कर्म घडत असते. पण शेवटी सत्य हेच आहे की ‘‘कर्म तैसे फळ’’.

तुम्ही, मी, आपण सारे सुजाण पालक...

- प्रा. रमेश सप्रे

आहाहा! लेखाचं शीर्षकच कसं कानाला गोड वाटतं! पण ते अर्धवट आहे...पुढे जे शब्द आहेत ते मनाला कसे वाटतात पहा.....‘आहोत का? (सुजाण पालक आहोत का?) नसू तर कसे होऊ?’ असे ते शब्द, खरं तर, प्रश्‍न आहेत. आजचा हा आपणा सर्वांच्या दृष्टीनं जिवंत नि जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. त्याविषयी अनेक पालक-शिक्षक संघांच्या बैठकांतून प्रश्‍न विचारले जातात. या प्रश्‍नांच्या मुळाशी मुलांचं वर्तन, अभ्यास यामुळे बिघडलेलं कौटुंबिक आरोग्य असतं.

टिप्परने पाच मोटरसायकल्स चिरडल्या

Story Summary: 

ट्रक खाली चिरडलेली वाहने. (छाया : गणादीप शेल्डेकर)

खनिज घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची पर्रीकरांची मागणी

Story Summary: 

कर्नाटकाहून गोव्यातील बेकायदेशीर खनिज निर्यात घोटाळ्याची तीव्रता २० ते ३० पटीने अधिक असल्याचे सांगून आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांच्या प्रोत्साहनामुळेच गोव्यात बेकायदेशीर खनिज निर्यात घोटाळे झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला व वरील सर्वांची सीबीआय चौकशी करण्याची जोरदार मागणी केली.

आरोग्यमंत्र्यांचा आशीर्वाद नसता तर सत्तरीतून बेकायदेशीर खनिज काढण्याचे प्रकारच घडले नसते. तळे खणण्याच्या नावाखाली सुमारे दीड लाख टन बेकायदेशीर खनिज काढल्याचे सांगून याप्रकरणी पोलिसांनी चौकशीही केली नाही. आपण अनेक वर्षे या विषयावर बोलत आहोत, विधानसभेतही मुरगाव बंदराच्या अध्यक्षांना बोलावून वरील प्रकरणी चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती, असे ते म्हणाले.

टूजी : चिदंबरम यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव

Story Summary: 

सोनिया गांधींची घेतली भेट

टूजी स्पेक्ट्रम प्रकरण्यात नाव गोवले गेल्यानंतर निर्माण झालेल्या वादानंतर काल गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची १० जनपथवरील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी त्यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव श्रीमती गांधी यांच्यासमोर ठेवल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, चिदंबरम यांच्यानंतर अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही कॉंग्रेस अध्यक्षांची भेट घेऊन चर्चा केली.

चांदेल येथे बंदुकीतून गोळीबार; एक जखमी

Story Summary: 

संशयित फरार

चांदेल, पेडणे येथील नामदेव लाडू गावस (५५) याने डबल बोअर बंदुकीने केशव गावस (२९) याच्यावर गोळ्या झाडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्या पायाला एक गोळी लागली असून छातीलाही दुखापत झाली आहे. त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३०७ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. आरोपी फरार असल्याने पोलिसांना सापडू शकला नाही.

पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव काल दुपारी ३.३० वा. आपल्या शेतात लाकडी कुंपण करत होता.

कर्जाचे आमिष दाखवून फसवणार्‍यास अटक

फ्रेंडस् क्लबच्या नावाने कर्ज पुरवठा करण्याचे आमिष दाखवून फसविणार्‍या कुडचडे येथील रफीक महम्मद याला मडगाव येथे ताब्यात घेवून पोलिसानी अटक केली. तो लोकांना फसवित असल्याची तक्रार मडगाव पोलीस स्थानकावर करण्यात आली होती.

सागरी सुरक्षेचे मजबुतीकरण

चार किनारी पोलीस स्थानके उभारणार

तेरेखोल, शापोरा, काणकोण व पणजी अशी आणखी चार किनारी पोलीस स्थानके लवकरच उभारण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

तेरेखोल व शापोरा येथे स्थानके उभारण्यासाठी कॅप्टन ऑफ पोर्टसकडे अनुक्रमे २ व १ हजार चौ. मी. एवढ्या जमिनीची मागणी करण्यात आली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. भरती रेषेपासून ही जमीन २०० मीटर एवढ्या उंचीवर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

लोकायुक्त विधेयकास भाजपाचा पाठिंबा

केंद्र सरकारने सुचविलेल्या त्रुटी दूर करून २००३ साली मांडलेले गोवा लोकाआयुक्त विधेयक विधानसभेत संमत करून घेण्यास भाजपचा पाठिंबा असेल, असे विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांना सांगितले.

केप्यात टिप्परने पाच मोटरसायकल्स चिरडल्या

एकजण जखमी

आमोणा केपे येथे एका वळणावर चालकाचा ताबा गेल्यानंतर टिप्परखाली पाच मोटरसायकल्स, एक सायकल चिरडली गेली. एका दुधाच्या गाड्याचाही चुराडा झाला. या घटनेत अवेडे केपे येथील मिंगेल मोरायश (६१) जखमी झाला असून त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ही घटना काल दुपारी २.३० वा.च्या सुमारास घडली.

वाहनाची ठोकर; युवती ठार

गिरी येथे काल सकाळी तिठ्याजवळ रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनाने सरिता वामन बुरन (२२) या युवतीला ठोकर दिल्याने ती गंभीर जखमी झाली. नंतर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू असताना संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. गिरी येथील जंक्शनवर सकाळी ८ वाजणाच्या सुमारास हा अपघात झाला.

सोन्या-चांदीच्या दरांत घसरण

जागतिक बाजारपेठेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर काल खुल्या बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. दहा ग्रॅम सोन्याचा दर रु. १५४०नी खाली येऊन रु. २५ हजार ८०० झाला. अन्य आशियाई व युरोपीय देशांतही सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली.

पर्यावरण जतन : काही विचार व उपाय

- डॉ. राजीव कामत, खोर्ली - म्हापसा

उत्तरार्ध

४. पुष्कळ वेळा आपण ऐकतो व वाचतो की, पेट्रोल व डिझेलचा जगभरातील साठा दिवसेंदिवस संपुष्टात येत चालला आहे. त्यामुळे भविष्यात लोकांना त्याचा पुष्कळ त्रास होऊ शकतो, पण प्रत्यक्षात बघता या पदार्थांचा योग्य व नियंत्रित वापर करण्याबाबत काहीच जनजागृती केली जात नाही. वेळोवेळी होणार्‍या कार रॅलीज व मोटारसायकल स्पर्धा या कुठल्या इंधन बचतीचा संकल्प करतात?

पर्यावरण जतन : काही विचार व उपाय

- डॉ. राजीव कामत, खोर्ली - म्हापसा

पूर्वार्ध

आज काल आपण सर्वजण जागतिक पर्यावरणाबद्दल भरपूर बोलत असतो. एकीकडे पर्यावरण जतनाबद्दल आस्था दाखवायची, त्यासाठी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलांत परिसंवादाचे आयोजन करायचे. कोपनहेगनमध्ये जागतिक पर्यावरण व्यासपीठ भरवायचे, पण हे करताना स्वतः मात्र पर्यावरण जपण्यासाठी काहीही ठोस करायचे नाही, कोणतेही ठोस उपाय आचरायचे नाहीत.

अमानुषतेचा बळी

गेले तीन महिने मृत्यूशी झुंज घेणार्‍या राजबाला यांनी अखेर काल दैवापुढे हार मानली. बाबा रामदेव यांच्या अहिंसक आंदोलनाला चिरडण्यासाठी गेल्या ४ जूनला झालेल्या पोलिसी अत्याचारांत नाहक गेलेला हा बळी. कोणतीही चूक नसताना एखाद्या निरपराध व्यक्तीवर ही अशी वेळ यावी यासारखी दुर्दैवाची गोष्ट दुसरी नसेल. राजबाला यांचा अपराध तरी कोणता होता? बाबा रामदेव यांच्यावरील श्रद्धेपोटी त्या त्यांच्या अहिंसक आंदोलनात सामील झाल्या. मध्यरात्री हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी राजकारण्यांच्या आदेशावरून लाठ्या आणि दंडुके घेऊन खाकी वर्दीतले सैतान बेसावध असलेल्या, झोपलेल्या हजारो स्त्री - पुरुषांच्या गर्दीत घुसले आणि त्यांनी थैमान मांडले. जे घडले ते अनाकलनीय होते, आश्‍चर्यचकीत करणारे होते. अवघा देश या पोलिसी अत्याचारांच्या कहाण्या ऐकून स्तब्ध झाला, सुन्न झाला. रामदेव यांचे आंदोलन किती योग्य होते, किती अयोग्य होते हा वेगळा भाग झाला. परंतु संवैधानिक मार्गाने चालणारे एखादे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी हे जे पाऊल सरकारने पोलिसांकरवी उचलले ते पूर्णपणे चुकीचे होते, अनावश्यक होते. ५१ वर्षीय राजबाला त्या अमानुष लाठीमारात पुरत्या जायबंदी झाल्या. गेले तीन महिने त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. परंतु शेवटी ती असफल ठरली.

उपेक्षित भगीरथ

वसंत साठे यांच्या निधनाच्या बातमीला बहुतेक वर्तमानपत्रांत कुठे तरी कोपर्‍यात जागा मिळाली वा मिळालीही नाही. मात्र, भारतीय प्रसारमाध्यमांच्या इतिहासात या माणसाचे नाव वगळता येणार नाही अशी मौलिक कामगिरी साठ्यांनी एकेकाळी बजावली, ती म्हणजे भारतात रंगीत दूरचित्रवाणी आणण्याची. काळ्या - पांढर्‍या रंगांशिवाय अन्य रंग दूरचित्रवाणीच्या पडद्यावर आणणे भारतासारख्या देशाला परवडणारेच नाही असा ठाम समज करून बसलेल्या भल्याभल्यांचा विरोध मोडीत काढून त्यांनी सप्तरंगांची दुनिया या माध्यमाला खुली करून दिली. त्यांचे हे प्रयत्न भगीरथाने गंगा आणण्याच्याच तोडीचे होते. दिल्लीत होणार्‍या ‘एशियाड’ च्या निमित्ताने विदेशांप्रमाणे रंगीत प्रसारण आपल्याकडेही सुरू व्हावे असे तेव्हा माहिती आणि प्रसारणमंत्री असलेल्या साठे यांच्या मनाने घेतले, परंतु दिल्लीच्या दूरदर्शनच्या मनोर्‍यावरून रंगीत प्रसारण करताच येणार नाही असे ‘तज्ज्ञां’नी त्यांना सांगितले.

विमान अपघात

Story Summary: 

कोसळलेल्या विमानाचे अवशेष.

नेपाळमध्ये विमान अपघातात १० भारतीयांसह १९ जण ठार

Story Summary: 

एव्हरेस्ट पर्वत शिखरांचे हवाई दर्शन घडविण्यासाठी गेलेले एक लहान विमान काठमांडूनजीक कोसळून सर्व १९ जण ठार झाले. यात १० भारतीयांचा समावेश असून त्यांपैकी आठ जण तामीळनाडूतील आहेत व एक जोडपे गुजरातमधील आहे. तामीळनाडूतील आठही जण बांधकाम उद्योजक असून ते सहलीसाठी गेले होते.

मृत्यू पावलेल्या इतर जणांत दोन अमेरिकन, एक जपानी आणि तीन नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. वैमानिक व बुद्ध एअरवेजचे दोन कर्मचारीही मरण पावले.

कर्नाटकातील बेकायदेशीर खनिजाची गोव्यातून निर्यात

Story Summary: 

संतोष हेगडे यांची माहिती

गोवा लोकायुक्त विधेयकासाठी सूचना

कर्नाटकातील बेकायदेशीर खनिजाची निर्यात गोव्यातून मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे गोव्यात ताबडतोब लोकायुक्त स्थापन झाला पाहिजे, असे कर्नाटकाचे माजी लोकायुक्त तथा निवृत्त न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी सांगितले.

दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या गोवा शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गोवा लोकायुक्त कायद्याच्या मसुद्यावर आपली अभ्यासपूर्ण मते हेगडे यांनी मांडली. वरील पदावरील व्यक्तीसाठी न्यायाधीश ही पात्रता असून चालणार नाही. लोकायुक्तांची सामाजातील प्रतिमाही महत्वाची आहे, असे ते म्हणाले

राज्य सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा वादळी

Story Summary: 

नियमात दुरुस्तीचा प्रस्ताव रोखला

बँक नुकसानीत असताना फायद्यात दाखवल्याचा आरोप

गोवा राज्य सहकारी बँकेच्या भागधारकांची सर्वसाधारण सभा काल वादळी झाली.

भागधारकांच्या प्रखर विरोधामुळे बँकेच्या संचालक मंडळाला बहुराज्य बँकेचा दर्जा असलेल्या गोवा राज्य सहकारी बँक गोवा सहकारी सोसायटी कायद्याखाली आणण्यासाठीच्या नियमावलीत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव पुढे ढकलावा लागला.

टूजी : प्रणव मुखर्जींचा प्रतिक्रिया देण्यास नकार

टूजी स्पेक्ट्रम संबंधी नोंदीवरून निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर प्रथमच काल अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. सध्या दोघेही विदेश दौर्‍यावर आहेत.

पर्यटकांसाठी गोल्फ कोर्स, रेस कोर्स

केबलकार, हॅली सेवा याच्याबरोबरच आता राज्यात पर्यटकांसाठी गोल्फ कोर्स, रेस कोर्स, मोटर रेस कोर्स, आदींची सोय करण्यात येणार आहे. तरंगत्या कॅसिनोनंतर राज्यात येणार्‍या पर्यटकांसाठी ही आणखी खास अशी आकर्षणे ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जगातील ५० प्रभावशाली व्यक्तींत टाटा व सोनिया गांधी

यूकेमधील एका अग्रगण्य नियतकालिकाने केलेल्या सर्व्हेक्षणात जगातील ५० प्रभावशाली व्यक्तींत यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी व उद्योजक रतन टाटा यांचा समावेश करण्यात आला आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेल मर्केल या क्र. १वर आहेत.

साऊदीत महिलांना मताधिकार मिळणार

आखातातील अत्यंत रुढीवादी राष्ट्र अशी प्रतिमा असलेल्या साऊदी देशाचे राजे अब्दुल्ला यांनी पालिका निवडणुकांत महिलांना मताचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात येतील अशी घोषणा काल केली. महिलांना ‘शुरा’ (विचारविनिमय) मंडळातही स्थान देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

दाबोळी विमानतळास सतर्कतेचे आदेश

अमेरिका - पाकिस्तान संबंध नाजूक स्थितीत

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे संबंध अमेरिकेने हकानी दहशतवाद्यांशी जोडून अफगाणिस्तानात हल्ल्यांना उत्तेजनाचा आरोप अमेरिकेने केल्यामुळे दोन्ही देशांत संबंध दिवसेंदिवस बिघडत चालल्याचे दिसत असून काल पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांना न्यूयॉर्कहून तातडीने माघारी बोलावले.

पेडण्यात ट्रक-रिक्षा अपघातात एक गंभीर जखमी

न्हंयबाग-पेडणे येथे ट्रक व रिक्षा याच्यात अपघात होऊन रामा पेडणेकर हे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर गोवा मेडीकल कॉलेज बांबोळी येथे यशश्वी शस्त्राक्रिया करण्यात आली. २४ रोजी रात्री १० वाजता जीए ०३ टी ६६३२ ही न्हंयबाग जात होती.

कोरगाव येथे एकाची आत्महत्या

दिल्ली अभी दूर है

- सुरेश वाळवे

काही व्यक्ती वाद घेऊनच जन्माला येत असाव्यात. त्यांची प्रत्येक उक्ती वा कृती ही वादग्रस्त बनत असते. गोव्यातही अशी काही मंडळी आहेत. सार्वजनिक क्षेत्रात वावरणारी माणसे असतात, तेव्हा त्यांची प्रत्येक हालचाल हजारो डोळे टिपत असतात. त्यामुळे त्यांनी तर फारच सावधगिरी बाळगावी, अशी अपेक्षा असते. परंतु वृत्तीच बेछूट, बेफिकीर असेल, तर काय?

डॉ. मनमोहन सिंग

Story Summary: 

न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या ६६ व्या आमसभेत प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी भाषण केले.

गृहमंत्री चिदंबरम यांच्या अटकेची भाजपाची मागणी

Story Summary: 

अर्थ मंत्रालयाकडून पंतप्रधान कार्यालयास गेलेल्या पत्रात पी. चिदंबरम यांच्यावर टूजी स्पेक्ट्रम घोटाळा ते रोखू शकले असते अशी टिप्पणी केल्याने भारतीय जनता पक्षाने काल चिदंबरम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व चिदंबरम या दोघांनाही या घोटाळ्याची पूर्वकल्पना होती असा आरोप भाजपाने केला आहे.

दोघांच्याही या घोटाळ्यातील भूमिकेची सीबीआय चौकशी व्हावी व चिदंबरम यांना तुरुंगात पाठवावे अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी काल पत्रकार परिषदेत केली. चिदंबरम यांची सीबीआय चौकशी व्हावी व पंतप्रधानांनाही चौकशीच्या घेर्‍यात आणावे अशी मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

हॅलिकॉप्टर पर्यटनासाठी ८ कंपन्यांचे प्रस्ताव

Story Summary: 

राज्यात हॅली टुरिझम म्हणजेच पर्यटकांसाठी हॅलिकॉप्टर व छोटी विमान सेवा सुरू करण्यासाठी ८ कंपन्यांकडून प्रस्ताव आले असल्याचे गोवा पर्यटन खात्यातील सूत्रांनी सांगितले.

पर्यटकांसाठी हॅली सेवा सुरू करण्यासाठी गोवा सरकारने प्रस्ताव मागवले होते. या प्रस्तावाला ८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हॅली सेवा सुरू करण्यासाठी साधनसुविधांची गरज असून ती सुरू करता यावी यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली असून ती पूर्ण झाल्यानंतरच ही हॅली सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

१२ मतदारसंघांसंबंधी राष्ट्रवादीची कॉंग्रेसशी बोलणी

Story Summary: 

येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस १२ जागांसाठी दावा करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वास्को येथील आमदार व महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या तीन मतदारसंघांसह १२ मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी दावा करणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अनुकूल असलेल्या १२ मतदारसंघांची यादी पक्षाच्या नेत्यांनी तयार केलेली असून ती पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली असल्याचे ते पुढे म्हणाले.

अपहरण करून २० हजारांना लुटल्याप्रकरणी एकास अटक

आराडी-सुकूर येथील दीपक मधुकर आरोंदेकर (२४) यास आसाम येथील एका पर्यटकाचे अपहरण करून त्यांच्याकडून २० हजार रुपये धमकी देऊन काढून घेतल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी अटक केली.

‘धर्म’ केंद्रस्थानी ठेऊन निर्मितीमुळे पाक पिछाडीवर-एम. जे. अकबर

केवळ धर्म हाच केंद्रस्थानी ठेवून पाकिस्तानची स्थापना करण्यात आल्याने ते आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकले नसल्याचे व त्याचा पायाच कमकुवत बनल्याचे सुप्रसिद्ध पत्रकार एम. जे. अकबर यांनी काल येथील ‘ताज विवांता’ या पचंतारांकित हॉटेलात ‘भारत पाकिस्तान यांचे मार्ग वेगळे का?’ या विषयावर व्याख्यान देताना सांगितले. भारताविषयी बोलताना ते म्हणाले, की भारतातील बहुतेक हिंदू हे धर्मनिरपेक्ष असल्यानेच भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून यशस्वी होऊ शकला.

‘स्वस्तिक’तर्फे मा. दीनानाथ स्मृती संगीत संमेलन

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाटन

गोमंतकाच्या संगीत क्षेत्रात सातत्याने अभिनव कार्यक्रम सादर करणार्‍या ‘स्वस्तिक’ या संस्थेने रविवार दि. १६ ऑक्टोबर रोजी कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर सभागृहात ‘स्वर मंगेश’ हे मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत संमेलन आयोजित केले असून भारतरत्न लता मंगेशकर या संमेलनाच्या उद्घाटक या नात्याने उपस्थित राहणार आहेत.

चेन्नई विमानतळावर दुर्घटना टळली

चेन्नई विमानतळावर दिल्लीकडे निघालेले जेट एअरवेजचे विमान उड्डाण करण्याच्या तयारीत असताना ऐनवेळी धावपट्टीवरच थांबवले गेल्याने त्याचवेळी मुंबईहून आलेले एअर इंडियाचे विमान त्यावर धडकण्याची शक्यता निर्माण झाली होती.

ओरिसात जाहीर सभेत आफदाराची हत्या

ओरिसातील उमरकोटचे सत्ताधारी आमदार जगबंधू मॉंझी यांची काल तिघा बुरखेधार्‍यांनी एका जाहीर सभेत सर्वांदेखत गोळ्या घालून हत्या केली. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी मॉंझी यांचे व्यक्तिगत सुरक्षा अधिकारी पी. के. पात्रो यांनाही ठार केले. स्वतः एक आदिवासी नेते असलेले मॉंझी हे गोना या गावी गेले असता ही घटना घडली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाला.

बलात्कार प्रकरणी आणखी एकास अटक

मुंबई स्फोटाचा कट उलगडल्याचा दावा

गेल्या १३ जुलै रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट रचणार्‍यांविषयी माहिती मिळाल्याचा दावा महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने केला आहे. या स्फोटात २१ जण ठार झाले होते. हा स्फोट कोणी घडविला हे सांगण्यास मात्र पोलीस महासंचालक अजित पारसनिस यांनी तूर्त नकार दिला. तपासकामाचे काही धागेदोरे अद्याप जुळायचे आहेत असे ते म्हणाले.

मिर्चपूर हत्याकांड प्रकरणी पंधरा जण दोषी

सन २०१० मधील मिर्चपूर दलित हत्याकांड प्रकरणात दिल्ली न्यायालयाने जाट समाजाच्या पंधराजणांना दोषी धरले. ७४ वर्षीय ताराचंद व त्याच्या १७ वर्षीय अपंग मुलीच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी मुख्य आरोपी राजेंद्र याला दोषी धरण्यात आले आहे. ताराचंद यांच्या झोपडीस जाट समाजाच्या लोकांनी आग लावली होती.

Manohar Parrikar alleges involvement of Chief Minister and his colleagues in illegal mining, demands CBI inquiry

Dayanand Narvekar mulls private members Lok Ayukta Bill in coming assembly session while opposition leader stands by 2003 version with recommended amendments

Green building concept gains momentum in the state with many builders and developers showing interest because of the benefit it brings

Goa may boast of High Literacy and Economic growth but its sex ratio continues to show a declining trend

माटोळी

- पौर्णिमा केरकर

गणेशाच्या आगमनाचा जल्लोष अजून काही पुरता ओसरलेला नाही. दीड, पाच, सात, नऊ दिवसांच्या गणेशपूजनाची हौस भागवून इतरत्र असलेले एकवीस दिवसांचे गणेशचित्र देखावे बघण्यासाठी उसंत काढून कुटुंबीयांसमवेत फिरणे होत आहे.

लोकमान्य टिळकांनी सामाजिक परंपरा भावनेचा विचार मनीमानसी रुजविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली. त्याला आज व्यापक स्वरूप प्राप्त झालेले आहे. पैसा - प्रतिष्ठा पणाला लावून धूमधडाक्यात उत्सव साजरा करण्याकडेच गणेशोत्सव मंडळाचे प्रयत्न दिसतात. या सार्‍यांसाठी राजकीय मंडळीचा वरदहस्त अतिशय गरजेचा झालेला आहे. दारूकामाची आतषबाजी, भडक विद्युत रोशणाई, ज्या राजकीय व्यक्तीने अथवा पक्षाने मंडळाला मदत केलेली असेल त्यांच्या बॅनरखाली जाहिराती, अनेकांनी प्रायोजित केलेल्या कार्यक्रमांची रेलचेल, कानठळ्या बसविणारा ध्वनिक्षेपकांचा आवाज, या सार्‍या प्रकारांमुळे वाटते की गणेशमहाराजांना गुदमरायला तर होणार नाही ना? मृण्मयी मातीपासून तयार करून घराघरांतील आसनांवर विराजमान करण्यात येणारी गणेशाची मूर्ती ही निसर्गपूजाच होती - आहे. पण आज मात्र थर्मोकोल, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर करून पर्यावरण प्रदूषित करण्याचा विडाच उचलल्यासारखा वाटतो.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर प्रणय प्रसंग

- प्रा. मिलिंद म्हाडगुत

हिं दी चित्रपट म्हटला म्हणजे त्यात प्रणय प्रसंग असणे ओघाने आलेच. हल्लीच्या चित्रपटांतील प्रणय प्रसंगात तर थिल्लरपणाच जास्त दिसत असतो. पण पूर्वीच्या चित्रपटांतील प्रणय प्रसंग बरेच जिवंत वाटायचे. प्रणय प्रसंग हा जरी हिंदी चित्रपटांचा महत्त्वाचा गाभा ठरत असला तरीसुद्धा बहुतेक प्रणय प्रसंग हे भडकच वाटत आले आहेत. पण तरीही राजकपूर - नर्गीस, दिलीपकुमार - मधुबाला, धमेंद्र - हेमामालिनी सारख्या जोड्यांनी या प्रणयांना एक वेगळेच स्वरूप प्राप्त करून दिलेले आहे. म्हणूनच हिंदी चित्रसृष्टीतील प्रणय प्रसंगांचा विचार केल्यास मोगले आझम, कागजके फुल व श्री ४२० या तीन चित्रपटांतील प्रणय प्रसंग हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘माइल स्टोन’ ठरलेले आहेत.

टँकर उलटून ऍसिड गळती

Story Summary: 

बाणस्तारी येथील अपघातग्रस्त टँकर. (छाया : नंदेश कांबळी)

बाणस्तारी येथे टँकर उलटून ऍसिड गळती

Story Summary: 

वेळीच कारवाईमुळे अनर्थ टळला

पणजी-फोंडा वाहतूक ठप्प

भोम (फोंडा) हमरस्त्यावर काल (शुक्रवार) पहाटे ६ वा. कर्नाटकातून हायड्रोक्लोरिक ऍसिड घेऊन जाणारा टँकर व फोंड्याहून येणारा कन्टेनर यांची टक्कर होऊन टँकर कलंडला व ऍसिड गळती सुरू झाली. मात्र कुंडई व जुने गोवे येथील अग्नीशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पणजी-फोंडा मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. रस्ता संध्याकाळी ४ नंतर पूर्णपणे मोकळा करण्यात आला. अपघातात जखमी झालेल्या टँकरचालकास इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

युतीबाबतचा निर्णय श्रेष्ठींचा

Story Summary: 

सुभाष शिरोडकर यांचे प्रतिपादन

पाटणेकरांचा ‘अर्ज’ आलेला नाही

आगामी विधानसभा निवडणुकीची कॉंग्रेस पक्षाने तयारी सुरू केली असून सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मगोची युती आहे. यावरही राष्ट्रीय नेत्यांशी आपण चर्चा केली आहे. आगामी निवडणूक वरील युतीतर्फेच लढवावी की स्वतंत्रपणे लढवावी हे कॉंग्रेस श्रेष्ठी ठरवतील. परंतु चाळीसही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी पक्षाने केली आहे, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

प्रदेश समितीसाठी ६५ नावांची निवड करून संपूर्ण यादी कॉंग्रेस श्रेष्ठींकडे मान्यतेसाठी पाठविली आहे. त्यात १८ मतदारसंघांसाठी १८ निवडणूक प्रमुख, निवडणूक समिती, जाहिरनामा समिती व प्रचार समित्यांचाही समावेश आहे.

चिदंबरमच्या पाठीशी रहा सोनियांचे पक्षनेत्यांना आदेश

Story Summary: 

टूजी स्पेक्ट्रमसंबंधीच्या नोंदीवरून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी व गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यात मतभेदांची चर्चा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सर्व नेत्यांना एकजुटपणे चिदंबरम यांच्या पाठीशी राहण्याचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्र्यांविषयी निर्माण झालेला वाद संपुष्टात आणण्यासाठी सोनिया गांधी स्वत: या प्रकरणात भाग घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

गृहनिर्माण भूखंड प्रकरणी पर्यटनमंत्र्यांची चौकशी

कोलवाळ येथील गृहनिर्माण मंडळाच्या जागेत बांधण्यात आलेल्या बी. एड. महाविद्यालय प्रकरणी काल दक्षता खात्याच्या पोलिसांनी पर्यटनमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना बोलावून सुमारे तीन तास चौकशी केली. पर्यटनमंत्र्यांनी वरील बांधकामासंबंधीची सर्व कागदपत्रे पोलिसांसमोर ठेवली.

खाण खात्याचा परवाना नसलेले खनिज रोखणार

बेकायदेशीर खनिज निर्यातीला मुरगाव बंदर कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही. खाण खात्याचा ना हरकत दाखला नसलेल्या खनिजाची निर्यात होणार नाही, असे सांगून बेकायदेशीर खनिज कोणत्याही जलमार्गाने नेण्याचा प्रयत्न केल्यास जहाजे अडविण्यासही मागे हटणार नाही, असे मुरगाव बंदराचे अध्यक्ष पी. मारा पंडियान यांनी काल सांगितले.

कदंबचे कर्ज ४२ कोटींवर

परतफेडीसाठी राज्य सहकारी बँक आग्रही

गोवा राज्य सहकारी बँकेने कदंब महामंडळाला दिलेल्या ३० कोटी रुपयांचे कर्ज आता व्याजासह ४२ कोटींवर पोचले आहे. सरकारने १२ कोटी माफ करण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु कायद्यानुसार ते माफ करणे शक्य नाही. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपूर्वी पंधरा कोटी परत करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविल्याची माहिती अध्यक्ष रामचंद्र मुळे यांनी काल पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाव दिली.

मालपे अपघातात स्कूटरस्वार ठार

राष्ट्रीय महामार्ग १७ वर मालपे-पेडणे येथील जंक्शनवर झालेल्या अपघातात स्कूटरस्वार गजानन भिकाजी पेडणेकर (५५) ठार झाले. मागे बसलेले त्यांची मुलगे गौतम (१०) व गौरीश (१६) गंभीर जखमी झाले असून त्यांना गोमेकॉत दाखल केले आहे. अपघात काल रात्री ८.३० वा. झाला.

बाळ्ळी जळीतकांडाची चौकशी करणारे न्या. शाह गोव्यात

संतोष हेगडे यांचे रविवारी व्याख्यान

कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे गोव्यात येत असून रविवार दि. २५ रोजी त्यांचे ‘गोव्याचे प्रस्तावित लोकायुक्त विधेयक’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यान दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत असेल. इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या लोकायुक्तविषयक कार्यशाळेचा भाग म्हणून त्यांचे व्याख्यान होईल.

प्रचंड उपस्थितीत पतौडींवर अंत्यसंस्कार

चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मन्सुर अली खान पतौडी यांच्यावर पतौडी नवाबांच्या शाही दफनभूमीत शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

महिलांना लाचार बनवण्यापेक्षा स्वातंत्र्य आणि स्वायत्तता द्या!

- नीना नाईक, मिरामार-पणजी

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही ठेवणीतली एक म्हण महिला परिषद, परिचर्चा, महिला सशक्तीकरण, महिला मंडळ यांच्यासमोर केलेल्या भाषणात नियमितपणे कानावर पडते. सत्यता पडताळणारे.. खणखणीत नाणे.. ते स्त्री हेच. कुटुंबप्रमुख, व्यावहारिक चाणाक्षपणा, समृद्धी आणि सरस्वतीबरोबरच संसाराचा मिलाफ घडवून ह्या सर्वांच्या अजब मिश्रणातून कुटुंब जोपासणे, ज्योतीने ज्योत पेटवून घरदार उजळवून ठेवण्याची ताकद स्त्रीतच असते. आई-वडीलांच्या छत्राखाली इवल्या-इवल्या पावलांनी बाहुलाबाहुलीची खेळ खेळत बालिका पौगंडावस्था सोडून तारूण्याच्या उंबरठ्यावर कधी पदार्पण करते, ते कळण्याअगोदरच पत्नी होते. आणि तिथे ती आपले वेगळेपण जपते.

क्रिकेट नवाब

भारतीय क्रिकेटने ज्यांना त्यांच्या मैदानी आक्रमकतेमुळे ‘टायगर’ म्हणूनच नावाजले,अशा नवाब मन्सूर अली खान पतौडींच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधील एक संस्मरणीय पर्व संपले आहे. हरियाणातल्या पतौडीसारख्या छोट्याशा संस्थानचा हा नवाब पित्याच्या पावलांवर पाऊल टाकून क्रिकेटच्या मैदानात उतरला आणि साठच्या दशकात आपला अमीट ठसा उमटवून गेला. ज्या काळात भारतीय क्रिकेट रसिक सामना ‘ड्रॉ’ होणे म्हणजेच जिंकणे असे मानत होते, त्या काळात पतौडीच्याच कर्णधारपदाखाली १९६८-६९ मध्ये न्यूझीलंडच्या ग्रॅहम डाऊलिंगच्या संघाविरुद्ध कसोटी मालिकेत आपल्या संघाला ३ - १ असा विजय मिळून इतिहास घडला. भारतीय क्रिकेटला आपल्या बचावात्मक खेळीतून बाहेर काढण्याचे श्रेय टायगर पतौडीला आणि त्याच्या आक्रमकतेलाच द्यायला हवे. ‘‘परदेशी संघाला आपण हरवू शकतो अशी जिगर निर्माण करणारा पहिला भारतीय कर्णधार’’ असे त्याचे वर्णन बापू नाडकर्णींनी काल त्याला श्रद्धांजली वाहताना केले ते सार्थ आहे. ‘लॉफ्टेड शॉट’ ज्याला म्हणतात, अशा येणारा चेंडू पुढे सरसावून उचलून सीमापार हाणण्याच्या मर्दानी खेळीबाबत पतौडीचा लौकीक होता. मधल्या ङ्गळीतील ही आक्रमक ङ्गलंदाजी असो, कव्हर्समधील अप्रतिम क्षेत्ररक्षण असो वा कर्णधार म्हणून संघाचे मनोबल उंचावण्याची कामगिरी असो, टायगर पतौडीचे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक अद्वितीय असे स्थान आहे.

Former Bombay High court Judge S K Shah arrives in Goa to probe Balli violence, to set up office at Margao’s Moti Dongor

Under-13 Squash player Akanksha Salunkhe of Dabolim, and Sixteen-year old Chess wonder Anurag Mhamal of Santa Cruz are the Two New Goodwill Ambassadors of the Dempo Group

‘बायोइन्फार्मेटिक्स’वरील आंतरराष्ट्रीय परिषद

Story Summary: 

परिषदेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री दिगंबर कामत. सोबत सुनील प्रभुदेसाई, विश्‍वासराव धेंपो, प्राचार्य राधिका नायक, श्रीनिवास धेंपो, भास्कर नायक, डॉ. आर. के. दत्ता, डॉ. व्ही. पी. सक्सेना.

पंतप्रधान चिदंबरम यांच्या पाठीशी

Story Summary: 

टूजी प्रकरण

टूजी वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास व्यक्त केला असल्याचे कळते.

पंतप्रधान संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत भाग घेण्यासाठी गेले आहेत. वाटेत फ्रँकफर्ट येथून त्यांनी सुमारे २० मिनिटे चिदंबरम यांच्याशी संभाषण केले. यात अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान कार्यालयास पाठविलेल्या स्पेक्ट्रमसंबंधीच्या नोंदीविषयी चर्चा झाल्याचे समजते.

क्रिकेटचे ‘टायगर’ पतौडी यांचे निधन

Story Summary: 

आपल्या खेळण्याच्या आणि जगण्याच्या विशिष्ट शैलीमुळे एका काळात चाहत्यांमध्ये आपले खास स्थान निर्माण केलेले भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नवाब मन्सुर अली खान पतौडी यांचे काल फुफ्फुसांच्या आजाराने काल इस्पितळात निधन झाले. ७० वर्षीय पतौडी गेले काही महिने आजारी होते. त्यांना क्रिकेट वर्तुळात ‘टायगर’ असेही संबोधले जायचे.

त्यांच्यामागे पत्नी अभिनेत्री शर्मिला टागोर, पुत्र सैफ अली खान आणि कन्या सोहा व साबा अली खान असा परिवार आहे. काल संध्याकाळी ५.५५ वा. त्यांचे निधन झाले. परवापासून त्यांचे आरोग्य अधिकच बिघडले होते. त्यांना फुफ्फुसांचा आजार जडला होता. त्यामुळे श्‍वासोच्छ्वासास त्यांना त्रास व्हायचा. गेला महिनाभर ते आयसीयूत होते.

‘बायोइन्फार्मेटिक्स’वरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Story Summary: 

धेंपो वाणिज्य महाविद्यालयातर्फे पणजीत आयोजन

एस. एस. धेंपो वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ग्वाल्हेर ऍकॅडमी ऑफ मॅथॅमॅटिकल सायन्सिसच्या बायोइन्फोर्मेटिक्सवरील ४ दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याहस्ते काल पणजीत उद्घाटन झाले.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की, तांत्रिक विकासामुळे एकूण मानवी जीवनात आमूलाग्र असा बदल झालेला आहे. या तांत्रिक विकासामुळेच ई-गव्हर्नन्सचे युग अवतरू शकले. आता तर आम्ही एम. गव्हर्नंन्सच्याही गोष्टी करू लागलेलो आहोत.

निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे विधिमंडळ बैठकीत सूतोवाच

आगामी अधिवेशनाबाबत चर्चा

काल झालेल्या कॉंग्रेस विधिमंडळ बैठकीत काही शहरी भागांशी संबंध असलेल्या आमदारांनी आगामी विधानसभा निवडणूक कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरच व्हावी अशी इच्छा व्यक्त केली, तर ग्रामीण भागाशी अधिक संबंधित असलेल्या मतदारसंघातील आमदारांनी पंचायत निवडणुकांपूर्वी विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्याच्या सूचना केल्या, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी काल पत्रकारांना सांगितले. असे असले तरी फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यात निवडणूक होणार हे निश्‍चित असल्याने त्यासाठी तयारी ठेवण्याचे बैठकीत ठरले.

कुर्टी येथे महिलेचा खून

नागामसजित - कुर्टी येथील ‘रुबीया एनक्लेव’ या इमारतीच्या तळ मजल्यावरील फ्लॅटमध्ये शहाजान इकबाल खान (४७) या महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या अंगावर व कपाळावर जखमा आढळल्याने तिचा खून झाला असा संशय व्यक्त करून खुनाची नोंद फोंडा पोलिसांनी केली आहे.

पर्यटकांना आकर्षित करणार ‘केबल कार’

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन खात्याने राज्यात दोन ठिकाणी ‘केबल कार’ सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी नेमकी कुठे ती सुरू करावी यावर अद्याप शिक्कामोर्तब होऊ शकले नसल्याचे पर्यटन खात्यातील सूत्रांनी सांगितले.

गावोगावी स्मशानभूमीची गरज

- डॉ. नारायण वि. शे. धुमे, करंजाळे - गोवा.

दै. ‘नवप्रभा’च्या १७ सप्टेंबरच्या अंकात संपादकांनी वाचकांना, मोरजी येथील शुभांगी बागकर या महिलेच्या अंत्यसंस्कारासंदर्भात जो दुर्दैवी वाद झाला, त्या विषयी आपल्याला काय वाटते? गावोगावी स्मशानभूमीचा प्रश्‍न किती बिकट बनला आहे, तो कसा सोडवता येईल यावर आपले विचार लिहून पाठवण्याचे आवाहन केलेले आहे. त्यानुसार विचार लिहून पाठवले तरी त्यावर विचार करणारे सरकार अजून आपल्याला मिळालेले नाही, व यापुढेही तसे मिळणार नाही याची खात्री असूनसुद्धा संपादकांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याच्या एकमेव हेतूने हे विचार व्यक्त करीत आहे.

चिदंबरम घेर्‍यात

वरवर पाहाता सारे काही शांत आणि आलबेल वाटत असते, तेव्हा अंतःप्रवाह काही वेगळेच सांगत असतात. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रणव मुखर्जी आणि पी. चिदंबरम या दोन प्रमुख नेत्यांचे संबंधही वाटतात तेवढे सरळ व सलोख्याचे नाहीत. दोघांमध्ये स्पर्धा आहे, कदाचित एकमेकांविषयी अविश्वास आणि असूयाही असावी असा संशय निर्माण करणारा दस्तऐवज माहिती हक्क कायद्याखालील तपशिलामुळे परवा समोर आला. केवळ सत्तासंघर्षाला उजेडात आणणाराच हा तपशील नाही, तर चिदंबरम आणि ए. राजा या दोन्ही दाक्षिणात्य नेत्यांमध्ये टूजी स्पेक्ट्रम वाटपात साटेलोटे होते असे हा दस्तऐवज अप्रत्यक्षपणे सुचवतो. हा मेमो अर्थ मंत्रालयातील डॉ. पी. जी. एस. राव यांनी पंतप्रधान कार्यालयातील संयुक्त सचिव विनी महाजन यांना पाठविला, म्हणजेच अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाशी केलेला हा अधिकृत पत्रव्यवहार आहे. शिवाय या अकरा पानी टिप्पणीतील तपशील मुखर्जी यांनी तपासूनच तो पुढे पाठवल्याची त्यात स्पष्ट नोंद आहे. चिदंबरम यांच्यावरील त्यातील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत आणि सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या व देशाला हादरवून सोडणार्‍या टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्याची सारी समिकरणेच ते बदलून टाकू शकतात.

लवकर निवडणूक घेण्यावर कॉंग्रेस विधिमंडळात मतभेद

गोवा फुटबॉल असोसिएशन ‘आय लीग’ सामने गोव्यात खेळवणार

योग गुरु श्री श्री रवीशंकर यांचा महासत्संग

Story Summary: 

योग गुरु श्री श्री रवीशंकर यांचा महासत्संग काल मिरामार किनार्‍यावर झाला. यावेळी त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया ः हेमंत परब)

राजकीय हालचालींना वेग

Story Summary: 

नेतृत्वबदल की विधानसभा बरखास्ती?

वेगवेगळ्या विषयांमुळे गोव्यातील राजकीय वातावरण गढूळ झाल्याने अ. भा. कॉंग्रेस सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी जगमित सिंग ब्रार येत्या काही दिवसांत गोव्यात येत असल्याचे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. खाण घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री दिगंबर कामत, नगरविकासमंत्री ज्योकी आलेमाव व अन्य चारजण वादग्रस्त बनल्याने गोवा विधानसभा शक्य तेवढ्या लवकर बरखास्त करण्याच्या दिशेने हालचाली सुरू असल्याचेही काही संबंधितांचे म्हणणे आहे.

विधानसभेचे अधिवेशन घेऊन लवकरच विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत काल संध्याकाळी दिल्लीहून परतले, तर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर दिल्लीत तळ ठोकून होते. आज ते गोव्यात परततील. शिरोडकर यांच्याशी संपर्क केला असता, ब्रार यांच्या गोवा भेटीची कल्पना नाही, परंतु परवा आपण कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, गोव्याचे प्रभारी ब्रार, सचिव सुधाकर रेड्डी यांची भेट घेऊन गोव्यात कॉंग्रेस बळकट करण्यावर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

सासष्टी, मुरगाव, तिसवाडी बार्देशच्या आराखड्यांस मान्यता

Story Summary: 

मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखालील नगरनियोजन मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत किनारी भागातील सासष्टी, मुरगाव, तिसवाडी व बार्देस या तालुक्यांच्या प्रादेशिक आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे २०२१ प्रादेशिक आराखडा तयार झाला आहे.

आराखडे अधिसूचित करण्यापूर्वी ते जनतेसाठी ३० दिवस खुले ठेवण्याची मागणी गोवा बचाव अभियानने केली होती. परंतु सरकारने ती फेटाळून लावली. यापूर्वी सात तालुक्याचे आराखडे अधिसूचित केले आहेत.

डिचोलीत आग लागून १० लाखांचे नुकसान

Story Summary: 

दुकान व हॉटेल भक्ष्यस्थानी

डिचोली तालुक्यात परवा रात्री दोन दुकानांना लागलेल्या आगीत सुमारे १० लाख ८४ हजार ६०० रु.चे नुकसान झाले. म्हापसा तसेच डिचोली अग्नीशामक दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्याने सुमारे ४ लाख रु.ची मालमत्ता वाचविण्यास यश आले.

परवा मध्यरात्री १२.३० वा. सुमारास मुळगाव येथे गोपाळ नाईक चालवित असलेल्या श्यामसुंदर पेडणेकर यांच्या मालकीच्या विद्युत उपकरणे विक्री व दुरुस्तीच्या दुकानाला आग लागली. याचवेळी खरपाल येथे आग विझविण्यासाठी डिचोली अग्नीशामक दल गेल्याने म्हापशाहून जवानांना बोलावण्यात आले.

‘पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही’

आपण भावी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काल नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांची भेट घेतल्यानंतर केले. सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमध्ये भेट घेऊन अडवाणी यांनी आगामी रणनीतीबाबत चर्चा केली व त्यानंतर आपला निर्णय जाहीर केला.

दाबोळीत बंगल्यात चोरी

दाबोळी येथे राहणारे रघुनाथ खोब्रेकर यांचा बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २२ हजार रु.चा ऐवज लंपास केल्याची तक्रार वास्को पोलीस स्थानकात केली आहे.

मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी फरारींची छायाचित्रे जारी

नोव्हेंबर २००९ मधील मडगाव येथील बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने तिघा फरारी आरोपींची छायाचित्रे आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून त्यांच्याविषयी माहिती असलेल्यांनी ८२८५१००१०० या दूरध्वनी क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. रूद्र पाटील, प्रवीण लिमकर व जयप्रकाश ऊर्फ अण्णा अशी या आरोपींची नावे आहेत.

गोव्यातील ४० खाणी बंद करण्याचा आदेश?

गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाने गोव्यातील ४० खाणी बंद करण्याचे आदेश दिल्याचे गोवा फाऊंडेशनचे क्लाऊड आल्वारिस यांनी म्हटले आहे. तसे स्पष्ट करणारे कागदपत्र माहिती हक्क कायद्याखाली आपणास मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

टूजी : चिदंबरम यांचा अर्थमंत्र्यांच्या नोंदीत उल्लेख

टूजी स्पेक्ट्रम वितरण घोटाळ्यात गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सहभागाबाबत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठविलेल्या नोंदीत उल्लेख असल्याचा दावा एका माहिती हक्क कार्यकर्त्याने केला आहे. माहिती हक्क कायद्याखाली मिळविलेल्या कागदपत्रात तसे नमूद असल्याचे या कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.

वास्कोत तेलवाहिन्यांच्या दुरुस्तीस सुरुवात

नाफ्ता गळती प्रकरणानंतर आगीच्या तांडवाने चार जणांना मृत्यू, नैसर्गिक संपत्तीचे नुकसान करून कोट्यवधी रुपयांची हानी करणार्‍या वरुणापुरी येथील तेलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पुढील दोन-तीन दिवसांमध्ये हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सिक्कीममध्ये भूकंपामुळे १ लाख कोटींची हानी

रविवारी सिक्कीममध्ये आलेल्या भूकंपामुळे सुमारे १ लाख कोटी रु.चे नुकसान झाल्याचा अंदाज मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी व्यक्त केला असून केंद्र सरकारकडे खास पॅकेजची मागणी केली आहे. निश्‍चित किती नुकसान झाले याचा अहवाल पुढील दहा दिवसांत पूर्ण केला जाणार असून हानी १ लाख कोटींपेक्षा कमी नसेल असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना रु. ५ लाख तर जखमींना रु. ५० हजार भरपाई जाहीर केली.

विकलांगांसाठी ५ सेवा केंद्रे

एकवीस वर्षे पूर्ण झालेल्या विकलांग मुलांच्या पुनर्वसनासाठी ‘जीवन ज्योत’ या योजनेखाली ताबडतोब ५ ‘डे केअर’ केंद्रे उघडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समाजकल्याणमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांना दिली.

सर्व शिक्षा अभियानसाठी यंदा २५ कोटी रु. मंजूर

सर्व शिक्षा अभियानाला यंदा २५ कोटी रु. मिळालेले आहेत. याशिवाय गेल्या वर्षीचे साडेतीन कोटी रु. शिल्लक असून त्यामुळे अभियानकडे यंदा २८ कोटी ५० लाख रु. एवढा निधी उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.

८५ वे मराठी साहित्य संमेलन चंद्रपूरमध्ये

दिन हरवलेला शिक्षक दिन

- देवेंद्र कांदोळकर

दरवर्षी येणार्‍या काही तारखांना विशेष असे महत्त्व प्राप्त झाले असून त्या तारखा देशभरात विशिष्ट दिन म्हणून साजर्‍या होत असतात. उदाहरणार्थ १५ ऑगस्ट म्हणजे ‘स्वातंत्र्य दिन’, २६ जानेवारी ‘प्रजासत्ताक दिन’, १४ नोव्हेंबरला ‘बालदिन’, ८ मार्चला ‘महिला दिन’, तसा ५ सप्टेंबर म्हणजे ‘शिक्षक दिन’ हे ठरलेलेच! एकादशी कोणी द्वादशीला साजरी करीत नाही. गणेश चतुर्थी पंचमीला होत नाही. गोकुळ अष्टमी नवमीला नसते, तसेच विजया दशमीही पुढे-मागे साजरी केल्याचे ऐकिवात नाही. परंतु आपल्या सरकारने मात्र ५ सप्टेंबरला येणारा शिक्षक दिन चक्क चार दिवसांनंतर म्हणजे ९ सप्टेंबरला साजरा केला. कारण काय? तर म्हणे, ५ सप्टेंबरला शाळांना सुट्टी होती म्हणून! अर्थात् असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत.

भुर्दंड योजना

राज्यातील प्रत्येक कुटुंबाला साठ हजार रुपयांपर्यंतचा उपचार सरकारी तसेच खासगी इस्पितळांमध्ये मोङ्गत मिळवून देणारी विमा योजना सरकारने काल जाहीर केली. वरवर पाहाता एका खासगी विमा कंपनीच्या विद्यमाने लागू केलेली ही योजना आकर्षक जरी वाटत असली, तरी तिच्या प्रत्यक्ष कार्यवाहीबाबत अनेक प्रश्नचिन्हे आहेत, ज्यांचे निराकरण व्हायला हवे. साठ हजार रुपयांपर्यंतचा उपचार खर्च सरकार करणार आहे, याचाच अर्थ त्यावरील सारा खर्च रुग्णांना सोसावा लागणार आहे. सरकारी इस्पितळांतील मोङ्गत उपचार सुविधा रद्दबातल करण्यात येत आहे असाच त्याचा सरळसरळ अर्थ होतो. खरे तर पन्नास - साठ हजारांपर्यंतचा खर्च कोणताही रुग्ण येथून - तेथून पैसा गोळा करून, प्रसंगी दागिने विकून भागवू शकेल, परंतु त्यावरील प्रचंड खर्च सोसण्यासाठीच त्याला पाठबळाची गरज असते. मात्र, या योजनेत नेमके उलट घडणार आहे.

पुरवठ्यात दीरंगाईमुळे गोव्यात पेट्रोल कमतरता

शाह आयोगाकडून बेकायदेशीर खाणींवर कडक कारवाईची अपेक्षा

सुवर्णजयंती विमा

Story Summary: 

सुवर्णजयंती विमा योजनेच्या करारपत्राचे आदान प्रदान करताना आयसीआयसीआय लोबार्डचे संजय दत्रा व आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई. सोबत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, आरोग्य सचिव बी. विजयन् व इतर.

सर्व कुटुंबांना ‘सुवर्ण जयंती विमा’ संरक्षण सरकारी इस्पितळांत ६० हजारांवरील उपचार सशुल्क

Story Summary: 

संपूर्ण राज्याचा विमा उतरविण्याचा देशातील पहिला प्रयोग

५ वर्षांहून जास्त काळ गोव्यात वास्तव्य असलेली कुटुंबे पात्र

३.२ लाख कुटुंबांना लाभ

पुढील तीन महिन्यांच्या काळात संपूर्ण गोव्यात सुवर्ण जयंती आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले. या योजनेसाठीच्या समझोता करारावर काल आरोग्य सचिव बी. विजयन् व आयसीआयसीआय लोबार्डचे अधिकारी संजय दत्रा यांनी सह्या केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला १०० रु. भरून आयसीआयसीआय लोबार्डकडून कार्ड मिळवावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

आमदारांचे कॉंग्रेस प्रवेश थांबवले

Story Summary: 

अन्य एका आमदाराचा प्रवेश निश्‍चित

अन्य पक्षातील आमदार फोडून आणण्यावरून सध्या कॉंग्रेस पक्षात वातावरण तापले असून या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी दुसर्‍या पक्षातील आमदारांना कॉंग्रेस प्रवेश देण्यास तूर्त मनाई केल्याचे वृत्त आहे.

आमदार फोडण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर श्रेष्ठींनी मुख्यमंत्री दिगंबर कामत व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना तातडीने दिल्लीस बोलावून घेतले होते.

वेश्या व्यवसाय प्रकरणातील मुख्य आरोपी सोनूस अटक

Story Summary: 

बाहेरगावांहून मुली आणून त्यांना नादी लावून त्यांना वेश्या व्यवसायात गुंतवणार्‍या टोळीतील मुख्य आरोपी सोनू ऊर्फ रामबहादूर थापा, उत्तरांचल (३२) याला काल पेडणे पोलिसांनी बांबोळी येथे इस्पितळात आपल्या पत्नीला भेटण्यास गेला असता अटक केली. त्याला न्यायालयात उभे करण्यात आले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पेडण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १३ ऑगस्ट रोजी सरोज सिंग या मुलीला पोलिसांनी वेश्या व्यवसायाच्या संशयावरून ताब्यात घेतले होते.

पणजीतील खून प्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये अटक

पणजी येथील पाव भाजीच्या गाड्यावर काम करणार्‍या तौफिक अहमद या वेटरच्या डोक्यावर लोखंडी मोटर घालून त्याचा निर्घृणरित्या खून करणारा आरोपी धर्मेंद्र उर्फ राजू उर्फ छोटू रामकरम राजबार (१९) या आरोपीला पणजी पोलिसांनी काल उत्तर प्रदेशात अटक केली.

वास्कोच्या तेलवाहिन्यांतून पेट्रोल सोडणे तूर्त अशक्य

केरोसीन, डिझेलसाठी प्रस्ताव; पंपांवर रांगा

वास्को आग दुर्घटनेनंतर बंद ठेवण्यात आलेल्या मुरगाव बंदर ते झुआरीपर्यंतच्या इंधनवाहिन्यांतून शीघ्र पेट घेणारे पेट्रोल व नाफ्ता सोडणे शक्य नसल्याचे नागरी पुरवठा संचालक एस. पी. मसुरकर यांनी म्हटले आहे. राज्यात उद्भवू शकणार्‍या पेट्रोल टंचाईच्या पार्श्वभूमीवर काल नागरी पुरवठा सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पेट्रोल कंपन्यांचे प्रतिनिधी व प्रमुख विक्रेतेही उपस्थित होते. दरम्यान, तेल वाहिन्यांतून केरोसीन व डिझेल सोडण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव सरकारला सादर करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

अमर कांत व श्रीलाल शुक्ल, चंद्रशेखर कंभार यांची निवड

साहित्याच्या क्षेत्रात भारतातील सर्वोच्च समजल्या जाणार्‍या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी हिंदी लेखक अमर कांत व श्रीलाल शुक्ला यांची २००९ वर्षासाठी तर कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंभार यांची २०१० वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

डॉ. सीताकांत महापात्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली.

राज्यातील मतदारयाद्यांची येत्या महिन्यात उजळणी

४० हजार नवे मतदार

दि. २९ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर या ३० दिवसांच्या काळात राज्यातील मतदारयाद्यांची उजळणी होणार असून मतदारयाद्यांना अंतिम रूप देईपर्यंत, म्हणजे पुढील दोन महिन्यांच्या काळात ४० हजार नव्या मतदारांची नावनोंदणी केली जाईल. युवकांची नोंदणी करून घेण्यासाठी प्रथमच महाविद्यालये, नेहरू युवक केंद्र व एनएसएस स्वयंसेवकांची मदत घेण्याचे ठरविले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी गणेश कोयू यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

इफ्फी : तारखांवर मतभेद; समझोता करार अडला

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखांवरून गोवा सरकार व चित्रपट महोत्सव संचालनालय यांच्यात मतभेद झाल्याने इफ्फीसाठीच्या समझोता करारावर सह्या होऊ शकल्या नसल्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

माता एकवेळ माफ करेल, माती नव्हे!

- दिलीप बोरकर

गोव्यातील बेकायदा खनिज व्यवसायाच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती एम्. बी. शाह यांच्या अध्यक्षतेखालील एक पथक गोव्यात आले आणि या बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्या महाभागांचे धाबे दणाणले. गोव्याच्या भूमीचा चालवलेला विद्ध्वंस आणि पर्यावरणाची लावण्यात येत असलेली वाट पाहून चिंताग्रस्त झालेल्या पर्यावरणप्रेमींना एक आशेचा किरण दिसलेला आहे, हे मात्र निश्‍चित!

कौतुकास्पद कारवाई

मडगाव येथील अल्पवयीन बालकाचे अपहरणकांड अवघ्या काही तासांत सोडवून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळणार्‍या पोलीस पथकाचे अभिनंदन करावेच लागेल. ज्या तत्परतेने आणि नियोजनबद्ध रीतीने त्यांनी अपहरणकर्त्यांचा अपहरणाचा डाव उधळून लावला आणि बालकाची मुक्तता केली, ती सारीच थरारक कारवाई प्रशंसनीय आहे. या अपहरणनाट्यातील आरोपींनी केलेला बालीशपणा पाहाता एकंदर प्रकरणासंदर्भात काही शंका उपस्थित होत असल्या, तरीही दोन्ही गुन्हेगार गवसले असल्यामुळे त्याचा अधिक उलगडा येत्या काळात होईलच. आजवर गोव्यातील गुन्हेगारीचे खापर परप्रांतीयांवर फोडून मोकळे होणार्‍यांना या अपहरणनाट्यातील दोन्ही आरोपी गोमंतकीय आहेत हे ऐकून धक्का बसेल, परंतु कोणताही गुन्हेगार हा परप्रांतीय असो वा गोमंतकीय असो, गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगारच असतो. त्याच्या अंगातील खुनशी, दुष्ट प्रवृत्ती शेवटी सारखीच असते. अलीकडच्या काळात गोव्यात गुन्हेगारी गंभीर रूप धारण करू लागली आहे. भर रस्त्यातली टोळीयुद्धे, दिवसाढवळ्या होणारी अपहरणे, जबरी चोर्‍या यांमुळे जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते आहे.

खाण व्यवसायाचे परवाने नसल्याचा नगरविकास मंत्री ज्योकीम आलेमांव यांचा दावा

पणजीतील खून प्रकरणी आरोपीस उत्तर प्रदेशात अटक

योगमार्ग - राजयोग सत्य - १९

- डॉ. सीताकांत घाणेकर

कर्माचा महिमा अगाध आहे. कर्माप्रमाणे प्रत्येकाला फळ मिळते. म्हणून आपले पूर्वज कर्म करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला सांगत. ही गोष्ट चांगली आठवणीत राहावी व प्रत्येकाच्या हातून सत्कर्मच घडावे म्हणून अनेक साध्या म्हणी त्यांनी प्रचलित केल्या होत्या. अगदी लहान वयापासून या म्हणी सहज बोलता-बोलता म्हटल्या जात. उदा. - करावे तसे भरावे, पेराल तेच उगवेल.... लहानपणी आम्ही अशा म्हणी ऐकत असू पण त्यावेळी त्यांचे गांभीर्य व तीव्रता कळली नाही. पण आज ज्यावेळी आपल्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करतो, इतिहासाकडे नजर टाकतो किंवा अनेकांच्या आयुष्यातील घटना जवळून बघतो तेव्हा ह्या म्हणींचा संदर्भ कळतो, वर्तमानकाळात घडत असलेल्या गोष्टींचे बी भूतकाळात पेरले गेले होते, हे सत्य मजते.

मधुमेह चिंतेचा विषय

- वैद्या प्रियंका कामत

अलीकडे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे. विशेषतः तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे आढळते. दर चार व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असल्याचे दिसून येते. देशभरात चार कोटीपेक्षा जास्त मधुमेही रुग्ण असून निदान न झालेल्यांचीही संख्या कितीतरी असेल. वैद्यकीयदृष्ट्या हा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. शहरी भागातील आधुनिक जीवनशैली व वाढती फास्टफूड संस्कृती यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मधुमेह हा आधुनिक आयुष्याचे अविभाज्य अंग होतो की काय? असे वाटू लागले आहे. मधुमेहाचे बालरुग्णही आढळू लागले आहेत.

लोकायुक्त विधेयकाचा मसुदा

Story Summary: 

लोकायुक्त विधेयकाचा मसुदा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सादर करताना कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप. सोबत ऍड. क्लिओफात कुतिन्हो.

सहकारी संस्था व स्वयंसेवी संघटनाही लोकायुक्तांच्या कार्यकक्षेत

Story Summary: 

कायदा आयोगाचा विधेयकाचा मसुदा आगामी अधिवेशनात

कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट घेऊन लोकायुक्त विधेयकाचा मसुदा सादर केला. या विधेयकावर अभ्यास करून आगामी विधानसभेत ते मांडणार असल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.

लोकायुक्त विधेयक तयार करताना जनलोकपाल, लोकपाल, गोवा सार्वजनिक भ्रष्टाचारविरोधी कायदा आदींचा आधार घेतला असून प्रशासनातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणे या कायद्यामुळे शक्य होणार असल्याचे ऍड. खलप यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. क्लिओफात उपस्थित होते.

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून विद्यार्थ्याची सुटका

Story Summary: 

पोलिसांकडून गोळीबार, दोघांना अटक

काल मडगावातील एका फिल्मी स्टाईल कारवाईत पोलिसांनी अपहरण झालेल्या आठ वर्षीय विद्यार्थ्याची फोंडा बायपास रस्त्यावर सुटका केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. यापैकी एक मोती डोंगर येथील असून दुसरा पाजीफोंड येथील आहे. कारवाईत पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या वाहनांवर पिस्तुलाच्या आठ फैरी झाडल्या. कमीत कमी वेळात व मोजकी कुमक वापरून ही कारवाई करण्यात आली.

घटनेविषयी अधिक माहिती देताना डीआयजी रवींद्र यादव यांनी सांगितले की, अटक केलेल्यांची नावे रुपेश ऊर्फ उदय फाळकर (३२), मोतीडोंगर व दुल्शिदोनियो विठ्ठल फर्नांडिस, पाजीफोंड अशी आहेत. विद्यार्थ्याचे अपहरण केल्यानंतर त्याच्या वडलांकडे २० लाख रु.ची मागणी करण्यात आली होती.

फेब्रुवारी अखेरीस निवडणूक घेण्याचा विचार

Story Summary: 

आगामी गोवा विधानसभा निवडणूक फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यात म्हणजे दि. २४ रोजी घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विचार चालविल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. गोवा विधानसभा बरखास्त झाल्यानंतर आयोग अधिकृतपणे तारीख जाहीर करील.

या पार्श्‍वभूमीवर डिसेंबरला पहिल्या आठवड्यात गोवा विधानसभा बरखास्त केली जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाल्यानंरच विधानसभा बरखास्त करण्याचा सरकारचा विचार आहे.

ट्रकखाली चिरडून बालक ठार

पाजीमळ उगे-सांगे येथे ॐकार संजय नाईक या चार वर्षीय बालकाचा ट्रकखाली सापडून अंत झाला. ही घटना काल दुपारी १२.१५ वाजता उगे ग्रामपंचायतीजवळ घडली.

नुसते जीवन जगण्यापेक्षा त्याचे सार्थक होऊ द्या

प्रा. द. भि. नाईक गौरव सोहळ्यात संघ सहकार्यवाह सुरेशजी सोनी यांचे उद्गार

एखादी व्यक्ती किती वर्षे जगली अथवा तिचे जीवन सफल झाले की नाही यापेक्षा त्या व्यक्तीच्या जीवनाचे सार्थक झाले की नाही हे महत्त्वाचे असते. प्रा. दत्ता भि. नाईक यांनी आपले जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित केल्याने त्यांच्या आजवरच्या जीवनाचे सार्थक झाले आहे, असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह सुरेशजी सोनी यांनी काल प्रा. नाईक यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्ताने आयोजित केलेल्या सोहळ्यात प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना काढले. षष्ट्यब्दीपूर्तीनंतर न थांबता यापुढील कालखंडही आपल्या देशापुढील समस्यांच्या सोडवणुकीसाठी व्यतित करण्याचा निश्‍चय प्रा. नाईक यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.

पेट्रोल दरवाढीविरुद्ध पणजीत निदर्शने

केंद्र सरकारने केलेली पेट्रोल दरवाढ व प्रस्तावित एलपीजी दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने काल येथील कदंब बस स्थानकाजवळील क्रांती सर्कलवर निदर्शने करून पेट्रोल दरवाढ तात्काळ ’ागे घेण्याची व एलपीजी दरवाढ न करण्याची ’ागणी केली.

रासुका : ४३ गुंडांची यादी तयार

पणजी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यकक्षेत येणार्‍या पोलीस स्थानकांच्या क्षेत्रातील ८ गुंडांच्या नावांची यादी ‘रासुका’साठी तयार ठेवल्याची माहिती अधिकत सूत्रांकडून मिळाली आहे. एकूण ४३ जणांची यादी तयार केली आहे.

आरोपांनंतर कर्नाटक लोकायुक्तांचा राजीनामा

नियमभंग करून पत्नीसह गृहबांधणीची जागा मिळविल्याच्या आरोपानंतर कर्नाटकचे लोकायुक्त शिवराज विरुपन्ना पाटील यांनी राजीनामा दिला.

एन. संतोष हेगडे यांचा कालावधी संपल्यानंतर पाटील यांची दीड महिन्यापूर्वी लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असलेल्या पाटील यांनी ३ ऑगस्ट रोजी पद स्वीकारले होते.

तेलवाहिनी बंद असल्याने ३५ टक्के पेट्रोल पंप बंद

वास्को येथील नाफ्ता दुर्घटनेनंतर तेलवाहिनी बंद ठेवल्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत गोव्यातील ३५ टक्के पेट्रोल पंप बंद पडले असल्याची माहिती गोवा पेट्रोल वितरण संघटनेने दिली आहे.

भूकंपातील मृतांची संख्या ५०

परवा संध्याकाळी ईशान्य व उत्तर भारतातील राज्यांत आलेल्या भूकंपात मृत्यू पावलेल्यांची संख्या ५० झाली आहे. यात सिक्कीममधील २३ जणांचा समावेश आहे. दरम्यान, ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने मार्ग बंद झाले असून त्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत.

न्या. शाह यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा

गोव्यातील दोन अपरिचित वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे

- नारायण विनू नाईक, मंगेशी.

मंदिरे ही मनुष्याची संस्कार केंद्रे असून त्या संस्कारातूनच मानवी जीवन सार्थकी लागत असते. देवाच्या भक्तीने मानवामध्ये क्रांती होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आध्यात्मिक शक्तीच तारक आहे. जनसमुहामध्ये देव भक्ती निर्माण करीत असतात.

जगात विश्‍वशक्ती आहे. तिलाच ईश्‍वर किंवा भगवंत म्हणतात. तिची उत्पत्ती, स्थिती, लय आणि तिचाच अंश प्रत्येकाच्या शरीरात आत्मशक्तीच्या रूपाने वावरत असतो. प्राचीन भारतीयांनी जो आदर्श समोर ठेवला, त्याला त्यांनी देव असे नाव दिले आहे. देव या शब्दाचा अर्थच आहे, प्रकाश देणारा, मार्गदर्शन करणारा. या देवाची भक्ती करावी. भक्ती या शब्दाचा अर्थ आहे, मनातले प्रेम व सद्भावना. त्या त्याच्या चरणावर अर्पण करायला हवे.

सिक्कीमवरचे संकट

रविवारच्या भूकंपाने अर्धाअधिक देश हादरला. किल्लारी आणि गुजरातच्या आठवणी त्याने ताज्या केल्या. त्या दोन्हींच्या तुलनेत सिक्कीममध्ये केंद्र असलेल्या परवाच्या भूकंपाची तीव्रता जरी कमी असली, तरीही मोठी हानी झालेली आहे. सिक्कीमची भौगोलिक डोंगराळ रचना लक्षात घेता मृतांची आणि जखमींची संख्या वाढणार तर आहेच, परंतु भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, रस्त्यांपासून संपर्क यंत्रणेपर्यंत सर्व व्यवस्थांची फेरउभारणी हे फार मोठे आव्हान असेल. या भूकंपाचे हादरे जवळजवळ संपूर्ण उत्तर व ईशान्य भारतात बसले. सिक्कीमप्रमाणेच नेपाळ, तसेच पश्‍चिम बंगालच्या जलपायगुडी आणि बिहारच्या नालंदा, दरभंगा जिल्ह्यांमध्येही हानी झाल्याच्या बातम्या आहेत. आधीच दूरस्थ असल्यामुळे दुर्गम मानल्या जाणार्‍या सिक्कीममध्ये मदत आणि पुनर्वसनाचे आव्हान आता केंद्र आणि राज्य सरकारला पेलायचे आहे. या भूकंपानंतर दिलासादायक अशी एक बाब घडली ती म्हणजे संध्याकाळी सहाच्या सुमारास भूकंप आला आणि अवघ्या एक - दोन तासांत मदतसामुग्री घेऊन केंद्रीय मदतपथके भारतीय हवाई दलाच्या पाच विमानांनी सिक्कीमकडे रवाना झाली होती.

Chairman of Law Commission hands over redrafted Goa Lok Pal Bill to the Chief Minister; Kamat assures to pass the bill in the coming session

Political leaders, including cabinet members, ensured that the Shah Commission heard them too

भूकंपाचा तडाखा

Story Summary: 

भूकंपाच्या हादर्‍यांमुळे सिक्कीम राज्यातील एका भागात कोसळून पडलेला मंदिराचा भाग.

सिक्कीमला भूकंपाचा तडाखा

Story Summary: 

दिल्लीसह उत्तरेतील अन्य राज्यांमध्ये हादरे

१८ ठार, १००पेक्षा जास्त जखमी

काल संध्याकाळी ६.११ वा. पासून बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी सिक्किम हादरले. ईशान्य तसेच उत्तर भारतातील राज्यांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू सिक्कीमची राजधानी गँगटोकपासून ५० कि.मी. अंतरावर सिक्कीम-नेपाळ सीमेवर होता. भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी रिश्टर स्केल इतकी नोंद झाली. भूकंपामुळे भारतात व नेपाळमध्ये मिळून १८ ठार झाल्याचे वृत्त होते. १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.

भूकंपाचा सर्वाधिक तडाखा सिक्किमला बसला आहे. ईशान्येतील अन्य राज्यांनाही फटका बसला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान तसेच पश्‍चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, झारखंड, चंदीगढ या राज्यांतही हादरे जाणवले व नुकसान झाले. मृतांमध्ये सर्वाधिक सात सिक्कीममधील, चार पश्‍चिम बंगालमधील, दोन बिहारमधील आहे. नेपाळमध्ये पाच जण मरण पावलले. अनेक जण ठिकठिकाणी जखमी झाल्याचे वृत्त असून सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर लोक अडकून पडले असल्याचे वृत्त होते.

पाकिस्तान सरकारचा दहशतवाद्यांशी संबंध

Story Summary: 

पुरावे असल्याचे अमेरिकी राजदूताचे वक्तव्य

पाकिस्तान सरकारचे तालिबानसमर्थक हकानी दहशतवाद्यांची संघटनेशी संबंध दर्शवणारे पुरावे असल्याचे काल अमेरिकी राजदूत कॅमेरून मुंटर यांनी सांगितल्याने खळबळ उडाली. गेल्या आठवड्यात काबूलमध्ये नाटो कार्यालय व अमेरिकी दूतावासावर झालेल्या हल्ल्यात हकानी संघटनेच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

रेडियो पाकिस्तानवर केलेल्या वक्तव्यात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान सरकारचा संबंध काबूलमध्ये हल्ला करणार्‍या हकानी दहशतवाद्यांशी असल्याचे पुरावे आहेत. हे थांबले पाहिजे.

खचतोय चोर्ला घाटातील रस्ता कळसा कालव्याच्या खोदकामामुळे

Story Summary: 

कर्नाटक सरकारच्या कळसा कालव्याच्या बांधकाम खोदकामामुळे कणकुंबी येथून जाणारा चोर्ला घाट बेळगाव - पणजी रस्ता संकटात सापडला आहे. यंदाच्या पावसात प्रारंभीच कळसा कालव्यासाठी केलेल्या खोदकामामुळे हा रस्ता खचला होता आणि जवळजवळ एक महिना पणजी - बेळगाव वाहतूक बंद होती.

सध्या या भागात पावसाचा जोर चालूच असून कर्नाटक सरकारने अजून कळसा कालव्याचे काम चालू केलेले नसले तरी पाऊस ओसरल्यानंतर कालव्याच्या खोदकामाला मोठ्या प्रमाणात गती दिली जाणार असल्याने त्यांची पूर्वतयारी सुरू झाली आहे.

ट्रक उलटून दोन ठार

काल सकाळी १०च्या दरम्यान मोले ते धारबांदोडा दुर्गिणी येथे झालेल्या भीषण अपघातात ट्रकचा चालक उमा शंकर (२८) मूळ राहणार बिहार व क्लिनर मनोज सिंग (२६) झारखंड हे दोघेही जागच्या जागी मरण पावले.

विकलांग विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत

२१ वर्षे पूर्ण केलेल्या संजय स्कूलमधील विकलांगाना १४ ऑक्टोबरपर्यंतच ठेवण्यास सरकारने मुदत दिली असून त्यानंतर त्यांना तेथे ठेवणार नसल्याचे संस्थेच्या व्यवस्थापनाने कळविले आहे.

शेतीला तूर्त धोका नाही कृषी संचालकांचे मत

पावसाचे प्रमाण सध्या कमी झाल्याने आजच्या घडीला राज्यातील शेतीला नुकसान होण्याचा धोका टळला असून पुढील पंधरा दिवसांत भात पिकण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी सांगितले.

आमदार फोडण्याचा कॉंग्रेसवरच परिणाम ?

भाजपातील आमदारांना आपल्या पक्षात फोडून आणण्याच्या कॉंग्रेस नेत्यांच्या मोहिमेमुळे कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांत सध्या खळबळ माजली असून या प्रकारामुळे दोन्ही पक्ष कमकुवत बनतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

मेरशी-कुडका मार्गावरील पुलास तडे

मेरशी-कुडका मार्गावरील कामाक्षी प्लाझाजवळ असलेला ३ ते ६ मीटर लांबीच्या पुलाला तडे पडले असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भागातील नागरिकांनी चिंता व्यक्त करून सरकारने त्वरित उपाय घेण्याची मागणी करणारे निवेदन मेरशी येथील नागरिकांनी सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांना सादर केले आहे.

नेपाळमध्ये पाच ठार

हवाई दलाची विमाने रवाना

आग्रा स्फोट : ४ जण ताब्यात

आग्रा येथील इस्पितळात झालेल्या स्फोट प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी काल चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.दरम्यान, या स्फोटांत दहशतवाद्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे उत्तर पोलीस महासंचालक ब्रिज लाल यांनी सांगितले. तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी राज्यमंत्री स्वामी प्रसाद मौर्य उपस्थित होते. मौर्य यांनी जखमींना एक लाख रु. भरपाई जाहीर करताना स्फोटांसंबंधी धागेदोरे देणार्‍यास रु. ५० हजारचे बक्षीस जाहीर केले.

लोक कामे करून घेतात व नंतर बोलतात

बाबू आजगावकर

लोक राजकारणी लोकांकडून कामे करून घेतात आणि नंतर कामाच्या संदर्भात टक्केवारीची भाषा करतात त्यामुळे राजकारण्यांची पत खालावते असे पंचायत मंत्री बाबू आजगावकर यांनी काल येथे बोलताना सांगितले. भ्रष्टाचार आटोक्यात येण्यासाठी लोकायुक्त विधेयक लवकर यायला हवे असेही त्यांनी बोलून दाखलवले.

मी अनुभवलेले नाईक सर

- राजकुमार देसाई, पर्वरी

२९ वर्षांपूर्वी मी ज्यावेळी अकरावीत शिकत होतो, त्यावेळी

माझा नाईक सरांशी परिचय झाला. सुरवातीला त्यांच्याशी

बोलायला भीती वाटायची. पण त्यांच्या स्वभावामुळे मी त्यांच्याशी

कधी समरस झालो हे समजलेच नाही.

गोव्यात माझ्या अंदाजे १९८२ - ८३ साली अ.भा.वि.प. चे सक्रिय काम सुरु झाले. मी त्यावेळी जी.व्ही.एम. उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत होतो, त्यावेळी माझ्याकडे फोंडा शाखेची जबाबदारी आली. हळूहळू विद्यार्थी परिषदेच्या कामात मी रमलो व नाईक सरांशी संपर्क येऊ लागला. त्यावेळी त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर मी चर्चा करायचो. त्यामुळे खूप गोष्टी मी शिकू शकलो. विशेष म्हणजे नाईक सर वयाने मोठे असले तरी त्यांच्याशी कुठल्याही वैयक्तिक विषयावर बोलायला भीती वाटत नव्हती. माझ्या जडणघडणीत नाईक सरांचा मोठा वाटा

आहे.

वीज टंचाईचे संकट

राज्याला भेडसावू शकणार्‍या संभाव्य वीजटंचाईचे सूतोवाच करून वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी येऊ घातलेल्या संकटाची माहिती नागरिकांना दिली हे बरे झाले. जनतेमध्ये आपल्या खात्याविषयी नाराजी निर्माण होऊ नये यासाठी ज्या तत्परतेने त्यांनी वस्तुस्थिती जनतेपुढे ठेवली, ती कौतुकास्पद आहे. त्यांनी सांगितलेली बरीचशी माहिती चुकीची आहे हा भाग वेगळा. त्यांनी मांडलेल्या माहितीवरून एक गोष्ट मात्र पुरेपूर नजरेस येते, ती म्हणजे गोवा मुक्तीचा सुवर्णमहोत्सव आज आपण साजरा करीत असतानाही विजेच्या बाबतीत आपण संपूर्णपणे इतर राज्यांवर अवलंबून आहोत. अर्थात, गोवेकरांना हे सगळ्याच बाबतीत सवयीचे झाले आहे. माशांपासून भाजीपाल्यापर्यंत आणि अन्नधान्यापासून फळफळावळीपर्यंत सारे काही इतर राज्यांतून येथे येते. स्वयंपूर्णतेचा आपण ना कधी प्रयत्न केला, ना कधी त्या दिशेने धडपड केली.

दिला धोका ओहोटीने

- कृष्णा महादेव शेटकर

१९५६ सालातील एप्रिल महिना. आयएनएस तीर नेव्हल कॅडेट ट्रेनिंग शीप पूर्वेकडील देशांच्या सदिच्छा भेटीवर असताना दहा दिवसांकरिता इंडोनेशियामधील जकार्ता बंदरात होते. तिथल्या वास्तव्यात माझा मित्र रीतपालसिंग राठोड अकस्मात आजारी पडल्यामुळे त्याला जकार्तामधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. तिथेच त्या हॉस्पिटलमध्ये रीतपालच्या शेजारच्या कॉटवर एक फ्रेंच नौसैनिक होता. रीतपालला संध्याकाळी माझे भेटायला जाणे व्हायचे. तो फ्रेंच नौसैनिक कॉटवर बसून डायरीत काहीतरी लिहीत असताना मी सहज त्याला विचारले, ‘‘कसा आहेस तू?’’ जवळच तिथे एक इंडोनेशियन नर्स उभी होती. तीच म्हणाली, ‘‘हा फ्रेंच नौसैनिक जकार्ता बंदराच्या बाहेर एका राफ्टवर बेशुद्धावस्थेत असताना आमच्या कोळ्यांना मिळाला. त्या कोळ्यानेच त्याला इथे ऍडमिट केले. तीस दिवस तो भर समुद्रात तराफ्यावर होता. कोलंबो ते जकार्तापर्यंत येण्यास त्याला तीस दिवस लागले. तो त्या तीस दिवसांची डायरी लिहीत आहे.’’

खाणसमर्थकांचे शक्तिप्रदर्शन

Story Summary: 

एम. बी. शाह आयोगासमोर बाजू मांडण्यासाठी सचिवालयातील परिषद सभागृहात झालेली गर्दी. (छाया : हेमंत परब)

शाह यांच्या जनसुनावणीत खाणसमर्थकांचे शक्तिप्रदर्शन

Story Summary: 

खाणींवरच अस्तित्व अवलंबून असल्याची भूमिका

बेकायदा खाणींविषयी चौकशी करण्यासाठी गोव्यात आलेले न्यायमूर्ती एम. बी. शाह यानी काल पर्वरी येथील सचिवालयात जनसुनावणी घेतली खरी, पण यावेळी खाणग्रस्त भागातून आलेले खनिजवाहू ट्रकचालक, खाण कंत्राटदार आदिनी या सुनावणीच्यावेळी कायदेशीर असोत अथवा बेकायदेशीर खाणी असोत, त्या बंद करण्याचा विचारही मनात आणू नका, या खाणींवर आमचे अस्तित्व अवलंबून असून त्या बंद केल्यास आमच्यावर आत्महत्या करण्याची पाळी येईल, अशी भूमिका मांडली.

या सुनावणीला हजर असलेले पर्यावरणवादी व बिगर सरकारी संघटनांच्या प्रतिनिधींना यावेळी वरील खाण ट्रकांच्या लॉबीने तोंडही उघडू दिले नाही. ज्यांनी बेकायदा खाणींचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी हुज्जत घातली गेली.

नरेंद्र मोदी यांचे तीन दिवसांचे सद्भावना उपोषण सुरू

Story Summary: 

जातीय सलोखा राखण्याची ग्वाही

गुजरात राज्य हे जगासाठी विकासासंदर्भातील आदर्श राज्य ठरेल असा विश्वास व्यक्त करीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या तीन दिवसांच्या ‘सद्भावना उपोषणा’स प्रारंभ केला. माझे हे उपोषण कोणाविरुद्ध नाही. ते माझे उद्दिष्ट कधीच नव्हते. जग आज गुजरातची विकास व प्रशासनासाठी ज्या प्रकारे कौतुक करते आहे, तसेच कौतुक सर्वस’ावेशक विकास आणि येथील जातीय सलोख्यासाठीही करील असे मोदी यांनी पुढे सांगितले.

आपल्या उपोषणाचा प्रारंभ करताना केलेल्या भाषणात मोदी यांनी २००१ सालचा भूकंप, २००२ सालची जातीय दंगल, २००८ ची बॉम्बस्फोटमालिका या घटनांचा उल्लेख करून सांगितले की, कसोटीच्या या प्रत्येक क्षणातून लोक अधिक सक्षम होऊन उभे राहिले आहेत व विकासाची नवी उंची त्यांनी गाठली आहे.

आझिलोचे स्थलांतर भाजपाने तीन वर्षे केलेल्या पाठपुराव्यामुळे

Story Summary: 

लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे प्रतिपादन

म्हापसा येथील आझिलो इस्पितळातील सर्व उपचार सुविधा तेथील नव्या जिल्हा इस्पितळात हलविण्याचा जो निर्णय आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी घेतला आहे. त्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून याबाबत भाजप करीत आलेली मागणी पूर्ण झाली असल्याचे भाजपचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

आझिलो इस्पितळ नव्या इमारतीत हलवावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून भाजपने सातत्याने मागणी केली होती. पक्षाने त्यासाठी विधानसभेतही वेळोवेळी आवाज उठवला होता, असे पार्सेकर म्हणाले. मात्र, आपल्या हेकेखोरपणामुळे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी गेली तीन वर्षे लोकांना झुलवत ठेवले. त्यामुळे उत्तर गोव्यातील लोकांचे आरोग्य सुविधांअभावी खूप हाल झाल्याचे ते म्हणाले.

प्रत्येकाने आपले अनुभवविश्‍व वाढवावे

अतुल कुलकर्णींनी साधला रसिकांशी संवाद

प्रत्येक माणसाने आपलं अनुभव विश्‍व हे वाढवण्याची गरज असून त्याद्वारेच माणसाचं जीवन समृद्ध बनू शकेल, असे ख्यातनाम हिंदी-मराठी चित्रपट व नाटक कलाकार अतुल कुलकर्णी यांनी काल कला अकादमीत रसिकांशी संवाद साधताना सांगितले. दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवानिमित्त काल कला अकादमीत अतुल कुलकर्णी यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

अफझल गुरूसंदर्भातील ठराव काश्मीर विधानसभेत चर्चेस येणार

संसदेवरील हल्ल्यातील आरोपी अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेसंदर्भातील ठराव जम्मू व काश्मीर विधानसभेचे सभापती महंमद अकबर लोन यांनी कामकाजात समाविष्ट करून घेतला असून त्यावर या महिन्याच्या अखेरीस चर्चा व मतदान होणार आहे. उत्तर काश्मीरमधील लंगाट मतदारसंघातील अपक्ष आमदार अब्दुल रशीद शेख याने हा ठराव मांडला असून सभापती लोन यांनी आपल्याला आपला ठराव दाखल करून घेतल्याचे सांगितल्याची माहिती त्याने दिली.

गॅस, डिझेल दरवाढ तूर्त नाही ः मुखर्जी

स्वयंपाकाचा गॅस, डिझेल व केरोसीनचे दर वाढवण्याचा सध्या विचार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल सांगितले. कच्च्या तेलाच्या दरांवर भारत सरकारचे नियंत्रण नसल्याचे ते म्हणाले. भारताला दरवर्षी १०० दशलक्ष टन तेल लागते. त्यापैकी ७५ टक्के तेल आयात केले जाते.

दिल्ली बॉम्बस्फोटाचा आणखी एक बळी

दिल्ली येथील उच्च न्यायालयाबाहेर ७ सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील आणखी एका जखमीचे काल निधन झाले. ५८ वर्षीय रतनलाल यांच्या निधनामुळे मृतांची संख्या १५ झाली आहे. रतनलाल यांचे डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयात काल सकाळी ८.२० वाजता निधन झाले. स्फोटात त्यांचे पाय तुटले होते. काल त्यांनी आपली पत्नी व मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, ती पूर्ण केली गेली, असे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

विकलांग विद्यार्थ्यांच्या पुनर्वसनाची ग्वाही

पर्वरी येथील संजय स्कूलचा ताबा गोवा सरकारने स्थापन केलेल्या खास शिक्षणासाठीच्या संजय सेंटरने प्रोव्हेदोरियाकडून घेतला असल्याचे वरील स्वायत्त संस्थेच्या सदस्य सचिवानी विकलांग विद्यार्थ्यांसंबंधी काही वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या वृत्ताच्या संदर्भात म्हटले आहे. संस्थेवर शिक्षण खात्याचे प्रशासकीय नियंत्रण असून सध्या अस्तित्वात असलेल्या शिक्षण कायद्यानुसार खास गरजा असलेल्या विकलांग मुलांना वयाच्या २१ वर्षांपर्यंतच शिक्षण देणे शक्य आहे.

आग्रा येथील हॉस्पिटलात बॉम्बस्फोट

१५ जखमी

पणजीत वायू गळती

बस कलंडून ८ प्रवासी जखमी

Acknowledging that illegal mining activities were going on in many other Indian States, justice shah said illegal extreaction and export of ore was a loss to the nation

Aldona MLA Dayanand Narvekar estimates illegal mining in Goa could be to the tune of Rs 10,000 crore

मातृपितृ देवो भव:

- लाडोजी परब

भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षाला ‘म्हाळवस’ म्हणतात. पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचा हा काळ म्हणजेच श्राद्धपक्ष! ‘श्रद्धा’ या शब्दापासूनच श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोकी गेेलेल्या आपल्या वाडवडिलांची आठवण करण्याचा हा दिवस. आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या श्राद्धामागचा मूळ उद्देश आहे. ‘मातृपितृ देवो भव:’ ही संकल्पना पुढे नेत हिंदू धर्माने इतर धर्मीयांनाही एक आदर्श घालून दिला आहे.

महिलांमध्ये होणारे आजार

- लेखिका डॉ. उर्बा जोशी

आज-कालच्या महिला आपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका वठवत असतात. मग ती महिला एक आई असो, गृहिणी असो, वा नोकरी - व्यवसाय करून घर सांभाळणारी स्त्री असो! या सार्‍या महिला अशा तर्‍हेने आपापली विविध प्रकारे रूपे साकारताना बर्‍याचदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. काम करताना होणारी लहान-मोठी वेदना वा कमजोरीकडे दुर्लक्ष करून अनेक आजार वा रोगांना वाढायला, पसरायला बळ देतात. आमचं शरीर जेव्हा अशा तर्‍हेची वेदना, वाढ दाखवून आम्हांला सतर्क करते तेव्हा त्याची चाहूल आम्ही नजरअंदाज करून आमच्या जिवाला अधिक धोका निर्माण करीत असतो. अशा प्रकारचे कोणते वेगवेगळे आजार आम्हा बायकांना रोजच्या जीवनात त्रास देऊन नंतर गंभीर रोगांचे रूप धारण करू शकतात ते पाहूया.

डिचोलीतील खाणींना भेट

Story Summary: 

मुळगाव येथे ग्रामस्थांशी चर्चा करताना आयोगाचे पदाधिकारी. (छाया : विशांत वझे)

गॅस दरवाढ तूर्त टळली

Story Summary: 

घटकपक्षांचा आक्षेप; मंत्रिगटाची बैठक ऐनवेळी रद्द

प्रत्येक कुटुंबाला वर्षाला मर्यादित गॅस सिलिंडर्स अनुदानित किमतीत देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी काल बोलावण्यात आलेली प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाची बैठक यूपीए घटक पक्षांच्या विरोधामुळे ऐनवेळी रद्द करणे भाग पडले. यामुळे गॅस दरवाढ तूर्त टळली आहे.

या बैठकीवर यूपीएचे घटक पक्ष असलेल्या द्रमुक आणि तृणमुल कॉंग्रेसने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. सूत्रांनीही ‘काही सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक झाली नाही’ असा दुजोरा दिला.

न्या. शहा यांची डिचोलीतील खाणींना भेट

Story Summary: 

बेकायदा खाणींची चौकशी करणारे न्या. एस. बी. शहा यांनी काल डिचोलीतील खाणींना भेट देऊन पाहणी केली. मुळगाव येथे भेट देऊन त्यांनी गावकर्‍यांशीही संवाद साधला.

केंद्र सरकारने बेकायदा खाणींच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. शहा आयोग स्थापन केला आहे. काल न्या. शहा यांनी भेट देण्यावेळी आयोगाचे सदस्य यू. व्ही. सिंग, मुख्य वनपाल डॉ. शशी कुमार, वाहतूक खात्याचे अरुण देसाई, पोलीस अधीक्षक अरविंद गावस, जिल्हाधिकारी मिहिर वर्धन, उपजिल्हाधिकारी नारायण गाड, बोसेट सिल्वा, मामलेदार प्रमोद भट, गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी, इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे अधिकारी उपस्थित होते.

आझिलोचे स्थलांतर ३० सप्टेंबरपूर्वी

Story Summary: 

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची घोषणा

येत्या दि. ३० सप्टेंबरपर्यंत म्हापसा येथील आझिलो इस्पितळातील सर्व उपचार सुविधा तेथील नव्या जिल्हा इस्पितळात हलविण्यात येणार असून पीपीपी तत्वावर इस्पितळ चालविण्यासाठी कंपनीची निवड होईपर्यंत सर्व सुविधा नव्या इमारतीत उपलब्ध करण्याचा निर्णय आपण जनतेच्या हितासाठी घेतल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जिल्हा इस्पितळ पीपीपी तत्वावर देण्यासाठी आलेल्या निविदांवर फेर अभ्यास करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे सरकारची सल्लागार समिती त्यावर अभ्यास करून अहवाल सादर करील. आपण दिल्लीत जाऊन सॉलिसीटर जनरलचाही सल्ला घेतला आहे.

वीज पुरवठ्यावर परिणामाची शक्यता

तेलंगणा आंदोलनामुळे आज रामगुंडम वीज निर्मिती प्रकल्प बंद झाल्यास त्याचा गोव्याच्या वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकेल. तसे झाल्यास ४५ मॅगावॅट विजेची टंचाई निर्माण होईल. या समस्येवर पर्यायी व्यवस्था करण्याची सरकारने तयारी ठेवल्याचे वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

नव्या जुवारी पुलाची गरज : वीजमंत्री सिक्वेरा

राष्ट्रीय महामार्ग १७ वरील जुवारी पूल कमकुवत झाला आहे त्यामुळे ताबडतोब नवा पूल उभारण्याची गरज आहे. सरकारने गोवा पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे ‘एन्सुईटी’ या योजनेखाली जमीन ताब्यात घेवून पूल उभारण्याचे काम करावे, अशी मागणी वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी काल केली.

‘गोव्यातून गेल्या वर्षी ५४ अब्ज टन खनिज निर्यात’

गेल्या आर्थिक वर्षामध्ये गोव्यातून एकूण ५४.४५ अब्ज टन खनिज निर्यात झाल्याची माहिती गोवा बार्ज मालक संघटनेचे प्रमोद देसाई यांनी दिली.

२१ वर्षांवरील विकलांग विद्यार्थ्यांना संस्थेतून काढण्याचा प्रोव्हेदोरियाचा निर्णय

पालकांचे विरोधी पक्षनेत्यांस साकडे; मुख्य सचिवांची भेट

लोक सहाय्यता संस्था (प्रोव्हेदोरिया)च्या पुंडलिकनगर-पर्वरी येथील संजय स्कूल व म्हापसा येथील व्यावसायिक प्रशिक्षण आणि पुनर्वसन केंद्रातील वयाची २१ वर्षे पूर्ण केलेल्या विकलांग विद्यार्थी वच प्रशिक्षणार्थींना येत्या सोमवार दि. २९ पासून काढून टाकण्याचा निर्णय संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने घेतल्याने या मुलांच्या पालकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

गृहकर्ज महागणार

भारतीय रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या नव्या पतधोरणामुळे गृहकर्ज महागणार आहेत. ही महागणार आहे.

देशातील वाढत्या महागाईच्या दराला वेसण घालण्यासाठी भारतीय रिझर्व बँक आर्थिक साधन म्हणून पतधोरणामध्ये व्याजदरात बदल करत असते.

नरेंद्र मोदींचा आजपासून उपास

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा उपास आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर तामीळनाडूहून जयललिता यांनी व पंजाबहून प्रकाश सिंह बादल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अण्णा द्रमुक, शिरोमणी अकाली दल व शिवसेना आपल्या नेत्यांना मोदींच्या भेटीसाठी पाठविणार आहे. प्रकाश सिंह बादल आज मोदींच्या भेटीसाठी येणार असून भाजप नेते लालकृष्ण अडवाणीही उपोषणस्थळी उपस्थित असणार आहेत.

अझरुद्दीनच्या मुलाचे निधन

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचा मुलगा अयाझुद्दीन याचे अखेर काल इस्पितळात उपचारांदरम्यान निधन झाले.

पेडणे उपजिल्हाधिकार्‍यांना ४ दिवसांत निलंबित करा : निवेदन

बागवाडा मोरजी येथील शुभांगी बागकर हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रकरणी निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीला जबाबदार असलेले पेडणेचे उपजिल्हाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करणारे निवेदन मोरजी पेडणे येथील नागरिकांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांना सादर केले आहे. मिरजवर यांच्यावर चार दिवसांत कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

Story Summary: 

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री दिगंबर कामत. सोबत अभिनेत्री पूजा भट, रणधीर कपूर व इतर

पेट्रोल महागले

Story Summary: 

पेट्रोलचे नवे दर

गोवा - ६६.७०

दिल्ली - ६६.८४

मुंबई - ७१.६२

कोलकाता - ७१.१५

चेन्नई - ७०.६४

प्रति लिटर ३ रु. १४ पैसे दरवाढ

पेट्रोलच्या दरांत पुन्हा एकवार प्रति लिटर ३ रुपये १४ पैशांची वाढ करण्याची घोषणा तेल कंपन्यांनी काल केली. गेल्या चार महिन्यांतील ही दुसरी मोठी दरवाढ आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पेट्रोलियम सचिवांची मुंबईत भेट घेऊन तेल दरवाढीची मागणी केली होती. त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने कच्च्या तेलाची आयात करताना पेट्रोलियम कंपन्यांना भुर्दंड सोसावा लागत असल्याने दरवाढीची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, सातत्याने होत असलेल्या पेट्रोल दरवाढीमुळे आजच्या एलपीजीसंबंधी मंत्रिगटाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचे यूपीएचे घटक पक्ष द्रमुक व तृणमुल कॉंग्रेस यांनी ठरविले आहे.

सप्टेंबर २००९ नंतर प्रथमच रुपयाचे अवमूल्यन प्रति डॉलर ४८ रुपये झाले आहे. तेल कंपन्यांना प्रति लिटर २ रुपये ६१ पैसे तोटा सहन करावा लागत असून त्यामुळे दर दिवशी १५ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागत आहे.

गॅस दरवाढीची चिन्हे

Story Summary: 

प्रत्येक कुटुंबाला अनुदानित किमतीत ६ सिलिंडर्स

जादा सिलिंडरसाठी दुप्पट दर आकारणार

प्रस्तावावर आजच्या मंत्रिगट बैठकीत चर्चा

सातत्याने होत असलेल्या पेट्रोल दरवाढीनंतर आता गॅस दर भडकण्याची चिन्हे आहेत.

सरकारने इंधनावरील अनुदानात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे प्रत्येक कुटुंबाला वर्षाला केवळ ६ एलपीजी सिलिंडर्स अनुदानित किमतीत देण्याचा प्रस्ताव आहे. नंतरच्या प्रत्येक अतिरिक्त सिलिंडरला जवळ जवळ दुप्पट किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील एलपीजीसंबंधी मंत्रिगटाच्या आजच्या बैठकीत या विषयावर आज चर्चा केली जाणार आहे.

लोकायुक्त विधेयकाचा अंतिम मसुदा आज सरकारला सादर

Story Summary: 

लोकायुक्त विधेयकाच्या सुधारित मसुद्यावर कायदा आयोगाने काल शेवटचा हात फिरवून अंतिम रूप दिले असून आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भेट निश्‍चित करून सरकारला अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष ऍड्. रमाकांत खलप यांनी दिली.

येत्या विधानसभा अधिवेशनात लोकायुक्त विधेयक मांडण्याची सरकारने तयारी केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर गोव्यातही या विधेयकाच्या बाबतीत बरीच जागृती निर्माण झाली आहे.

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

कला, संस्कृती, भाषा याला सीमारेषा नसतात. सांस्कृतिक देवाण घेवाणीमुळे एकमेकांना समजून घेणे, अनुभव विश्‍व समृध्द करणे शक्य होते असे प्रतिपादन ख्यातनाम सिने अभिनेता रणधीर कपूर यांनी काल दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाच्या (साफ) उद्घाट सोहळ्यात केले.

व्याघ्र क्षेत्राच्या घोषणेपूर्वी सीमा निश्‍चिती

म्हादई अभयारण्य हे व्याघ्र क्षेत्र घोषित करण्यापूर्वी या व्याघ्र क्षेत्राच्या सीमा निश्‍चित कराव्या लागणार असल्याचे गोव्याचे मुख्य वनपाल शशीकुमार यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

स्मशान व्यवस्थापनाची कायदा आयोगाची मागणी

बागवाडा-मोरजी येथे अंत्यसंस्काराच्या प्रश्‍नावर निर्माण झालेला प्रसंग हा सरकारचे डोळे उघडणारा प्रसंग आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने कायदा आयोगाने सार्वजनिक स्मशान व दफन व्यवस्थापन यंत्रणा स्थापन करण्यासाठी सादर केलेला अहवाल ताबडतोब स्वीकारावा, अशी मागणी आयोगाचे अध्यक्ष ऍड्. रमाकांत खलप यांनी काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे केली आहे.

डिचोलीत भाजप व कॉंग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात

शुक्रवारी शक्तिप्रदर्शनची दोन्ही गटांची तयारी

डिचोली मतदारसंघात आमदार राजेश पाटणेकरांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता सक्षम उमेदवार उभा करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी कंबर कसलेली असून पाटणेकरांना टक्कर देणारा उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा उमेदवार भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता असणार की बाहेरून उमेदवार लादला जाणार याबाबतही आता पक्षपातळीवर चर्चेला उधाण आले आहे.

श्री श्री रवीशंकर यांचा २१ रोजी मिरामारला महासत्संग

आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनचे प्रणेते व जगद्विख्यात आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांच्या ‘आनंदोत्सव २०११’ या महासत्संगाचे आयोजन बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत मिरामार समुद्रकिनार्‍यावर करण्यात आले आहे.

न्या. शाह खाणग्रस्तांच्या तक्रारी ऐकणार

बेकायदेशीर खाण व्यवसायाचा पर्दाफाश करण्यासाठी गोव्यात दाखल झालेले चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम्. बी. शाह हे शनिवर दि. १७ रोजी पर्वरी येथील सचिवालयातील परिषदगृहात जनतेशी चर्चा करून खाणविषयक तक्रारी ऐकून घेणार आहेत.

म्हापशात विद्यार्थ्याची आत्महत्या

ते अधिकारी कोणत्याही क्षणी निलंबित

बागवाडा येथील स्मशानभूमीच्या वाद प्रकरणी वादग्रस्त ठरलेले पेडण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई व उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांच्या निलंबनाचा आदेश कुठल्याही क्षणी येऊ शकतो, असे संकेत सूत्रांनी दिले.

दिल्ली बॉम्बस्फोट : ‘हुजी’ सदस्य ताब्यात

दिल्लीत हायकोर्टासमोर झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारणारी ई-मेल पाठविणारा ‘हुजी’ संघटनेचा संशयित सदस्यास सुरक्षा दलांनी काल जम्मू काश्मीरमध्ये किश्तवर येथून ताब्यात घेतले. हाफिज अमिर असे त्याचे नाव असून तो बांगलादेशस्थित हरकत उल जेहादी संघटनेचा सदस्य असून त्यानेच दोन शाळकरी मुलांकरवी स्फोटांची जबाबदारी स्वीकारणारा ई-मेल पाठविल्याचा आरोप आहे.

कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी वीज खात्यात नवी पदे

वीज खात्यातील कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करता यावे यासाठी खात्यात नवी पदे तयार केली जात असून ती कधी भरायची याचा निर्णय मात्र मंत्रिमंडळालाच घ्यावा लागणार असल्याचे मुख्य वीज अभियंते निर्मल ब्रागांझा यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

आगामी काळात राजकीय संक्रमणाची शक्यता

- अशोक पार्सेकर, कोडार-फोंडा.

लोकशाही शासनप्रणाली चांगली असली तरी, त्यात सरंजामशाही, हुकूमशाही व बेबंदशाहीच माजवली जात आहे. त्यामुळेच देशात आजवर अनेक आर्थिक घोटाळे घडू शकले. या घोटाळ्यातून अब्जावधी रूपये राजकारणातील काही माफियांनी लाटले. विकासाचे प्रकल्प पुढे करून प्रत्यक्षात मोठे घोटाळे केले जात आहेत. भूमातेवरील अतिक्रमणे वाढत आहेत. शेतीे-बागायतीच्या जमिनीवर अतिक्रमणे करण्यात येत आहेत. ‘भ्रष्टाचार्यां’नी, भ्रष्टाचाराने देशाची अधोगती चालवलेली आहे. सत्तर टक्के खेड्यांच्या या भारत देशतील शेतकर्‍यांचा कणा ताठ ठेवण्यासाठी सतत कार्यरत् राहणारे लोकप्रतिनिधी व नेते देशात आज निर्माण का होत नाहीत?

दहशतवादी हल्ले थांबतील का?

- मोहन नाईक, सदाशिवगड - कारवार

‘देश दहशतवादी हल्ल्यांपासून कधी मुक्त होईल?’ दिल्ली उच्च न्यायालय परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हाच प्रश्‍न आज प्रत्येकजण एकमेकाला विचारत आहे. खरेच, हे दहा - अकरा वर्षांपासून सुरू झालेले आतंकवादी हल्ल्यांचे सत्र, ज्यामध्ये आजपावेतो शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी गेलेत, ते संपणार तरी कधी? दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात बळी जातो तो सामान्य माणसाचाच! ज्यांना कसल्याही प्रकारची सुरक्षितता नाही, जे लोक आपल्या पोटापाण्यासाठी अहोरात्र जगण्यासाठी संघर्ष करीत असतात.

उघड लूटमार

आधीच महागाईशी झुंजत असलेल्या ‘आम आदमी’च्या कंबरड्यात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल दरवाढीचा सोटा पुन्हा एकवार हाणला. गेल्यावर्षी जूनमध्ये पेट्रोलच्या किंमती ठरवण्याचे अधिकार सरकारने तेल कंपन्यांना बहाल केल्यानंतर गेल्या वर्षभरातील ही दहावी दरवाढ आहे. पेट्रोल दरवाढीबरोबरच स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांत दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव विरोधी आणि सहयोगी पक्षांच्या प्रखर विरोधामुळे तात्पुरता बारगळला असला, तरी भविष्यात अनुदानित गॅस सिलिंडरच्या प्रमाणातील कपात आणि त्यापुढील प्रत्येक सिलिंडरसाठी दुप्पट दरवाढ ही अटळ आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपये चौदा पैशांची परवाची दरवाढ करताना डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्याचे कारण तेल कंपन्यांनी पुढे केले. सप्टेंबर २००९ नंतर प्रथमच प्रति डॉलर मूल्य ४८ रुपये झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्च्या तेलाची आयात करणार्‍या या तेल कंपन्यांचा तोटा वाढला. त्यामुुळे तो थेट ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याचा प्रयत्न या कंपन्यांनी केला आहे. देशातील तिन्ही सरकारी प्रमुख तेल कंपन्यांची स्थिती वाईट आहे हे खरे आहे. सरकारच्या आजवरच्या अनुदान नीतीमुळे या तेल कंपन्या गाळात चालल्या आहेत.

‘चक दे..’

पाकिस्तानचा चार - दोन असा धुव्वा उडवून आशियाई चॅम्पियन्स चषक देशाला जिंकून देणार्‍या हॉकीपटूंना भारतीय हॉकी महासंघाकडून जी अपमानास्पद वागणूक मिळाली ती निषेधार्ह आहे. ही काही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. दरवेळी हॉकीपटूंना अशाच प्रकारची अपमानास्पद वागणूक दिली गेली आहे. एकीकडे हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असल्याचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे हॉकीपटूंना अशी हीन वागणूक द्यायची या ढोंगबाजीचा आता अतिरेक होऊ लागला आहे. क्रिकेटपटूंना परमेश्वर असल्यासारखे वागवणारे सरकार इतर देशी खेळांच्या खेळाडूंना मात्र सूतपुत्रासारखी वागणूक देते हे अनाकलनीय आहे. हॉकी फेडरेशनने आशियाई चषक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी फक्त पंचवीस हजार रुपये देऊ केले व तेही दिल्लीच्या ध्यानचंद स्टेडियमवर जाहीर समारंभ करून! स्वतःची लाज घालवणाराच हा सारा प्रकार होता. आमच्याकडे निधीची चणचण आहे, दिलेल्या मर्यादेत वागावे लागते, अंदाजपत्रकानुसार खर्च करावा लागतो वगैरे सबबी महासंघाचे सरचिटणीस नरेंद्र बात्रा यांनी सांगितल्या, परंतु निदान ही लाजीरवाणी बक्षिसे देण्याआधी क्रीडामंत्र्यांशी सल्लामसलत करून बक्षिसाची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न झाला असता, तर त्यासाठी वाढीव तरतूद सरकारने नक्कीच केली असती. परंतु चाकोरीबाहेर पडायचेच नाही या कूपमंडूक वृत्तीमुळेच ही नामुष्की महासंघावर ओढवली आहे.

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव

Story Summary: 

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाविषयी माहिती देताना मुख्य सचिव संजय श्रीवास्तव. सोबत गोवा मनोरंजन संस्थेचे मनोज श्रीवास्तव, अभिनेत्री पूजा भट व इतर.

समर्थ सद्गुरूप्रती समर्पणानेच मुक्ती

- सतीश तलवाड

जीव हा ईश्‍वराचा अंश आहे. तरीही माणूस जन्म - मृत्यूच्या फेर्‍यात अडकून प्रकृतीच्या आधीन होऊन मायेला वशीभूत झाल्याने सदैव दुःख भोगत आहे. जड प्रकृतीमायेच्या आधीन झाल्याने तो स्वतःलाही जड प्रकृतीच समजू लागला आहे. अज्ञानात इतका रूतला आहे की, स्वतःचे खरे अस्तित्वच विसरला आहे. आपण अमृतमय अशा परमेश्‍वराचे पुत्र आहोत हेच विसरून गेला आहे. त्याची अवस्था त्या सिंहाच्या छाव्याप्रमाणे झाली आहे, जे आपल्या माता-पित्यापासून भटकल्याने मेंढ्यांमध्ये राहून मेंढ्यांप्रमाणेच वागत असते. तात्पर्य, जीव ईश्‍वराचा अंश असूनही अज्ञानामुळे कष्ट सोसत आहे. मृत्यूलोकात लाचार होऊन अनेक दुःखे भोगणार्‍या व जन्ममृत्यूच्या चक्रात सापडलेलाही जीव मुक्त होऊ शकतो.

मृतदेहाची परवड

बदलत्या गोव्याच्या संदर्भात येथील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाकडून आजवर झालेला कानाडोळा आणि लोकप्रतिनिधींची अशा प्रश्नांप्रतीची उदासीनता ही नव्या सामाजिक तणावांस तोंड फोडू लागली आहे हे मोरजीतील परवाच्या घटनेवरून दिसून आले. शुभांगी बागकर या महिलेच्या अंत्यसंस्कारासंदर्भात झालेला वाद अत्यंत दुर्दैवी आहे व एका मूलभूत सामाजिक समस्येकडे तो लक्ष वेधतो आहे. पर्यटनामुळे गोव्याची कीर्ती देशविदेशांत पोहोचली आणि येथील जमिनींना सोन्याचा भाव आला. मोक्याच्या जमिनी विकत घेण्याची अहमहमिकाच परप्रांतीय धनदांडग्यांमध्ये लागली आणि बघता बघता गोमंतकीयांनाच जमीन एक तर शिल्लक राहिली नाही अथवा ती त्यांच्या आवाक्यात राहिली नाही. जमीन विकली गेली तशा तेथील पारंपरिक प्रथा - परंपरांनाही आडकाठी आली. कुठे देवाच्या कौलाची पारंपरिक वाट अडवली गेली, तर कुठे पूर्वापार अंत्यसंस्कार जिथे होत तिथे कुंपण लागले. सार्वजनिक स्मशानभूमी हा प्रकार गोव्याच्या खेड्यापाड्यांत पूर्वी नव्हता.

अल्प रकमेच्या पुरस्काराने हॉकी ‘चॅम्पियन्स’ अपमानीत

Story Summary: 

पुरस्कार नाकारल्यानंतर रकमेत वाढ

आशियाई चॅम्पियन्स चषक विजेत्या हॉकीपटूंना प्रत्येकी रु. २५ हजारांचे दिलेले धनादेश त्यांनी नाकारल्यानंतर खेळाडूंचा नकार योग्य ठरवीत केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी ‘चॅम्पियन्स’ना सरकारी योजनेंतर्गत प्रत्येकी रु. दीड लाख देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

हॉकी इंडियातर्फे आशियाई चॅम्पियन्स चषक विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा पुरस्कार देण्याच्या घोषणेनंतर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली. त्यानंतर क्रीडामंत्र्यांनी घाईगडबडीत आपल्या मंत्रालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पुरस्काराची रक्कम वाढविण्याची घोषणा केली. खेळाडूंना पुरस्कार देण्याच्या सरकारच्या योजना असून त्यानुसार सुवर्ण, रजत आणि कांस्य अशा गटात ते दिले जातात. या योजनेबाबत जास्त माहिती नसल्यामुळे दुर्दैवाने हा वाद उद्भवला, असे क्रीडामंत्री म्हणाले.

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव आजपासून पणजीत

Story Summary: 

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव आज गुरुवार दि. १५ पासून पणजीत सुरू होत असून संध्याकाळी ५ वा. कला अकादमीमध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर ‘काश्मीर की कली’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. काल येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना गोव्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव म्हणाले की, डिझॉल्व्ंिहग बाऊंड्रिल’ असा या महोत्सवाचा विषय आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका या देशातील चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

या महोत्सवात सुप्रसिद्ध दिवंगत चित्रपट अभिनेते शम्मी कपूर व दिवंगत बांगलादेशी चित्रपट निर्माते तारीक मसूर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. या महोत्सवात ६० दक्षिण आशियाई चित्रपट दाखवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

पाटणेकरांचा शुक्रवारी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

Story Summary: 

महामंडळ मिळण्याची शक्यता

भाजपला सोडचिठ्ठी दिलेले डिचोलीचे माजी आमदार राजेश पाटणेकर आपल्या काही कार्यकर्त्यांसह शुक्रवार दि. २३ रोजी राजधानी पणजीत होणार्‍या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस प्रवेश करणार असल्याची माहिती कॉंग्रेस सूत्रांनी दिली. त्यांना एखादे महामंडळ देण्यावर विचार सुरू असल्याचे कळते.

मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे आणखी चार आमदार कॉंग्रेस प्रवेशाच्या वाटेवर असून ते कोणत्याही क्षणी कॉंग्रेस प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.

गुंडांच्या हद्दपारीसाठी सल्लागार मंडळ

राज्यातील २८ कुख्यात गुंडांची यादी तयार

कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर राज्यातील गुंडगिरी नाहीशी करण्याचा विडा सरकारने उचललेला असून राज्यातील गुंडांची हद्दपारी करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून सरकारने एक सल्लागार मंडळ अधिसूचित केले असल्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

बेकायदेशीर खाणींवर कसे नियंत्रण ठेवणार?

हायकोर्टाची केंद्र व गोवा सरकारला विचारणा

गोव्यातील बेकायदेशीर खाणींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडे कोणती यंत्रणा आहे व त्याची कशी अंमलबजावणी करण्यात येईल हे सरकारने स्पष्ट करावे अशी सूचना करणार्‍या नोटीसा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने केंद्र व गोवा सरकारला पाठवल्या आहेत.दोन आठवड्यात यासंदर्भात उत्तर देण्याचा आदेश सरकारला देण्यात आलेला आहे.

कला अकादमीचा विस्तार महापालिकेमुळे रखडला

प्रदर्शनांवरील बंदीमुळे १ कोटी महसूल बुडाल्याचा दावा

कला अकादमीने कायमस्वरूपी दर्जाचे कलादालन, छोटेखानी सभागृह, दृक्‌श्राव्य स्टुडिओ, चार नृत्य प्रशिक्षणवर्ग आदींची तरतूद असलेली सुमारे वीस कोटी खर्चाची जोड इमारत बांधण्याचे काम हाती घेतले होते, परंतु त्यासाठी कला अकादमीच्या आवारातील झाडांची कत्तल केली जाणार असल्याचे व पार्किंगचा प्रश्न उद्भवणार असल्याचे कारण देऊन पणजी महानगरपालिकेने ते काम बंद पाडल्याने ही विस्तार योजना रखडली आहे. सर्व सोपस्कार करूनच हे काम साधनसुविधा महामंडळाकडे सोपवले होते, त्यामुळे हे काम बंद पाडणे गैर आहे, असे कला अकादमीच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

१०० टक्के साक्षरतेसाठी शंभर प्रौढ साक्षरता केंद्रे

राज्यातील साक्षरतेचे प्रमाण शंभर टक्क्यांवर आणण्यासाठी शिक्षण खात्याने शंभर प्रौढ साक्षरता केंद्रे उभारण्याचे ठरविले असून त्यासाठी सरकारने १ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे या विभागाचे सहाय्यक संचालक श्री. जंगम यांनी दिली.

माध्यान्ह आहार निर्मितीचे कामशाळांवर सोपवण्याची तयारी

माध्यान्ह आहार पुरविणारे स्वयंसहाय्य गट अन्न तयार करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करीत नसल्याचे सिद्ध झाल्याने सरकारने अन्न तयार करून ते विद्यार्थ्यांना पुरविण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर सोपविण्याचा विचार पक्का केला असून या पार्श्‍वभूमीवर सर्व शाळांना परिपत्रके पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

रेल्वे अपघातात मृतांची संख्या १०

चेन्नईनजीक स्थानकावर थांबलेल्या रेल्वेवर दुसरी गाडी आपटल्याने झालेल्या अपघातात मृतांची संख्या १० झाली आहे. हा अपघात मंगळवारी रात्री घडला. दरम्यान, अपघातामुळे तामीळनाडू व कर्नाटकातील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मोटरसायकल चोरट्यास अटक

गेल्या १ सप्टेंबर रोजी करासवाडा येथील परेश गावस यांनी आपल्या घरासमोर उभी करून ठेवलेली जीए ०१ एल ६७५७ मोटारसायकल चोरून नेणार्‍या संशयित चोरट्यास कणकवली पोलिसांनी निहाल कोद्री यास अटक करून म्हापसा पोलिसांच्या स्वाधीन केले.

अटालास पोलीस कोठडी देण्यास कोर्टाचा नकार

ड्रग दलाल अटाला याला काल पोलीस कोठडीचा रिमांड देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्याला १४ दिवसांचा न्यायालयीन कोठडीचा रिमांड देण्यात आला आहे.

बेकायदा खाण व्यवसायाची चौकशी करणार्‍या न्या. शहा यांची अधिकारी, नागरिकांशी चर्चा

मुख्यमंत्र्यांना लोकायुक्त नकोय : गोवा फाऊंडेशन

Eight teams of the justice shah commission have begun investigation into 90 legal and 22 illegal mines in goa

In a second hike in four months, Petrol prices go up by Rs 3.14 per litre from Thursday midnight

गोव्यात बेकायदेशीर खाणींचे पुरावे

विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या युवा नेत्यांची महत्वपूर्ण भूमिका

महामार्ग रोखला

Story Summary: 

मोर्चा अडविल्यानंतर म्हापसा ग्रीन पार्क जंक्शनवर रास्ता रोको. (छाया : प्रणव फोटो)

गोव्यात रासुकाही हवा आणि लोकायुक्तही...!

- दिलीप बोरकर

गोव्यातील वाढत्या गुंडगिरीस आळा घालण्यासाठी गोवा सरकारने रासुकाचा म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा वापर करण्याचे ठरवले आहे, याचे स्वागत गोव्यातील आम जनतेकडून नक्कीच होईल, कारण आज गोव्यात गुंडगिरीला ऊत यायला लागलेला आहे. भर दिवसा आणि सार्वजनिक ठिकाणी हे गुंड हातात तलवारी, चॉपर्स आणि इतर धारदार शस्त्रे घेऊन हल्ला करतात. ते गँगवॉर असू शकते आणि कोणीतरी सुपारी देऊन काटा काढण्याचाही प्रकार असू शकतो. काहीही असले तरी, गोव्यात हा जो प्रकार सुरू झालेला आहे त्याला आताच आळा घातला नाही तर, जो गोवा देशातील शांत आणि सुंदर प्रदेश न राहता सर्व प्रकारच्या समाजविघातक गोष्टींचा अड्डा बनून जाईल यात शंका नाही. पण या गोष्टींना आळा कोणी घालावा आणि अपेक्षा कुणाकडून बाळगाव्यात हाच खरा प्रश्‍न आहे.

तिसर्‍या डोळ्याचे सामर्थ्य

छायाचित्रकाराला नेहमीच दुय्यम दर्जा देत आलेल्या आपल्या समाजामध्ये एक छायाचित्रकार म्हणून स्वतःची अक्षरमुद्रा उमटवणारे ग्लॅमर फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांच्या काही पिढ्या जवळून पाहणारे एक पर्व अस्तंगत झाले आहे. आपल्या छायाचित्रांमधून त्यांच्या अस्सल व्यक्तिमत्त्वाची ओळख चित्रपटरसिकांना घडवणार्‍या राजाध्यक्षांनी ‘ग्लॅमर फोटोग्राफी’ भारतामध्ये रुजवण्यात फार मोठे योगदान दिले. छायाचित्रण ही केवळ कला नाही, तर त्यामागेही चिंतन असू शकते, कॅमेर्‍याच्या लेन्सद्वारेही समर्थपणे व्यक्तिचित्रण करता येते, हे त्यांनी दाखवून दिले. कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र हे त्या व्यक्तीच्या त्या क्षणी असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा दाखला असतो. त्या छायाचित्राकडे पाहून त्या व्यक्तीचा एक तरी स्वभावविशेष जाणवायला हवा, असे ते म्हणत असत. आपली बहीण व नामवंत लेखिका शोभा राजाध्यक्ष - डे यांच्यामुळे ‘सेलिब्रिटी’ या नियतकालिकासाठी चित्रपट तारे-तारकांचे छायाचित्रण करीत असताना त्यांच्या व्यावसायिक जीवनाला कलाटणी देणारा क्षण आला आणि त्यानंतर चित्रपटसृष्टीशी अत्यंत आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण करीत आणि तेथील कलावंतांच्या मनात स्वतःविषयीचा विश्वास प्रस्थापित करीत राजाध्यक्ष यांनी आपली पुढची व्यावसायिक कारकीर्द घडवली.

अंत्यसंस्कारास मज्जाव; मोरजीवासीयांची पणजीत धडक

Story Summary: 

महामार्ग रोखला; मुख्यमंत्र्यांकडून तोडग्याचे आश्‍वासन

बागवाडा मोरजी येथे मंगळवारी स्मशानभूमीकडे आणलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास जमीन मालकाच्या रक्षकांनी अडविल्यानंतर मृहदेहाची झालेली परवड असह्य झाल्याने मृतांच्या नातेवाईकांनी न्यायासाठी मृतदेहासह मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी धाव घेतली. या प्रकरणी निर्माण झालेला तणाव हाताळण्यास सरकारी अधिकार्‍यांना अपयश आल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त करून पेडण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई व उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांच्यावर कारवाईची मागणी केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाची या अधिकार्‍यांनी पायमल्ली केली असा ग्रामस्थांचा दावा आहे. काल दुपारी १ वा. स्मशानभूमीकडे जाणार्‍या वाटेच्या गेटवर आलेला मृतदेह सायंकाळी ५ पर्यंत तसाच राहिल्याने लोक संतप्त झाले व प्रकरण चिघळले.

बागवाडा-मोरजी येथील नाट्यकर्मी जयेश बागकर व राजेश बागकर यांच्या मातोश्री शुभांगी बागकर (६१) यांचे सोमवारी सायंकाळी इस्पितळात निधन झाले. त्यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी आणला.

सुप्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचे निधन

Story Summary: 

ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांचे ते चुलत बंधू होत. बॉलिवूड तसेच अन्य क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची वैशिष्ट्यपूर्णरितीने छायाचित्रे काढण्यासाठी त्यांचे नेहमी कौतुक व्हायचे.

त्यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना शोभा डे म्हणाल्या, कॅमेर्‍यासमोर बसलेल्या व्यक्तीतले गुण हे कॅमेर्‍यात पकडण्याचे कसब त्यांच्याकडे होते. सिनेजगतात अभिनेत्री दुर्गा खोटे यांच्या पासून अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचे फोटो त्यांनी काढले होते. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर,आशा भोसले यांचेही फोटो त्यांनी काढले होते.

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे गोव्याला सतर्क राहण्याची सूचना

Story Summary: 

मुंबई विमानतळ लक्ष्य होण्याची शक्यता, गुप्तचर विभागाची माहिती

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रासह शेजारील गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांना सतर्क राहून दहशतवाद्यांचे संभाव्य मनसुबे उधळून लावण्यासाठी सर्व ती व्यवस्था करण्याची सूचना केली आहे.

केंद्रीय संरक्षण संस्थांनी वरील सर्व राज्यांच्या पोलीस प्रमुखांना याबाबत माहिती दिली असल्याचे म्हटले आहे. मुंबई विमानतळावर हल्ला करून देशाच्या औद्योगिक राजधानीत खळबळ माजविण्याचा दहशतवाद्यांचा इरादा आहे. विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासही आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

म्हापशात युवतीची, होंड्यात वृद्धेची गळफास लावून आत्महत्या

म्हापसा येथे एकतानगरमधील अलिशा विलास सावंत (२१) या युवतीने फ्लॅटमध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याची व वाळपई-होंडा पोलवाडा येथे निर्मला वसंत गोवेकर (६०) या महिलेने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली.

कर्नाटकच्या मच्छीमारांचा गोव्याच्या समुद्रात उच्छाद

स्थानिक मच्छीमार संतप्त

कर्नाटकातील मच्छीमारांनी गोव्यातील समुद्रात उच्छाद मांडलेला असून सर्व नियम मोडून गोव्यात मच्छीमारी करणार्‍या या मच्छीमारांच्या ट्रॉलर्सना वेळ पडल्यास गोव्यातील मच्छीमार आग लावून ते जाळून टाकतील, असा इशारा काल ‘गोंयच्या रापणकारांच्या संघटनेचे अध्यक्ष माथानी साल्ढाणा यांनी पत्रकार परिषदेतून दिला. काल एका ट्रॉलरवर गोव्यातील मच्छीमारांनी दगडफेक केल्याचेही ते म्हणाले.

राज्याचा प्रादेशिक आराखडा २१ पर्यंत

राज्याचा संपूर्ण प्रादेशिक आराखडा-२०२१ येत्या दि. २१ पर्यंत जाहीर करण्याची सरकारने तयारी केली असून विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी हा धोरणात्मक निर्णय जाहीर झाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी संबंधित अधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. त्यामुळे नगरविकास खात्याच्या अधिकार्‍यांची धावपळ सुरू आहे.

पाटणेकर दिल्लीस

The General Secretary of the All Goa Traditional Fishermen's Association condemns the violations of the marine regulation Act 1981

Even after repeated cases of midday meal food poisoining, authorities have failed to addresse the issuse in a satisfactory manner

शिक्षणाचे महत्त्व कोणते?

- नारायण विनू नाईक, मंगेशी.

मनुष्य ही परमेश्‍वराची जगातील सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. आमच्या ऋषीमुनींनी सांगितले आहे की, मानवी जीवन ही एक पवित्र वस्तू आहे. आपल्याला मिळालेले मानवी जीवन प्रभूकृपा आणि अनेक पूर्वजन्मांतील आपल्या सत्कृत्यांचा परिणाम आहे. मानवाचा जन्म झाला म्हणजे त्याला बाल्यावस्थेत त्याचे माता-पिता त्याचे योग्य प्रकारे पालनपोषण करतात. त्याला योग्य वळण लावण्याचा प्रयत्न करतात. नंतर त्या मुलाची योग्य काळजी घेऊन त्याच्या जीवनाला योग्य संस्कार लावण्याचा प्रयत्नही करतात. त्याचे योग्य वय झाल्यानंतर त्याला शिक्षण घेण्यासाठी विद्यालयात पाठवतात. घरातून शाळेत प्रवेश घेतल्यानंतर त्याला तेथे सर्व नवीन नवीन गोष्टींचा अनुभव येत असतो.

पाटणेकरांचे पक्षांतर

दिगंबर कामत भाजपा सोडून कॉंग्रेसमध्ये प्रवेशले तेव्हापासून डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर हेही भाजपा सोडणार असल्याच्या अफवा म्हणा वा बातम्या म्हणा, सातत्याने प्रसृत होत होत्या. त्यासाठी वेळोवेळी मुहूर्तही जाहीर केले जात, परंतु दरवेळी तो फुसका बार ठरत असे. मात्र, काल पाटणेकर यांनी पक्षत्यागाचे आणि आमदारकीच्या राजीनाम्याचे निर्णायक पाऊल उचलले आणि आजवरच्या अटकळींना एकदाचा पूर्णविराम दिला. पाटणेकर जाणार, जाणारच्या या बातम्यांना भाजपा नेतृत्वही एवढे कंटाळले होते की ‘आगीशिवाय धूर निघत नसतो’ असे ठणकावत भाजपा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पाटणेकरांना आपली विश्वासार्हता जपण्याचा सल्ला दिला होता. परंतु पाटणेकरांना स्वतःच्या विश्वासार्हतेपेक्षा आपल्या भावी आमदारकीची चिंता अधिक असावी. कॉंग्रेसी नेते आपल्या मतदारसंघामध्ये नोकर्‍या वाटतील आणि आपल्या विजयावर हकनाक पाणी फेरतील या भीतीपोटीच पाटणेकर कॉंग्रेसवासी होण्याच्या वाटेवर आहेत. पाटणेकर आजवर स्वतःच्या कॉंग्रेस प्रवेशाच्या बातम्यांचा इन्कार करीत आले, परंतु कधीही त्यांनी कॉंग्रेस पक्ष किंवा नेत्यांवर टीकास्त्र सोडले नव्हते हेही येथे लक्षात घेण्याजोगे आहे.

राजेश पाटणेकर

राजेश पाटणेकर यांचा भाजपाला रामराम

Story Summary: 

आमदारकीचा राजीनामा; लवकरच कॉंग्रेस प्रवेश

गेली दोन वर्षे कॉंग्रेस प्रवेशासाठी चर्चेत असलेले डिचोलीचे भाजपा आमदार राजेश पाटणेकर यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती प्रतापसिंह राणे यांच्याकडे सादर केला. येणार्‍या काळात आपल्या मतदारसंघात शंभर नोकर्‍या व विकासकामे करण्याचे आश्वासन कॉंग्रेस नेत्यांनी दिल्यामुळेच आपण पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा दिलेला असून आगामी विधानसभा निवडणूक कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. पाटणेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

अखिल भारतीय कॉंग्रेस सरचिटणीस व गोव्याचे प्रभारी जगमितसिंग ब्रार, मुख्यमंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्याशी यापूर्वीच कॉंग्रेस प्रवेशासंबंधी चर्चा केली होती व त्यांच्या सहकार्यानेच आपण वरील निर्णय घेतला असून पुढील आठवड्यात कॉंग्रेसमध्ये रीतसर प्रवेश करणार आहोत, अशी घोषणाही पाटणेकर यांनी केली.

माध्यान्ह आहाराची पुन्हा बाधा

Story Summary: 

भाजीत सापडली पाल : १२ विद्यार्थ्यांना त्रास

माजोर्डा येथील सेंट अँथनी हायस्कूलमध्ये काल माध्यान्ह आहाराची बाधा होण्याचा प्रकार घडला. सरकारने नियुक्त केलेल्या स्वयंसहाय गटाचा आहार खाल्ल्यानंतर १२ विद्यार्थ्यांनी पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. तपासानंतर विद्यार्थ्यांना पुरविलेल्या भाजीत पाल सापडली. विद्यालयास श्री शांतादुर्गा कुकळकरीत स्वयंसहाय गट, रुमडामळ - दवर्ली यांच्यातर्फे माध्यान्ह आहार पुरवला जातो.

पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर सात विद्यार्थ्यांना हॉस्पिसियुत नेण्यात आले तर पाच मुलांना खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले. उशीरा संध्याकाळी सर्व मुलांना डिस्चार्ज दिल्याचे कळते.

विधानसभा निवडणूक जानेवारीनंतर

Story Summary: 

विधानसभा निवडणुका जानेवारी महिन्यानंतर घेण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, त्या नक्की कधी घ्यायच्या याचा निर्णय पक्षश्रेष्ठी व मुख्यमंत्री हेच घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संभाव्य उमेदवारांची यादी डिसेंबर महिन्यापर्यंत तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.

जुवारकर कॉंग्रेसमध्ये

ताळगावचे माजी आमदार व माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांनी काल कॉंग्रेस पक्षात रितसर फेरप्रवेश केला. कॉंग्रेस सदस्यत्वाचा अर्ज त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुभाष शिरोडकर म्हणाले की, सोमनाथ जुवारकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षाची ताळगाव व पणजी मतदारसंघातील ताकद वाढली आहे.

मिरामार चोरी - २७ लाखांचे दागिने चालकाकडून हस्तगत

मिरामार येथील समीर गुरुदास दुकळे या बिल्डराच्या सदनिकेतून चोरून नेलेले २७ लाख रु. चे दागिने त्यांचाच चालक लियोकार्डिओ फ्रान्सिस फर्नांडिस (सांतइनेज) याच्याकडून हस्तगत करण्यात आल्याची माहिती पणजीचे उपविभागीय अधिकारी देऊ बाणावलीकर यांनी दिली.

आमदार राजेश पाटणेकर यांचा भाजपला रामराम

बेकायदा खाणउद्योगाची चौकशी करणारा शाह आयोग गोव्यात दाखल

भारतीय हॉकी संघ

Story Summary: 

आशियाई चॅम्पियन्स चषकासह भारतीय हॉकी संघ.

पाकला हरवून भारत ‘चॅम्पियन्स’

Story Summary: 

पहिल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम मुकाबल्यात युवा भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानी संघाला हरवून ‘चॅम्पियन्स’ जेतेपद मिळवले. या विजयामुळे भारताचा लंडन ऑलिम्पिकमधील प्रवेश सोपा होणार आहे. गोलकीपर श्रीजेशच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर हा विजय अधिक सोपा झाला. शेवटी पेनल्टी शुटआऊटवर पाकिस्तानला भारताने ४-२ असे नमवले.

भारताचे नवे कोच मायकल नॉब्स यांची ही पहिलीच स्पर्धा होती. सामन्याच्या ठरलेल्या वेळेपर्यंत दोन्ही संघांनी कमालीची चुरस राखत एकमेकांना एकही गोल करू दिला नव्हता. पण पेनल्टी शुटआउटमध्ये कर्णधार राजपाल सिंह , दानिश मुज्तबा , युवराज वाल्मीकी आणि सरवनजीत सिंह यांनी गोल केले.

पणजी व मडगाव बसस्थानकांना चढणार नवा साज

Story Summary: 

कदंब महामंडळाची मडगांव आणि पणजी येथील बसस्थानके अल्ट्रा मॉर्डन (अत्याधुनिक) बनवण्यात येणार असल्याचे कदंबचे व्यवस्थापकीय संचालक वेनान्सियो फुर्तादो यांनी सांगितले.

मडगांव येथील बसस्थानकाचे काम अगोदर हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मडगांव येथील बसस्थानकाचा विस्तार करून ते अत्याधुनिक बनवण्यात येंईल. तसेच तेथे मोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुंबई, बेंगलोर, म्हैसूर अशा मोठ्या शहरातील बसस्थानकांवर शॉपिंग कॉम्प्लेक्ससह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात. गोवाही त्याबाबतीत मागे राहू नये यासाठी मडगांव व पणजी येथील बसस्थानके सर्व सोयींसह सुसज्ज बनवण्याचा निर्णय कदंब महामंडळाने घेतला असल्याचे ते म्हणाले.

फोंड्यात भरदुपारी चोरी

Story Summary: 

महिलेस बांधून फ्लॅटमधील दागिने, पैसे लुटले

फोंडा पोलिस स्टेशनजवळ, भर वस्तीत आल्मैदा हायस्कुलसमोरील हेरीटेज प्रिन्सेस या नवीन इमारतीतील फ्लॅट नं. २०४मध्ये काल भर दुपारी १२च्या दरम्यान तीन चोरट्यांनी फ्लॅटमधील महिलेला नायलॉन दोरीने बांधून व तोंडात बोळा कोंबून जवळ जवळ २ लाख ८० हजार रुपयांचे दागिने व रोख रकमेसह ऐवज हातोहात पळवला.

पोलिसानी श्‍वान पथक व ठसे तज्ज्ञ आणून तपास काम सुरू केले पण रात्री उशीरा पर्यंत हाती काहीही लागले नाही.

महासंचालकांनी पोलिसांना दाखवला ‘सिंघम’ चित्रपट

पोलिसांना प्रेरणा देण्याचा हेतू

रोहित शेट्टी दिग्दर्शित व अजय देवगण अभिनित ’सिंघम’ हा चित्रपट काल गोवा पोलिसांना दाखवण्यात आला. पोलीस महासंचालक आदित्य आर्या यांच्या सूचनेवरून या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.

मुलींना बनवणार ‘सबला’

- सकस आहाराचे वितरण

- कायदेशीर बाबींचे प्रशिक्षण

बालक आणि महिला कल्याण खात्याने ११ ते १८ वयोगटातील मुलींसाठी सबला ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली असल्याची माहिती खात्याचे संचालक संजीव गडकर यांनी ऽदिली.

सारथींअभावी ८४ ‘बालरथ’ अडून

इंदिरा बालरथ योजनेखालील ८४ बसगाड्या स्वराज माजदाच्या डेपोमध्ये पडून असून शिक्षण खात्याकडे या बसगाड्यांसाठी चालक नसल्याने त्या ताब्यात घेणे शक्य झालेले नाही. कंपनीकडे बसगाड्या ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्या ताब्यात घ्याव्या म्हणून कंपनीने सरकारला तगादा लावला आहे. त्यामुळे समाज कल्याण खात्याचे अधिकारीही पेचात आले आहेत.

मोटरसायकलवरून पडून अझरुद्दीनचा भाचा ठार, मुलगा गंभीर जखमी

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन याच्या भाच्याचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. याच अपघातात अझरुद्दीनचा धाकटा मुलगा अयाझुद्दीन (१९) गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अयाज हा ताकदीचा नवोदित क्रिकेटपटू असून व १३, १५, १९ वर्षांखालील संघांमध्ये खेळलाही आहे. दरम्यान, महम्मद अझरूद्दीन लंडनला असून तो भारतात यायला निघाला.

मिरामार चोरी; ड्रायव्हरला अटक

मिरामार येथे दुकळे या बिल्डरचा फ्लॅट फोडून १९ लाख २० हजार रु.चे किंमतीचे दागिने लांबवल्या प्रकरणी पणजी पोलिसांनी दुकळे यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे.

तामीळनाडूत पोलिसांच्या गोळीबारात ५ ठार

तामीळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्यात जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच ठार झाले.

जॉन पांडियन या दलित नेत्याला अटक केल्याच्या निषेधार्थ जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात अनेक पोलीस जखमी झाले. पोलीस उपायुक्तांनाही दुखापत झाली. पोलिसांच्या वाहनांनाही आगी लावण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात तीन लोक ठार झाले. ही वार्ता पसल्यावर मदुराईतही निदर्शने झाली. तेथे पोलिसांच्या गोळीबारात दोघे जखमी झाले.

९/११च्या हल्ल्यास दहा वर्षे पूर्ण

खंडुरी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

लोकपालविरोधी खासदारांच्या मतदारसंघांत जाणार अण्णा

शिवप्रिय रूद्राक्ष महिमा

- नारायण विनू नाईक, मंगेशी.

हिंदूधर्मियांचे ‘शिव’ हे आराध्य दैवत. या देवतेला प्रिय असणार्‍या तीन गोष्टी म्हणजे, शांतता, चिताभस्म आणि रूद्राक्ष! रूद्राक्षाची आवड शिवाला कशी झाली ते बघूया. त्रिपुरा राक्षसाचा वध झाल्यानंतर शिवाने जेव्हा डोळे मिटून घेतले, तेव्हा त्याच्या नेत्रातून जे अश्रू पृथ्वीवर पडले, त्यापासून रूद्राक्ष बनले असा बालोपनिषदात उल्लेख आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, अग्नीपुराण, देवी भागवत आदींचेही त्यामध्ये वर्णन आहे.

हे कशाचे फळ?

एकेकाळी गोव्याची सांस्कृतिक राजधानी गणले जाणारे मडगाव शहर आज गुंड मवाल्यांच्या हाणामार्‍यांचे ठिकाण बनले आहे. भररस्त्यात तलवारी आणि चॉपरसह एकमेकांच्या प्राणांवर उठणार्‍या या टोळ्यांमुळे आज मडगावची आम जनता भीतीच्या सावटाखाली वावरते आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा सतत वरदहस्त लाभलेला मोतीडोंगर हे या गुन्हेगारीचे महत्त्वाचे केंद्र आहे आणि परवा जे टोळीयुद्ध झाले, ते तर मडगाव नगरपालिका निवडणुकीवेळच्या वैमनस्याचीच परिणती आहे. ज्या बशीर आणि मकबूल या दोन गटांत ही प्राणघातक हाणामारी झाली, तेच गेल्या जानेवारीतही अशाच प्रकारे एकमेकांना भिडले होते. खरे तर २००८ साली जेव्हा मोतीडोंगरावर तलवारी सापडल्या, तेव्हाच काट्याचा नायटा होण्यापूर्वी तेथील गुन्हेगारीचा बीमोड करणारी पावले उचलली जाणे गरजेचे होते. दुर्दैवाने मतांच्या राजकारणात मोतीडोंगरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या गुन्हेगारी प्रवृत्तीचा नायनाट करण्याऐवजी तिला पाठबळच आजवर दिले गेले, ज्याची परिणती म्हणून आज समस्त मडगावकरांसाठी मोतीडोंगर ही एक डोकेदुखी होऊन बसली आहे.

भ्रष्टाचाराचा भस्मासुर

- शरत्चंद्र देशप्रभू

देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.

पणजीतील रस्त्यांची दुरवस्था

Story Summary: 

पणजीतील रस्त्यांची सध्या अत्यंत वाईट अवस्था झालेली असून स्थानिक आमदार व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या नजरेस ही रस्त्यांची दुरवस्था काल आणून दिली.

पाण्याचे दर खाली आणण्याचा निर्णय

Story Summary: 

घरगुती वापरासाठीच्या पिण्याच्या पाण्याचे दर सरकारने खाली आणावेत या जनतेच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी हे दर लवकरच खाली आणण्याचा निर्णय काल पत्रकार परिषदेत जाहीर केला.

गेल्या ३१ मार्च रोजी अधिसूचना काढून पाण्याचे दर वाढवण्यात आले होते. व्यावसायिक वापरासाठीचे पाणी व घरगुती वापरासाठीचे पाणी अशा दोन्ही पाण्यासाठीचे दर तेव्हा वाढवले गेले होते. मात्र, नंतर नागरिकांनी घरगुती वापरासाठीच्या पाण्याचे दर वाढवले गेल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे वाढवलेले दर खाली आणून महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती. तिची दखल घेऊन वरील अधिसूचनेत दुरुस्त्या करून घरगुती वापरासाठीच्या पाण्याचे दर खाली आणण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे आलेमाव यांनी सांगितले.

आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

Story Summary: 

आणखी काहींना अटक होण्याची शक्यता ः एक फरारी

मोती डोंगर खुनी हल्ला प्रकरण

मोती डोंगरवरील बशीर शेख याच्यावर प्राणघातक हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आठजणांना पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे. शेख बशीर याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. काल दुपारी त्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळातील अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले.

या हल्लाप्रकरणी मकबूल सिर्सी हा फरारी आहे. त्याच्यासहीत आणखी कित्येकाना अटक होण्याची शक्यता असल्याचे पोलीस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी सांगितले. मोतीडोंगर येथे पोलीस व राखीव पोलीस दलाची तुकडी कायम गस्तीवर असल्याने वरवर शांतता दिसत असली तरी वातावरण काहीसे तंग होते.

गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू

Story Summary: 

गोवा ते बेळगाव या राष्ट्रीय महामार्ग ४ ए च्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून त्यासाठीची निविदा यापूर्वीच काढण्यात आली असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग १७ चे काम मात्र लोकांनी टोलला विरोध केल्याने अडून पडले असल्याचे ते म्हणाले. या मार्गासाठी काढण्यात आलेली ३ डी अधिसूचना आता रद्द झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तसे असले तरी ती नव्याने काढणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मिरामार येथे बंद फ्लॅट मोडून १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी

१ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कामत किनारा (मिरामार) इमारतीतील २० यूजी या फ्लॅटमधून १९ लाख २० हजार रु.चे दागिने लांबवल्याची तक्रार पणजी पोलिसात करण्यात आली आहे.

भाजपाने पोखरियाल यांचा राजीनामा मागितला

कर्नाटकनंतर उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या गच्छंतीची वेळ भारतीय जनता पक्षावर आली असून भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांची भेट घेऊन राजीनामा देण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. राज्यात उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. भाजपा संसदीय समितीची गेल्या ८ रोजी एक बैठक झाली व त्यात उत्तराखंडमध्ये नेतृत्वबदल आवश्यक असल्याचे नेत्यांचे मत झाले, असे सांगण्यात येते.

जातीय हिंसाचार विधेयकावर भाजपा नेत्यांचे टीकास्त्र

केंद्र सरकारच्या जातीय हिंसाचार विधेयकाच्या मसुद्यावर काल भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने राष्ट्रीय एकात्मता आयोगाच्या बैठकीत टीकेची झोड उठवली. भाजपा नेत्यांनी हे विधेयक ‘घातक’ असल्याचे मत व्यक्त केले, तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी सरकार राज्य सरकारांना या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा दाखवायला तयार नसल्याची टीका केली.

चिरेखाणीत बुडून युवकाचा अंत

बोगमाळो-सांत्रान येथे किनार्‍यापासून काही अंतरावरील चिरेखाणीमध्ये बुडून चिंचणी येथील ऍरोन मास्कारेन्हास (२४) हा मरण पावला. उपलब्ध माहितीनुसार सांत्रान येथील खडी मशीन जवळ असलेली चिरे काढण्याची खाण गेल्या काही वर्षांपासून बंद असून सध्या पावसाच्या पाण्याचे तुडूंब भरलेली आहे. सुमारे ३० मीटर खोल असलेल्या या चिरेखाणीमध्ये काही युवक गळ टाकून मासे पकडतात. मयत मास्कारेन्हास हा आपल्या मैत्रीणीसह सांत्रान येथे फिरायला आला होता.

दिल्ली स्फोटाची गुंतागुंत कायम

दिल्ली उच्च न्यायालयापुढील बॉम्बस्फोटाला तीन दिवस उलटले, तरी तपासकामास निश्‍चित दिशा लाभू शकलेली नाही. स्फोटानंतर आलेल्या चार ईमेलनी गुंतागुंत वाढवली असून तपास यंत्रणा गोंधळून गेल्या आहेत. कोणत्या संघटनेने स्फोट घडवला, त्यासंबंधी निश्‍चित माहिती अजूनही राष्ट्रीय तपास संस्थेला मिळू शकलेली नाही. स्फोटानंतर आलेल्या चार ईमेल तपास यंत्रणेला गोंधळात टाकण्यासाठीच पाठवल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या रेखाचित्रांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात असला, तरी ठोस दुवे हाती लागलेले नाहीत.

बलात्कारप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा

जनलोकपालला विरोध करणार्‍यांस पराभूत करा ः अण्णा

म्हादई व्याघ्र क्षेत्रात दडलंय गोव्याचं भवितव्य!

- राजेंद्र पां. केरकर

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना म्हादई अभयारण्याचा परिसर व्याघ्र राखीव क्षेत्रात परिवर्तित करून याबाबतचा प्रस्ताव पाठवावा अशी सूचना केलेली आहे. गोव्यात वाघांचा संचार शेकडो वर्षांपासून आहे. इथे वाघ नाहीत, ते शेजारील कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील जंगलातून काही काळासाठी इथे येतात असे वारंवार प्रतिपादन करणार्‍या अतिरिक्त प्रधान मुख्य वनपाल डॉ. शशिकुमार यांना ही मंत्र्यांनी सणसणीत चपराक दिलेली आहे.

‘दिवस’ पुस्तकातल्या पानांसारखे!

- सोनाली रसिक देसाई

माणसाचं आयुष्य आणि पुस्तकातली पानं यात काहीसं साम्य नक्की आहे. जसं पुस्तकाचं पहिलं पान एका छोट्याशा नावानं किंवा शीर्षकानं सुरू होतं. दुसर्‍या पानावर प्रास्ताविक. जणू माणसांची नाती सांगणारी ओळखच. त्याच्या कर्तव्याचा आढावा अन् पुढच्या पानावर अनुक्रमणिका! पण आपल्या आयुष्यात अशी अनुक्रमणिका मुळीच नसते. कधी असणारही नाही. कारण आपल्या जीवनाच्या पुस्तकात अमुकच एका पानावर काय लिहिलेलं असेल किंवा आपणास काय लिहिता येईल याची परवानगी आणि शाश्‍वतीही नाही.

मोतीडोंगरावर तणाव

Story Summary: 

काही संशयितांना पकडून नेताना पोलीस., पोलीस निरीक्षक संतोष देसाई यांच्याशी हुज्जत घालताना एका गटातील तरूण., प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेला बशीर शेख. (छायाः गणादीप शेल्डेकर)

मडगावात टोळीयुद्ध; एकावर प्राणघातक हल्ला

Story Summary: 

दोन गटांच्या हाणामारीनंतर मोतीडोंगरावर तणाव

मडगावच्या मोतीडोंगर झोपडपट्टीत आठ महिन्यांनंतर पुन्हा टोळीयुद्धाने डोके वर काढले असून काल शेख बशीर व मकबूल या गटांत झालेल्या प्राणघातक हल्ल्यांत शेख बशीर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी काल बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अन्वर शेख व जाफर हे किरकोळ जखमी झाले आहेत, तर पोलिसांनी दोन्ही गटांतील नऊ जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक वामन तारी यांनी दिली. मोती डोंगरावर तणावग्रस्त वातावरण असून मडगाव पोलिसांबरोबरच तेथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

शेख बशीर व मकबूल या गटांतील दोघा तरुणांमध्ये काल काही कारणावरून भांडण झाले. काही वेळाने ते शांत झाले, तरी त्यांचा राग शांत न झाल्याने दुपारी तीन वाजता पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली. त्यात शेख बशीर गटातील शेख अन्वर हा जखमी झाला, तर मक्बूल गटातील जाफर हाही जखमी झाला. शेख बशीर अन्वरला घेऊन उपचारांसाठी हॉस्पिसियो इस्पितळात घेऊन गेला असता लगेच मकबूल गटाचे सात - आठ जण लाठ्या - काठ्या घेऊन इस्पितळात गेले व बाहेर उभे राहिले. तोपर्यंत बशीर गटाचे तरुणही तेथे पोहोचले होते.

गजानन फळदेसाईच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देण्याचे आश्‍वासन

Story Summary: 

अन्य मागण्या सोडविण्यास १० दिवसांची मुदत : बाळ्ळीत शांतता

बाळ्ळी प्रकरणी आत्महत्या केलेला एक आरोपी गजानन फळदेसाई यांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देण्याची व त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी देणे अशा बळ्ळीतील नागरिकांच्या दोन मागण्या सरकारने काल मान्य केल्या तर अन्य तीन मागण्या सोडविण्यासाठी १० दिवसांची मुदत मागून घेतली. नागरिकांनी त्यासाठी मान्यता दिल्यानंतर बाळ्ळीत काल शांतता प्रस्थापित झाली.

बाळ्ळी हिंसाचारप्रकरणी १५ जणांविरुध्द आरोपपत्र मागे घेणे, दीपक फळदेसाईचा जामीन मंजूर करणे व पोलीस निरीक्षक सुनिता सावंत यांच्यावर कारवाई करण्यात यावी या त्यांच्या अन्य प्रमुख मागण्या होत्या.

अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची ईमेलद्वारे धमकी; अतिदक्षतेचा इशारा

Story Summary: 

दिल्ली स्फोटासंदर्भात तिसरी ईमेल प. बंगालमधून

नवी दिल्लीतील बॉम्बस्फोटासंदर्भात तपासकाम वेगात सुरू असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी काल पत्रकार परिषदेत केला. मात्र, अहमदाबादमध्ये अशाच प्रकारे स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारी तिसरी ईमेल काही वृत्तवाहिन्यांना मिळाली आहे. दिल्ली स्फोटाची जबाबदारी घेणारी दुसरी ईमेल पश्‍चिम बंगालमधून पाठवली गेली होती, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने दिली.

तिसर्‍या ईमेलमधून सांकेतिक स्वरूपात धमकी दिली गेली होती. त्यातून अहमदाबादेत स्फोट घडवण्याचा इशारा असल्याचा अर्थ उलगडण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे.

दहशतवादी हल्ल्याचे भाजपाकडून राजकारण ः पी. चिदंबरम

भारतीय जनता पक्ष दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी काल केला. भाजपा बराच काळ सत्तेपासून दूर असल्याने त्यांना कामे कशी चालतात ते ठाऊक नाही, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली.

शिक्षक पुरस्कार स्वीकारण्यास प्रा. लेले यांचा नकार

मात्र माध्यम आंदोलन चालू असतानाच अर्ज केल्याचे उघड

इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून मुष्टीफंड उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रत्नाकर लेले यांनी शिक्षक दिनानिमित्त जाहीर झालेला राज्य पुरस्कार स्वीकारण्यास काल नकार दिला. काल अकादमीत झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात शिक्षण खात्यानेही त्यांच्या नावांचा उल्लेख करणे टाळले वरील पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल लेले यांनी शिक्षण खात्याचे आभार मानले आहेत, परंतु प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे हा शिक्षण तज्ज्ञांचा जगन्मान्य सिध्दांत आहे. असे असतानाही मूठभर लोकांना खूश करण्यासाठी सरकारने इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान देण्याचा घेतलेला निर्णय घातक आहे. त्याचा निषेध म्हणूनच आपण पुरस्कार न स्वीकारण्याचे ठरविले आहे असे प्रा. लेले यांनी पत्रकांत म्हटले आहे.

प्राथमिक शिक्षकांनाही लॅपटॉप व गृह कर्ज

शिक्षकदिनी घोषणांची खैरात

शिक्षण खात्याचा ताबा घेतल्यापासून शिक्षकांच्या जवळजवळ सर्व मागण्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केल्याचे सांगून माध्यमिक शिक्षकांप्रमाणेच प्राथमिक शाळांतील शिक्षकांनाही लॅपटॉप खरेदी करण्यासाठी व्याजमुक्त कर्ज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देऊन या शिक्षकांना गृह कर्ज वितरीत करण्यची योजना राबविण्याची घोषणा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेर्रात यांनी काल शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात केली.

वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचे अमरसिंगांना आदेश

राज्यसभेचे खासदार व समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग यांना वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचे आदेश तीस हजारी न्यायालयाने काल दिले. अमरसिंग यांनी आपले वैद्यकीय अहवाल दिलेले नाहीत व स्वतःची रक्त चाचणी करण्यासही ते तयार नाहीत अशी तक्रार तिहार तुरुंगाच्या अधिकार्‍यांनी केल्याने न्यायमूर्ती संगीता धिंग्रा सेहगल यांनी हे आदेश दिले.

येत्या ११ सप्टेंबरची अमेरिकेला पुन्हा भीती

अकरा सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत विश्व व्यापार केंद्रावर झालेल्या हल्ल्याला येत्या ११ रोजी दहा वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत पुन्हा एकवार दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

भाषा सुरक्षा मंचाच्या निदर्शकांना अटकाव

अण्णांच्या आंदोलनाला कमी लेखू नये

- अनिल आचार्य, पर्तगाळ - काणकोण

महाराष्ट्रातल्या राळेगणसिद्धी गावातून ७४ वर्षांचा एक वृद्ध (?) देशभर पसरलेल्या भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवण्यासाठी दिल्लीत येऊन उपोषणाला बसतो, सगळ्या जनतेला लढ्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन करतो व एक चमत्कार घडावा तसा सगळा देश त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतो ही सगळे राजकीय पक्ष आणि संघटनांना धक्का देणारी गोष्ट ठरली. इतर देशांमध्ये सत्ताधार्‍यांविरूद्ध चालू असलेल्या आंदोलनांत मोठा हिंसाचार आणि मालमत्तेचे होत असलेले नुकसान आम्ही टीव्हीवर पाहात असतो. आमच्या देशामध्येही एखाद्या पक्षाचे, संघटनेचे आंदोलन चालू असते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान व हिंसाचार घडत असतो. पण एकशे दहा कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात अण्णांच्या शांततामय आंदोलनाला मिळालेला जवळपास शंभर टक्के प्रतिसाद, तोही कुठेही एकही हिंसक घटना न घडता, ही सगळ्या जगाने थक्क होऊन पाहण्यासारखी गोष्ट आहे.

तारतम्य हवे

‘उटा’चे आंदोलन आणि त्यानंतरच्या बाळ्ळीतील हिंसाचाराचे प्रकरण आज एका ज्वालामुखीचे स्वरूप धारण करून राहिले आहे. या प्रकरणाला असलेले राजकीय कंगोरे आणि त्याचा आजवर एकूण तपासकामावर झालेला परिणाम यामुळेच हा विषय आज एक अत्यंत संवेदनशील विषय बनलेला आहे. अगदी सुरवातीपासून हा विषय हाताळताना त्याच्या राजकीय बाजू डोळ्यांपुढे धरल्या गेल्या, त्याचा हा परिणाम आहे. आँचल जळीतकांडातील एका आरोपीच्या आत्महत्येचे निमित्त घडले आणि परवा भडका उडाला. यानिमित्ताने काही गोष्टींची शहानिशा होणे आज आवश्यक आहे. स्वतःवर खुनाचा आरोप ठेवल्या गेल्याने मानसिक तणावाखाली येऊन केलेली ही आत्महत्या आहे की पोलिसांकडून छळणूक झाल्यानेच गजानन फळदेसाईने आत्महत्येचा मार्ग अनुसरला यातील सत्य आधी शोधले गेले पाहिजे. बाळ्ळीवासीयांच्या टीकेचा रोख पोलीस निरीक्षक सुनीता सावंत यांच्यावरच का आहे याचाही विचार व्हायला हवा. बाळ्ळी जळीतकांडातील आरोपींना हाताळताना चुकीच्या पद्धतीने तर हाताळले गेले नाही ना, वर्दीतली दांडगाई तर केली गेली नाही ना, याचा निष्पक्ष तपास व्हायला हवा.

Acting Chief Secretary B Vijayan’s assurances to Balli locals soothe their frayed nerves

बाळ्ळीत तणाव

Story Summary: 

बाळ्ळी येथे रोखून धरलेला महामार्ग. तणावाच्या पार्श्वभूमीवर तैनात केलेली सुरक्षा व्यवस्था. (छाया : गणादीप शेल्डेकर)

आरोपीच्या आत्महत्येनंतर बाळ्ळीत तणाव

Story Summary: 

क्राइम ब्रांच निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी, संतप्त जमावाने महामार्ग रोखला

‘उटा’ आंदोलनावेळी उसळलेल्या हिंसाचारानंतर दोन कार्यकर्ते मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांचे आगीत होरपळून निधन झाले होते. या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने १५ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्यांपैकी एक असलेला गजानन नारायण फळदेसाई (२८) या तरुणाने कुंकळ्ळी पोलिस स्थानकाच्या मागे झाडींत गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे तणाव निर्माण झाला.

याबाबत माहिती समजताच बाळ्ळी येथील नागरिक संतप्त झाले व त्यांनी महामार्ग रोखून धरला, त्यामुळे मडगाव-कारवार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. झाडाला लटकलेला गजानन याचा मृतदेह तेथून उतरविण्यासही त्यांनी विरोध दर्शवला. त्याच्या आत्महत्येस सीआयडी विभागाच्या निरीक्षक सुनिता सावंत जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्या निलंबनाची मागणीही लावून धरली. येथील वातावरण काल दिवसभर तंग होते.

मंगळवारी पुन्हा स्फोटाची मुजाहिदीनकडून धमकी

Story Summary: 

दिल्ली बॉम्बस्फोट; ५ जण ताब्यात

दिल्ली हायकोर्टासमोरील बॉम्बस्फोटांचा तपास तीव्र गतीने करण्यात येत असून या प्रकरणी जम्मू काश्मीरमधून काल पाच जणांना तब्यात घेण्यात आले. याप्रकरणी बिहारमध्येही एकाची चौकशी करण्यात आली.

परवा या स्फोटांची जबाबदारी ‘हुजी’ संघटनेने स्वीकारली होती. काल नव्याने आलेल्या ई-मेलमध्ये इंडियन मुजाहिदीन संघटनेने स्फोटांची जबाबदारी स्वीकारली असून मंगळवारी दिल्लीतील मॉलमध्ये पुन्हा स्फोट घडविण्याची धमकी दिली आहे.

भूसंरक्षण विधेयकाचा मसुदा सादर

Story Summary: 

शेतजमीन विक्री रोखण्यासाठी कायदा आयोगाचे पाऊल

गोव्याबाहेरील श्रीमंत लोक येथे येऊन येथील मोठ्या प्रमाणात शेतजमिनी खरेदी करू लागले असून त्यामुळे भविष्यकाळात गोव्यात जमिनीच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे कायदा आयोगाने अभ्यास करून गोवा भूसंरक्षण आणि व्यवस्थापन विधेयकाचा मसुदा तयार करून सरकारला सादर केल्याची माहिती अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र, कर्नाटक या मोठ्या राज्यांमध्ये बिगर शेतकर्‍यांना शेत जमिनी खरेदी करण्यास बंदी आहे. गोव्यात हा कायदा नाही. त्याचा माफिया गैरफायदा घेत असल्याचे ते म्हणाले. गोव्यातही अशा पद्धतीची तरतूद करावी.

गुंडगिरीच्या बीमोडासाठी पुन्हा ‘रासुका’

राज्यातील गुंडगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा वापर करणार असून पोलीस राज्यातील समाजविघातकांची यादी तयार करणार असल्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी काल सांगितले.

आजच्या शिक्षकदिनावर निदर्शनांचे सावट

गेल्या पाच सप्टेंबर रोजी असलेला शिक्षक दिन चतुर्थीच्या सुटीच्या काळात आल्याने आज दि. ९ रोजी शिक्षक दिन सरकारी पातळीवर साजरा होत आहे. मात्र, या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे राज्य पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक दिन सोहळ्यावर यंदा गेले काही महिने गाजणार्‍या शैक्षणिक माध्यम आंदोलनाचे दाट सावट पडले आहे. देशी भाषाप्रेमींमधील असंतोष कमी करण्याची धडपड सरकारकडून चालली असली, तरी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या वतीने आज शिक्षक दिन सोहळ्यावर धडक दिली जाण्याची शक्यता आहे.

जीवाला कंटाळून युवकाची आत्महत्या

फट्टोवाडा-कोलवाळ येथील डोंगरावर काजूच्या झाडाला गळफास लावून केरी-पेडणे येथील साईराज केरकर (२३) याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात जीवाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटल्याचे, पोलिसांनी सांगितले.

आमदारास वर्षाचा कारावास

अण्णांचे स्वप्न साकारेल काय?

- मोहन द. नाईक, सदाशिवगड - कारवार

गांधीजींच्या अहिंसात्मक पद्धतीने तब्बल बारा दिवस चाललेल्या अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा विजय झाला. दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचाराविरूद्ध चालवलेले हे अभियान देशातील तमाम जनतेच्या उत्स्फूर्त सहकार्य व प्रतिसादामुळे विजयी झाले. ‘गांधीगिरी’ प्रमाणेच इथे ‘अण्णागिरी’ फळास आली. उद्दाम कॉंग्रेस व इतर काही मंत्री व खासदारांच्या हेकट, पाताळयंत्री व आडमुठ्या प्रतिकारामुळे अण्णांच्या या प्रचंड आंदोलनाची अवस्था शेवटपर्यंत दोलायमान झाली होती. परंतु अहोरात्र अफाट संख्येने अण्णांना पाठिंबा देणार्‍या या आम जनसागरापुढे शेवटी संपुआ सरकारला नमते घ्यावेच लागले. जनतंत्रापुढे भ्रष्टतंत्राचा पराजय झाला आणि अण्णांच्या जनलोकपाल विधेयकाचा सरकारला स्वीकार करावाच लागला.

निर्णायक वेळ

नवी दिल्लीतील बॉम्बस्फोटामुळे दहशतवादी देशात पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. मुंबईत स्फोटमालिका घडविल्यानंतर दिल्लीला लक्ष्य केले जाणार अशी अटकळ होतीच. गेल्या सहा वर्षांत या दोन्ही शहरांमध्ये एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल २२ दहशतवादी हल्ले झाले आहेत. दुर्दैवाने तरीही आपल्या सुरक्षा यंत्रणा गाफील आहेत, नेते बेफिकिर आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकावर मृत्यूची टांगती तलवार लटकत राहिली आहे. जेथे परवा बॉम्बस्फोट झाला त्याच दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात गेल्या २५ मे रोजी स्फोटाची तालीम दहशतवाद्यांनी घेतली होती. अमोनियम नायट्रेट आणि पीईटीएन स्फोटकांचे मिश्रण करून टायमर लावलेल्या दोन डिटोनेटरद्वारे त्याचा स्फोट घडवण्याचा तो प्रयत्न ऐनवेळी डिटोनेटरनीच पेट घेतल्याने विफल झाला होता. परंतु सुरक्षा यंत्रणांना इशारा तर मिळाला होता. निदान जेथे स्फोट झाला त्या दिल्ली उच्च न्यायालयाची सुरक्षा व्यवस्था तरी कडक केली जाईल अशी अपेक्षा होती, परंतु ना सुरक्षेत वाढ केली गेली, ना सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले.

Government to invoke National Security Act in view of deteriorating law and order situation in the state

गुंडगिरीच्या बीमोडासाठी पुन्हा ‘रासुका’

उच्च न्यायालयाबाहेर स्फोट

Story Summary: 

स्फोटाच्या ठिकाणी दाखल झालेले श्‍वान पथक.

मुंबईनंतर बॉम्बस्फोटाने हादरली नवी दिल्ली

Story Summary: 

उच्च न्यायालयाबाहेर स्फोट ः ११ ठार, ७६ जखमी

दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर काल सकाळी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान अकरा जण ठार, तर ७६ हून अधिक जखमी झाले आहेत. ‘हुजी’ या दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून अफजल गुरूला फाशी दिली जाऊ नये यासाठी इशार्‍यादाखल हा स्फोट घडवल्याचे म्हटले आहे. एका सूटकेसमध्ये हा बॉम्ब ठेवणार्‍या दोघा संशयितांची रेखाचित्रे पोलिसांनी जारी केली असून राष्ट्रीय तपास संस्थेचे वीस सदस्यीय पथक स्फोटाचा तपास करीत आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रवेशद्वार क्र. ४ आणि ५ या दरम्यान असलेल्या प्रवेश पास बनवण्याच्या काऊंटरसमोरच हा स्फोट सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी झाला. यावेळी शे - दोनशे लोक प्रवेश पास मिळवण्यासाठी तेथे रांगेत उभे होते. काही वकीलही आजूबाजूला उपस्थित होते. स्फोटानंतर जखमींना तातडीने नवी दिल्लीतील राममनोहर लोहिया इस्पितळ, सफदरजंग इस्पितळ, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान व अन्य रुग्णालयांत हलवण्यात आले.

इंग्रजीस अनुदान यंदा अशक्यच

Story Summary: 

शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देणे किंवा व्यवस्थेत कोणताही फेरबदल करण्याचे झाल्यास त्यासाठी ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख असते. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी चालू वर्षात करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नाही, याचे संकेत मिळाले आहेत. सरकार त्याबाबतीत कोणता निर्णय घेईल यावर अधिकारी वर्गातही संभ्रम निर्माण झाला आहे.

अनुदानाचा प्रश्‍न सध्या न्यायप्रविष्ठ आहे. शिक्षणतज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी व अन्य तिघा जणांनी इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर आव्हान दिले होते. त्यावरील पुढील सुनावणी न्यायालयाने ३ ऑक्टोबर रोजी निश्‍चित केली आहे.

माशेल कुंभारजुव्यात सांगोडांचा जल्लोष

Story Summary: 

माशेल कुंभारजुवेचा प्रतिवार्षिक सांगोडोत्सव मांडवी नदीच्या पात्रात आनंद, उत्साह आणि जल्लोषात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

या सांगोडोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असून माशेल येथील शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिरात पूजन होत असलेल्या गणेशमूर्ती सातव्या दिवशी पालखीतून मिरवणुकीने तारीवाडा-माशेल धक्क्यापर्यंत नेली जाते. तद्नंतर कुंभारजुवेच्या महाजनांनी तयार केलेल्या दोन होड्या एकत्र बांधून तयार केलेल्या सांगोडात बसवून नदीच्या पात्रात पाच फेरे घेऊन गणेशमूर्तींचे रितसर विसर्जन केले जाते.

शिरोड्यात खून

शिरोडा-फोंडा तारीवाडा येथे परवा रात्री बाचाबाची होऊन नामदेव बाबाजी तारी (४८) यांच्यावर चाकू चालवून त्यांचा निर्घृण खून केल्याच्या आरोपावरून महेश महादेव तारी (५०) राहणार तारीवाडा शिरोडा यास फोंडा पोलिसांनी अटक केली.

आंबोली घाटातील मार्ग बंद

अमरसिंग

अमरसिंग यांची तिहार तुरुंगात रवानगी

Story Summary: 

खासदार सौदेबाजी प्रकरणी अटक; प्रकरण उघडकीस आणणार्‍या खासदारांवरही कारवाई

राज्यसभेचे खासदार व समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंग आणि भारतीय जनता पक्षाच्या दोघा माजी खासदारांना खासदार सौदेबाजी प्रकरणी काल सीबीआयकडून अटक करण्यात आली. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने त्यांची रवानगी तेरा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात केली.

जुलै २००८ मध्ये संसदेत घडलेल्या खासदार सौदेबाजीच्या प्रकरणात खासदारांची मते विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा अमरसिंग यांच्यावर आरोप आहे. अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी केलेला अर्ज न्यायालयाने काल फेटाळून लावला.

दाबोळी विमानतळावर उतरताना विमानाचा टायर फुटला

Story Summary: 

पायलटच्या प्रसंगावधानामुळे १०५ प्रवासी बचावले

कुवेतहून चेन्नईला जाणारे एअर इंडियाचे ९७६ विमान मंगळवारी सकाळी दाबोळी विमानतळावर उतरत असताना विमानाचा पुढचा टायर फुटला.

दरम्यान, पायलटने प्रसंगावधान राखून विमान ‘पार्किंग बे’मध्ये नेल्याने अनर्थ टळला. विमानात १०५ प्रवासी व ७ कर्मचारी होते.

आझिलोतील सर्व बाह्यरुग्ण विभाग नव्या इस्पितळात नेणार

Story Summary: 

जुन्या आझिलो इस्पितळातील सर्व बाह्यरुग्ण विभाग परवा शुक्रवार दि. ९ रोजीपयर्ंंत पेडे येथील नव्या जिल्हा इस्पितळात हलवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

यासंबंधी अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की नंतर स्त्रीरोग विभागासह अन्य विभागही टप्प्याटप्प्याने नव्या वास्तूत हलवण्यात येतील.

विधानसभा अधिवेशन ऑक्टोबरमध्ये लोकायुक्त विधेयक मांडणार ?

गोवा विधानसभेचे अधिवेशन पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. ते जास्तीत जास्त दोन अथवा तीन दिवसांचे असेल, अशी माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली.

अंदाजपत्रक वगैरे संमत झालेले असल्याने विधानसभेपुढे मोठे कामकाज नसेल, असे ते म्हणाले. दरम्यान, महिनाभरापूर्वी अधिवेशनासाठीची अधिसूचना काढावी लागते. ती काल काढण्यात आली.

भारत - बांगलादेशात ऐतिहासिक सीमा करार

भारत आणि बांगलादेश यांच्यात ऐतिहासिक सीमा कराराबाबत एकमत झाले आहे. या अन्वये दोन्ही देशांनी सीमा निर्धारित करण्याचे तसेच एकामेकाच्या सरहदीत असलेल्या सीमाभागातील १६२ ठिकाणांची अदलाबदली करण्याचे ठरविले आहे. मात्र तीश्ता आणि फीनी नद्यांच्या पाणीवाटपासंबंधीचा करार केला जाणार नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्‍यावर असून अनेक महत्त्वपूर्ण करार होणार आहेत.

संविधानाचे पालन झाले तर लोकपालची गरजच नाही

पणजीतील कार्यक्रमात डॉ. दिलीप देवबागकर यांची स्पष्टोक्ती

आपले संविधान आजच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यास समर्थ असून त्याचे योग्य प्रकारे पालन झाले, तर लोकपालची गरजच भासणार नाही, असे स्पष्ट मत गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी काल पणजीत एका कार्यक्रमात व्यक्त केले. कवी दादू मांद्रेकर यांच्या ‘मास्तर’ या कवितेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण डॉ. देवबागकर यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. गोवा विद्यापीठातील एक अभ्यासक डॉ. नंदकुमार कामत यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

मुंबई हल्ल्यावेळी गोव्याची सुरक्षा चिंतेचा विषय होता

राज्यपाल डॉ. सिद्धू यांचा निरोपाचा संदेश

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर हल्ला झाला तेव्हा मर्यादित पोलीस दलाच्या जोरावर गोव्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचा विषय चिंतेचा होता कारणअतिरेक्यांच्या नजरेतून गोवा संवेदनशील ठिकाण होते, असे गोव्याचे मावळते राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांनी आपल्या निरोपाच्या संदेशात म्हटले आहे.

रेल्वे वेळापत्रक कोलमडले

आणखी काही दिवस अशीच स्थिती

माध्यमप्रश्‍नी सुनावणी ३ ऑक्टोबरला

मच्छीमारी ट्रॉलर

Story Summary: 

लाटांना आव्हान : उसळत येणार्‍या लाटांवर आरुढ होत कुटबण जेटीवरून समुद्रात निघालेला मच्छीमारी ट्रॉलर. (छाया : गणादीप शेल्डेकर)

बाळ्ळीत ‘उटा’ कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

Story Summary: 

२५ मे रोजी बाळ्ळी येथे ‘उटा’च्या आंदोलनावेळी ‘आंचल’ या इमारतीला आग लावून दोघा ‘उटा’ कार्यकर्त्यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हा अन्वेषण पोलिसांनी बाळ्ळी येथील दीपक फळदेसाई व अन्य १४ जणांविरुद्ध केपे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. ‘आंचल’ इमारतीला लावलेल्या आगीत दिलीप वेळीप व मंगेश गावकर या ‘उटा’च्या दोघा कार्यकर्त्यांचे आगीत भाजून निधन झाले होते.

बाळ्ळी - वंटे येथील दीपक फळदेसाई हा या जळीतकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. ‘उटा’चे काही कार्यकर्ते ‘आंचल’ या इमारतीत दडून बसले असता इमारतीला आग लावून आत लपून बसलेल्यांना बाहेर येण्यास अटकाव करून त्यांच्या हत्या केल्याचा दीपक फळदेसाई व अन्य १४ जणांविरुद्ध आरोप ठेवण्यात आला आहे.

खाणसम्राट जनार्दन रेड्डींना अटक

Story Summary: 

सहकार्‍यांवरही कारवाई; कर्नाटकात खळबळ

केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी काल सकाळी कर्नाटकचे माजी पर्यटनमंत्री जी. जनार्दन रेड्डी तसेच त्यांचे मेहुणे व ओबुलापुरम मायनिंग कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या घरांवर छापे टाकून त्यांना ताब्यात घेतले, तर बी. श्रीरामलू या माजी मंत्र्याच्या घरावरही छापा टाकला. कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये खाणींचे साम्राज्य पसरलेल्या रेड्डी बंधूंवरील या कारवाईमुळे कर्नाटकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली गेली दोन वर्षे सुरू असलेल्या तपासकामाच्या अंती ही कारवाई करण्यात आली आहे.

सीबीआय अधिकार्‍यांनी छाप्यानंतर जी. जनार्दन रेड्डी यांना त्वरित त्यांच्याच वाहनातून हैदराबादला हलवले. फौजदारी स्वरूपाचे कटकारस्थान, भ्रष्टाचार, चोरी व अवैध खाण व्यवसायाचा आरोप रेड्डी यांच्यावर ठेवण्यात आला असून भारतीय दंड संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, भारतीय वन कायदा तसेच खाणी व खनिजे नियमन कायदा या कायद्यांखाली रेड्डी यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

ऍसिड फेकणारा सापडला मात्र मुख्य आरोपी फरार

Story Summary: 

सांतइनेज येथे ब्रायन फर्नांडिस याच्यावर ऍसिड हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अझरुद्दीन शेख (२३) (वेलिंग, म्हार्दोळ), असे असल्याची माहिती काल पणजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी देऊ बाणावलीकर यांनी दिली.

ब्रायन फर्नांडिस याला फोन करून तो धमकी देत होता. या फोन कॉल्समुळे तो जाळ्यात अडकल्याचे बाणावलीकर यांनी सांगितले. मडगाव येथे येऊन मला भेट, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तो ब्रायन याला देत होता. आपले नाव फ्रांसिस असल्याचे सांगत होता, असे बाणावलीकर यांनी सांगितले.

याच पार्श्‍वभूमीवर सांतइनेज येथे ब्रायन याच्यावर ऍसिड हल्ला झाल्याने १ ते १३ ऑगस्ट या दरम्यान ब्रायन याला जे धमकी देणारे कॉल्स येत होते त्या माणसाचाच या हल्ल्यात हात असावा असा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी सदर फोन मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो फोन लोकप्पा मडकप्पा (कारापूर-साखळी) याचा असल्याचे पोलिसांना आढळून आले.

आलेमांव व विश्‍वजितमुळे सरकारी तिजोरीस भुर्दंड

पर्रीकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप

सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यामुळे सरकारी तिजोरीचे मोठे नुकसान होऊ लागले असल्याचा आरोप काल विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेतून केला.

नाफ्ता आग : अधिकार्‍यांना अटकपूर्व जामीन नाकारला

आणखी एका जखमीचे निधन

नाफ्ता आग दुर्घटनेमुळे अटक होण्याची शक्यता असल्याने झुआरी इंडस्ट्री ऑयल टर्मिनल लिमिटेड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार केएमसीच्या अधिकार्‍यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

इफ्फीचे उद्घाटन २३ नोव्हेंबरला

इफ्फीच्या तारखेत आता किंचित बदल करण्यात आलेला असून यंदा २२ नोव्हेंबर ऐवजी २३ नोव्हेंबरपासून इफ्फी सुरू होणार आहे. मात्र, समारोप पूर्वीप्रमाणेच ३ डिसेंबर रोजी होणार असल्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी सांगितले.

कशेडी घाटात पुन्हा दरड कोसळली

भूंसंपादन विधेयकास मंत्रिमंडळाची मंजूरी

केंद्र सरकारने तयार केलेले बहुचर्चित भूसंपादन आणि पुनर्वसन विधेयक काल मंत्रिमंडळाने मंजूर केले. ते उद्या संसदेत सादर केले जाणार असल्याचे कळते.

बसच्या धडकेने युवक ठार

‘आझिलोतील वातावरण आरोग्य बिघडविणारे’

दयानंद नार्वेकर यांचे पत्र

आझिलो इस्पितळातील वातावरण रुग्णांच्या आरोग्यास हानिकारक बनले असल्याचे हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांंनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पत्र लिहून त्यांच्या निदर्शनास आणले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखून सरकारने पेडे येथील नवीन इस्पितळात आझिलोचे स्थलांतर करण्यास सुरूवात करायला हवी. इस्पितळाचे स्थलांतर झाले नाही तर पेडे येथील इस्पितळाच्या आवारात समर्थकांसमवेत उपोषणास बसेन, असा इशाराही नार्वेकर यांनी पत्रात दिला आहे. नार्वेकर यांनी भेट दिली असता इस्पितळाची जी स्थिती निदर्शनास आली ती त्यांनी पत्रात नमूद केली आहे.

कार-मोटरसायकल अपघातात तिघे जखमी

खोतीगाव अभयारण्यात शेकरूंची शिकार : तक्रारी

कुंकळ्ळीचे महान राष्ट्रभक्त डॉ. व्हेरिस्सिमो कुतिन्हो

- सुभाष भास्कर वेलिंगकर, संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोवा राज्य

गोमंतभूमीच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रांगणात गेली ७६ वर्षे तळपत राहिलेला एक प्रखर तारा निखळला. त्याला एक महिना झाला आज. डॉ. प्रा. व्हेरिस्सिमो कुतिन्हो हे त्या तळपणार्‍या तार्‍याचे नाव. डॉ. व्हेरिस्सिमो गेले ते केवळ कुंकळ्ळी, हसोळणे, वेळ्ळी, वेरोडे आणि आंबेली या ऐतिहासिक युद्धभूमीलाच नव्हे, तर राष्ट्रीय एकात्मतेच्या खर्‍याखुर्‍या संकल्पनेला तरसणार्‍या संपूर्ण गोमंतकातील देशप्रेमींना पोरके करून गेले.

विशेष संपादकीय - किती घाव पुन्हा पुन्हा?

मुंबईतील बॉम्बस्फोटमालिकेत सांडलेले निरपराधांचे रक्त वाळते न वाळते तोच काल भीषण बॉम्बस्फोटाने नवी दिल्ली हादरली. देशाच्या या राजधानीत जेथे संसद, पंतप्रधान निवास, इंडिया गेट अशी अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाणे अगदी हाकेच्या अंतरावर आहेत, अशा देशातील अत्यंत संरक्षित मानल्या जाणार्‍या ठिकाणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात भरदिवसा हा स्फोट घडवला गेला. अफजल गुरूला फाशी देऊ पाहाल, तर सर्वोच्च न्यायालयातही बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकीही या स्फोटानंतर ‘हुजी’ तथा हरकत उल जिहाद अल इस्लामीने दिलेली आहे. दहशतवादासंदर्भातील आपल्या कचखाऊ नीतीमुळेच या देशाच्या सर्वसामान्य जनतेवर असे प्राणांतिक संकट पुन्हा पुन्हा कोसळते आहे. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात नेते सुरक्षित आहेत, परंतु जनता सतत भीतीच्या सावटाखाली वावरते आहे. ज्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात काल स्फोट झाला, तेथेच चार महिन्यांपूर्वीच स्फोट झाला होता.

खरे सूत्रधार कोण?

ज्यांच्याकडे आजवर राजकीय सौदेबाज म्हणूनच पाहिले गेले, अशा अमरसिंग यांना त्याच आरोपाखाली तिहारची हवा खाण्याची पाळी यावी यात अनपेक्षित असे काही नाही. त्यांची आजवरची राजकीय कारकीर्दच अशा वाद आणि वावटळींनी खच्चून भरलेली राहिली आहे. परंतु ही कारवाई ही कदाचित अमरसिंग यांच्या राजकीय कारकिर्दीचीही इतिश्री घडवणारी ठरू शकते. समाजवादी पक्षापासून दूर गेलेल्या अमरसिंग यांना जवळ करण्यास कोणताही राजकीय पक्ष विशेष उत्सुक नाही. कॉंग्रेसशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्नही ताज्या कारवाईमुळे संपुष्टात आलेला आहे. त्यात गेले काही महिने गंभीर आजारपणाने त्यांची पाठ सोडलेली नाही. या सार्‍या परिस्थितीत एखादा भगभगता दिवा लवकर विझून जावा तसे अमरसिंग यांचे झाले आहे. घर फिरले की घरचे वासेही फिरतात म्हणतात, त्याप्रमाणे अमरसिंग यांना त्यांची आजवरची ‘फिक्सर’ ची प्रतिमा राजकारणात फार उपयुक्त ठरत असूनही या घडीस कोणी जवळ करू इच्छित नाही. अमरसिंग हे एक अजब रसायन आहे. सत्तेच्या वर्तुळात असो वा नसो, प्रसिद्धीच्या झोतात कायम राहण्याची किमया त्यांना साध्य झालेली आहे.

लोकायुक्त विधेयक हे गाजर तर नव्हे ना?

- दिलीप बोरकर

गोवा विधानसभेचे ऑक्टोबरमध्ये अधिवेशन झाले तर, त्याच अधिवेशनात नवे लोकायुक्त विधेयक मांडले जाईल, असे सूतोवाच मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले आहे. सर्वप्रथम राज्य विधानसभेचे अधिवेशन घेतले जाईल की नाही, याची पूर्ण खात्री दस्तुरखुर्द मुख्यमंत्र्यांनाच नाही, कारण विधानसभा बरखास्त करावी की ती निवडणुकीपर्यंत चालू ठेवावी हा निर्णय त्यांच्या मंत्रिमंडळाच्या हाती नाही. तरी सुद्धा कायद्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये विधानसभा अधिवेशन घ्यायलाच हवे, अथवा विधानसभा बरखास्त तरी करायला हवी! एक सोपस्कार म्हणून तरी विधानसभा अधिवेशन बोलावले जाईल असे वाटते.

ते संसार सावरा...

धाकतळे - वास्कोतील नाफ्ता दुर्घटनेने अखेर एस. एस. दास या नौदलाच्या उमद्या जवानाचा चौथा बळी घेतला. या भीषण दुर्घटनेत निराधार झालेली कुटुंबे, बेघर झालेली माणसे यांचे करुण दृश्य वास्कोवासीयांच्या नजरेतून कधी पुसले जाणे शक्य नाही. मात्र, दुर्घटना घडून आता महिना उलटायला आला, तरीही या दुर्घटनेची अंतिम जबाबदारी कोणाची यावर निर्णय होऊ शकलेला नाही आणि त्यांना शिक्षाही झालेली नाही. जुवारी - इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेड आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून या दुर्घटनेच्या जबाबदारीबाबत टोलवाटोलवीच चालली आहे. महामार्ग प्राधिकरणाने चौपदरी महामार्गाचे काम सुरू असताना खोदकाम करून नाफ्तावाहिनीचे जे नुकसान केले, त्यातूनच आग भडकली असे जुवारी कंपनीचे म्हणणे आहे, तर नाफ्ता वाहिनीचे नुकसान झालेले आहे हे कंपनीच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिलेले असताना मुरगाव बंदरातून वाहिनीतून टर्मिनलकडे नाफ्ता उतरवला गेला, असा महामार्ग प्राधिकरणाचा दावा आहे. सत्य या दोन्ही दाव्यांच्या मध्ये कोठे तरी दडलेले आहे आणि त्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या मालमत्तेचे विश्वरूप दर्शन!

- ऍड. आयरिश रॉड्रिग्ज, रायबंदर.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या आदेशाला अनुसरून केंद्रीय मंत्र्यांनी अखेर आपली मालमत्ता जाहीर केली आहे. या माहितीचा अहवाल पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर जनतेच्या माहितीसाठी आता खुला आहे. ७६ मंत्र्यांपैकी ५ मंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन केलेले नाही. त्यामध्ये विलासराव देशमुख, श्रीमती कृष्णा तीर्थ, श्रीमती जयंती नटराजन, जितेंद्र सिंग व माहितीमंत्री असलेल्या डॉ. एस्. जगत्‌रक्षण यांचा समावेश आहे. कुतूहलाची बाब म्हणजे जाहीर करण्यात आलेल्या मालमत्तेच्या तपशीलावर पंतप्रधानांसमवेत इतर कुठल्याही मंत्र्याने स्वाक्षरी केलेली नाही, हेच लक्षपूर्वक वाचनानंतर निदर्शनास येत आहे.

रेड्डी अडकले

कर्नाटकमधील अवैध खनिज व्यवहार प्रकरणात राज्याचे माजी पर्यटनमंत्री जी. जनार्दन रेड्डी आणि त्यांचे मेहुणे बी. व्ही. श्रीनिवास रेड्डी यांना सीबीआयकडून काल झालेली अटक ही एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे. लोकायुक्तांनी ठेवलेल्या ठपक्यानंतर येडीयुराप्पा यांची पदच्युती झाली, तेव्हापासून रेड्डी बंधूंभोवती दबाव वाढत चालला होता. विद्यमान मुख्यमंत्री सदानंद गौडा आपला मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या प्रयत्नात असल्याने रेड्डी बंधूंचाही मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून हालचाली सुरू होत्या. परंतु त्यांची डाळ न शिजल्याने रेड्डींचे एक समर्थक आमदार बी. श्रीरामलू यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच रेड्डी बंधूंभोवती सीबीआयने काल आपला फास आवळला. सीबीआयची कारवाई कर्नाटक सरकारच्या नव्हे, तर आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने नोंदवल्या गेलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेली आहे हे लक्षात घ्यावे लागेल. आंध्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कर्नाटकच्या बेल्लारी आणि आंध्रच्या अनंतपूर जिल्ह्यात रेड्डी बंधूंचे खाण साम्राज्य पसरलेले आहे.

दिल्ली हायकोर्टासमोर बॉम्बस्फोटात ११ ठार

केंद्रीय मंत्र्यांच्या मालमत्ता नक्की किती ?

दाबोळीत उतरताना विमानाचा टायर फुटला

कोसळलेले घर

Story Summary: 

धबधबा-डिचोली येथे कोसळलेले घर. (छाया : विशांत वझे)

कोंकण रेल्वे सुरू

Story Summary: 

पोमेंडी येथे रुळांवर आलेली चिखल माती हटविण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून केल्यानंतर काल सकाळपासून याठिकाणहून कोंकण रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली. यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.

पोमेंडी येथे मुसळधार पावसामुळे रुळांवर चिखल-माती साचली होती. ती हटविण्याच्या कामातही पावसामुळे वारंवार व्यत्यय येत होता. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती.

हेडलीच्या हस्तांतरणासाठी भारत गंभीर नव्हता?

Story Summary: 

‘विकिलिक्स’च्या गौप्यस्फोटानंतर खळबळ

२६/११च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याला भारतात आणण्याविषयी भारत सरकार खरेच गंभीर होते असे माजी संरक्षण सल्लागार एम. के. नारायणन यांनी काल स्पष्ट केले. याबाबत अमेरिकेशी काय वार्तालाप झाला ते मात्र सांगू शकत नाही असे ते म्हणाले.

हेडलीला भारतात आणण्याविषयी केंद्र सरकार गंभीर नसल्याची माहिती अमेरिकेच्या दूतावासाने वॉशिग्टनला कळविल्याचे विकिलिक्स केबलने उघड केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

मिरामार गँगवॉर गालूच्या मृत्यूमुळे पाच हल्लेखोरांवर खूनाचा गुन्हा नोंद

Story Summary: 

मिरामार येथे काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या व मृत्यूशी झुंज देत असलेल्या गालू उर्फ साल्वादोर फर्नांडिस याचे शनिवारी रात्री गोवा वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाल्याने त्याच्यावर हल्ला करणार्‍या सर्व पाचही आरोपींविरुध्द पणजी पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.

 यापूर्वी त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

आरोपींची नावे यतीन विश्‍वनाथ तिगाडे (२१), अश्रफ महम्मद शेख (१८), संदीप चक्रवर्ती शिंदे (२३), कृष्णा शिवाजी नाईक (२१) व गॉडविन मारिओ मिस्किता (१८) अशी आहेत. हे सर्व आरोपी सांताक्रुझ येथील आहेत.

तियात्र कलाकारावर ऍसिड हल्ला प्रकरणी एकास अटक

सांतइनेज येथे काही दिवसांपूर्वी ब्रायन फर्नांडिस या तियात्रिस्तावर झालेल्या ऍसिड हल्ला प्रकरणी पणजी पोलिसांनी म्हार्दोळ येथील एकाला अटक केली आहे. त्याने सुपारी घेऊन हा हल्ला केला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टीम अण्णाविरुद्ध सरकारी मोहीम आणिबाणीसारखी

नितीन गडकरी यांचे पंतप्रधानांना पत्र

केंद्र सरकारने अण्णा हजारेंच्या सहकार्‍यांविरुद्ध तसेच बाबा रामदेव यांच्याविरुद्ध सुरु केलेली मोहीम थांबवण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली असून या कारवायांमुळे आणिबाणीच्या दिवसांची आठवण येत असल्याचे नमूद केले आहे.

जिल्हा पंचायतींना अधिकारांसाठी आता न्यायालयीन लढाई

राज्यात जिल्हा पंचायती स्थापन होऊन अकरा वर्षांचा कालावधी झालेला असतानाही अजून या जिल्हा पंचायतींना गोवा सरकारने कोणतेही अधिकार बहाल न केल्याच्या पार्श्‍वभूमीवर या प्रश्‍नी पुन्हा न्यायालयात धाव घेण्याची तयारी उत्तर गोवा जिल्हा पंचायतींच्या काही सदस्यांनी चालवली आहे.

मोरजीत वाळूच्या तेंबांवर शॅक्स

पर्यटन हंगामाला अजून दोन महिन्यांचा अवधी असला तरी किनारीभागांत तयारी सुरू झाली आहेे. मोरजी गावडेवाडा समुद्र किनारी भागांत वाळूच्या तेंबावरही शॅक्स, कॉटेजीस उभारण्याचे काम सुरू झाले आहे. लाखो रुपये खर्चुन आलिशान तर्‍हेचे हे हट्‌स उभारण्यात येत आहेत. वाळूचे तेंब पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहेत मात्र त्यांना सपाट करून काहीकडे शॅक्स उभारले जातात.

धबधबा येथे घर कोसळले

काल सकाळी धबधबा येथील देवकी गावडे या महिलेचे घर जमिनदोस्त झाल्याने ५० हजारांची हानी झाली. घराची भिंत कोसळल्याने घरातील गणपतीलाही हलवावे लागले. या नैसर्गिक आपत्तीमुळे या कुटुंबावर आपत्ती कोसळली आहे. डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी काल घटनास्थळी भेट देऊन या कुटुंबाला तातडीची मदत देऊन दिलासा दिला.

वास्कोत शाळेच्या इमारतीवर वृक्ष कोसळून हानी

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जेटी सडा येथील श्री सुसेनाश्रम विद्यालयाच्या मागे असलेला जुना वृक्ष कोसळल्याने थोड्याफार प्रमाणात शाळेचे नुकसान झाले आहे.

गोवा-मुंबई महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम

बसची धडक; १ ठार

सरकारी शिक्षक दिन कार्यक्रम यंदा शुक्रवारी

विविधरूपी गणपती

- डॉ. पांडुरंग फळदेसाई

गणेशचतुर्थी किंवा चवथ हा गोमंतकीयांचा अत्यंत आवडता सण. गणपतीच्या आगमनाची चाहूल लागताच प्रत्येक गोवेकर आनंदित होतो. उत्साहाने गणपती उत्सवाच्या तयारीला लागतो. वर्षातून एकदा येणार्‍या या सणाचे कोण कौतुक असते गोमंतकीयांना.

गणपतीच्या दर्शनासाठी जो तो आतुरलेला असतो. त्याच्या आगमनासाठी आरास सजवली जाते. माटोळी बांधली जाते. देखावा कोणता करावा याची तजवीज असते. घरात गोडधोड असते. नेवर्‍या (करंज्या), लाडू, कपां, शंकरपाळे, तिखशे पोहे, शेव, चिवडा, चुरमा, मोदक, पातोळ्यो इत्यादी खाद्यपदार्थांची रेलचेल होते. मुलीबाळींना आवर्जून ‘वजें’ पाठविले जाते. दारूकामाची तयारी होते.

आधी वंदू तुज मोरया

- डॉ. सोमनाथ कोमरपंत

भारताच्या सांस्कृतिक परंपरेत प्राचीन काळापासून श्रीगणेशाचे आराध्य दैवत म्हणून आगळे-वेगळे स्थान आहे. सर्वत्र शुभकार्याचा प्रारंभ गणेशस्तवनाने करण्याचा प्रघात आहे. अध्ययनाचा आरंभ ‘श्रीगणेशाय नमः’ या शब्दांत वंदन करूनच होई. पूर्वी ही अक्षरे धूळपाटीवर गिरवली जात असत. अशा प्रकारे गणेश हे विद्येचेही दैवत मानले जाते. महाभारताच्या आदिपर्वात सांगितलेल्या कथेनुसार महाभारताची रचना करताना व्यासमुनींचा लेखक गणपती हाच होता. परंतु ही कथा आदिपर्वात मागाहून समाविष्ट केली असावी असे महाभारताच्या संशोधकांचे मत आहे.

हस्तांतरणाचा बनाव

‘विकीलिक्स’ चे बॉम्बगोळे फुटण्याचे प्रकार काही अजून थांबलेले दिसत नाहीत. ताजा बॉम्बगोळा आहे तो डेव्हीड कोलमन हेडलीसंदर्भात. अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या या दहशतवाद्याला भारतात हस्तांतरित करण्यास भारत सरकारच्या वतीने विशेष रस दाखवला गेला नव्हता असा आरोप अमेरिकी दूतावासाच्या एका गोपनीय केबलमध्ये करण्यात आलेला आहे. दूतावासांकडून अमेरिकी नेतृत्वाला पाठवल्या जाणार्‍या अशा प्रकारच्या केबलमधील मजकूर बहुधा अत्यंत विश्वासार्ह असतो व त्या मजकुरातील शब्दरचनादेखील फार विचारपूर्वक व काळजीपूर्वक केलेली असते हे लक्षात घेतले तर हेडलीसंदर्भात भारत सरकारने जनतेच्या डोळ्यांत हस्तांतरणासंदर्भात धूळफेक का केली हा प्रश्न उपस्थित होतो. भारताचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांनी भारतातील अमेरिकी राजदूत टिमोथी रोमर यांना आपले सरकार हेडलीचे ‘या वेळी’ हस्तांतरण इच्छित नाही असे कळवले होते, याचे बिंग या गोपनीय केबलने फोडले आहे. हेडलीची मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील भूमिका लक्षात घेतली, तर त्या सार्‍या कटकारस्थानाचा तो एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.

तरूण पिढीला घडवणारे खरे शिल्पकार म्हणजे शिक्षक

- नारायण विनू नाईक, मंगेशी- गोवा

शिक्षक हे कोवळ्या बालकांच्या मनावर योग्य संस्कार करून त्यांना घडवतात आणि त्यांना उद्याचे जबाबदार नागरीक बनवण्याचा प्रयत्न करतात. शिक्षकांच्या निष्ठेमुळे, त्यांच्या ज्ञानामुळे समाज निर्मिती झालेली आहे. महापुरूष निर्माण झालेले आहेत. राष्ट्रे महान बनलेली आहेत.

पावसाचा तडाखा

Story Summary: 

करासवाडा येथे घुमटीवर पडलेले झाड. (छाया : प्रणव फोटो), हरमल येथे भिंत कोसळून घराचे नुकसान. (छाया : लक्ष्मण ओटवणेकर), डिचोली येथे झाडाखाली सापडलेली स्कूटर. (छाया : विशांत वझे)

संततधार पावसाचा तडाखा

Story Summary: 

डिचोली तालुक्यात ५ घरे कोसळली, राज्यात ठिकठिकाणी पडझड, शेतकर्‍यांचीही हानी

ऐन गणेश चतुर्थीच्या उत्सवात गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.

समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून ही पर्जन्यवृष्टी आणखी काही दिवस अशीच बरसण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे राज्यभर अनेक ठिकाणी पडझड होऊन हानी झाल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

अरबी समुद्रातील वादळी स्थितीमुळे मासळीचा तुटवडा

Story Summary: 

दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केलेल्यांस करावी लागणार प्रतीक्षा

गेल्या सुमारे दहा दिवसांपासून अरबी समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती असल्याने मच्छीमारीसाठी समुद्रात जाता न आल्याने मच्छीमार व खास करून ट्रॉलरमालक हवालदिल झाले असल्याचे मांडवी फिशिंग सोसायटीचे चेअरमन मिनिनो फर्नांडिस यांनी सांगितले. शनिवारीही वादळामुळे मच्छीमारीसाठी जाता आले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, संपूर्ण श्रावण महिन्यात मासळी न खाल्लेल्या व भाद्रपदाच्या प्रारंभीही गणेश चतुर्थीमुळे मत्स्यावतारापासून दूर राहावे लागलेल्या गोमंतकीयांना दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केल्यावरही चांगली मासळी खावयास न मिळाल्याने अनेकांची निराशा झाली.

पणजीतील तो खून पूर्ववैमनस्यातून

Story Summary: 

शुक्रवारी पणजीत तौफिक अहमद (१९) या भेलपुरीच्या गाड्यावर काम करणार्‍या युवकाचा जो खून झाला होता त्याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी या खून प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोर पोलिसांच्या हाती लागले असून आरोपीला लवकरच गजांआड करण्यात येईल, असा विश्‍वास पणजी पोलिसांनी व्यक्त केला.

पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून आरोपी गोव्याबाहेर निसटण्यास यशस्वी होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

२६३ कोटींचे धनी कफलनाथ केंद्रातील सर्वांत श्रीफंत मंत्री

पंतप्रधानांची मालमत्ता फक्त पाच कोटींची

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व त्यांच्या मंत्रिमंडळ सहकार्‍यांनी आपापली मालमत्ता जाहीर केली असून केंद्रीय नागरी विकास मंत्री कमलनाथ हे सर्वांत श्रीमंत मंत्री ठरले आहेत. त्यांची संपत्ती २६३ कोटींची आहे.

रसायने वापरून फळे पिकवण्याचे सर्रास प्रकार

फळविक्रेत्यांविरुद्धच्या छाप्यांत वाढ करणार

वेळोवेळी छापे मारूनही राज्यातील अनेक फळविक्रेते फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करीत असल्याचे आढळून आले असून त्यामुळे अशा फळविक्रेत्यांविरुद्धच्या छाप्यांत वाढ करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतलेला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव १५ सप्टेंबरपासून

६वा दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव यंदा गुरुवार दि. १५ सप्टेंबरपासून गोव्यात सुरू होणार आहे. साऊथ एशियन फाऊंडेशनतर्फे आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याहस्ते होईल.

मडगाव-कारवार महामार्गावर कार-ट्रक अपघातात

दोघे जखमी

रुळांवर चिखल-माती साचल्याने कोकण रेल्वे ठप्प

कबरस्तानच्या जागेसाठी मडगावच्या मुस्लीम बांधवांची धडपड

माशेल परिसरातील प्रदर्शनीय गणपती

- आर. बी. फडते

गोमंतकीयांचा सर्वाधिक आवडता सण गणेशचतुर्थी अर्थात चवथ! भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचा जन्म झाला म्हणून शंकराने कैलास पर्वतावर जन्मोत्सव साजरा केला. गणपतीची पूजा किती प्राचीन आहे, त्याबद्दल नक्की माहिती मिळत नाही. ती अनार्य संस्कृतीतील देवता होती. आर्यांनी तिला आपल्या देवतांमध्ये स्थान दिले असावे. गणपती या शब्दाचा स्पष्ट उल्लेख ऋग्वेदात सापडतो.

साखळीच्या नाडकर्ण्यांची चवथ!

- संजीव प्रभू खानोलकर

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन म्हणजे आबालवृद्धांचा आवडता सण! प्रत्येकाच्या तोंडी ‘चवथ आयली’ असे म्हणत घरातील मंडळीची धावपळ सुरू होते. सामान, माटोळी आणणे, घर सजवणे यात कुटुंबातील प्रत्येकजण रमतो. परगावी असलेली मंडळी मोठ्या उत्साहाने आपल्या मुळगावी परततात. दीड दिवस, पाच, सात, अकरा दिवस कुटुंबातील लहानापासून थोरांपर्यंत सर्व सदस्यांना एकत्रित करणारा हा सण.

प्रत्येक शाळा ‘आदर्श’ घडवा

- सौ. ममता खानोलकर, अस्नोडा

मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्याची मती आली आणि म्हणता म्हणता प्राथमिक शिक्षणही इंग्रजीमय करण्याचे पाऊल त्यांनी उचलले. त्याच वेळी देवानेही आपले सुदर्शनचक्र गरागरा फिरवून देशी भाषाप्रेमींना जागे केले. त्यासाठी मग भारतीय भाषा सुरक्षामंच अस्तित्वात आला. ‘गोवा बंद’, क्रांती दिनादिवशीच धरणे कार्यक्रम, आंदोलने, देवांना साकडे अशा स्वरूपात विविधांगी कार्यक्रम करून सरकारला सळो की पळो करून सोडण्याचे काम केले. तरीही इंग्रजीचे भूत कमी होईना. ज्या खासगी शाळांत कोंकणी माध्यम अनुदान मिळण्यापुरते होते आणि शिक्षण मात्र इंग्रजीच्या काळ्या बाजारातूनच चालत होते, तेथे त्यावेळी पालकांनी डोळेझाक केल्यानेच आता त्यांनी लगेच हात धुवून घेतले आहेत.

भारतीय भाषांचा आग्रह

भारतात संगणक, मोबाईल आणि इंटरनेटचा प्रसार दिवसागणिक वाढत चालला आहे. मोबाईलच्या बाबतीत तर भारत ही जगातील दुसरी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे आणि सन २०१३ पर्यंत ती चीनलाही मागे टाकील असे संकेत मिळत आहेत. संगणकांपाठोपाठ लॅपटॉप, नेटबुक आणि आता आयपॅडसारख्या अनेक ‘टॅब्लेटस्’ चे आगमन भारतात झाले आहे. मोबाईलच्या बाबतीतही नवनवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठ काबीज करू लागले आहेत. नोकियाची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी अँड्रॉईड ऑपरेटिंग प्रणालीवर चालणारे शेकडो नवे फोन घेऊन प्रतिस्पर्धी बाजारात उतरलेले आहेत. ऍपलचा आयफोनही भारतात धूमधडाक्यात विकला जातो आहे. टूजी तंत्रज्ञानापाठोपाठ थ्रीजी सेवा उपलब्ध झाली आहे. या सार्‍या वेगवान घडामोडींमध्ये भारतीय भाषांचे या सार्‍या सेवांमध्ये स्थान काय हा गांभीर्याने विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. या देशामध्ये व्यावहारिक भाषा म्हणून इंग्रजीचे स्थान वादातीत असले, तरी आपापल्या भाषेतून संगणक किंवा मोबाईलवर व्यवहार करता आला तर त्याला ग्राहकांची पहिली पसंती निश्‍चितपणे असेल.

गणपतीचे विसर्जन

Story Summary: 

दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना. (छाया : नंदेश कांबळी)

कोंकण रेल्वे पुन्हा अडली

Story Summary: 

पोमेंडीत दरड कोसळणे चालूच

रत्नागिरी आणि निवसर स्थानकांदरम्यान, पोमेंडी येथे पुन्हा रुळांवर माती आणि पाणी साचल्याने काल पुन्हा कोंकण रेल्वे थांबवावी लागली. गणेशोत्सव काळात रेल्वेवर अवलंबून राहिलेल्या प्रवाशांचे यंदा बरेच हाल झाले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात दरड कोसळल्याने कोंकण रेल्वे बंद पडण्याची ही चौथी वेळ आहे.

दरम्यान, येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस चालूच राहणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन

Story Summary: 

वर्षपध्दतीप्रमाणे काल रात्री गणपती बाप्पा, मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात व फटाक्यांच्या कडकडाटात दीड दिवसाच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. गेले पाच ते सहा दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे या उत्साहावर जरा विरजण पडले.

काही कुटुंबांनी पांच ते सात दिवस उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्यात येत असल्याने त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारीही सुरू आहे.

संगीतकार श्रीनिवास खळे यांचे निधन

Story Summary: 

सहा दशकांहून अधिक काळ आपल्या सुमधूर चालींची मोहिनी रसिकांना घालणारे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे काल शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

भावगीत, अभंग, बालगीते, पोवाडा यांच्यासह संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये खळे यांनी ठसा उमटविला होता. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘ पद्मभूषण बहाल करण्यात आले होते. त्याशिवाय ‘संगीतरत्न’,‘ लता मंगेशकर पुरस्कार’ आणि जीवनगौरव पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.

तडजोड न करणारा मनस्वी संगीतकार

मराठी भावसंगीतात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणार्‍या मोजक्याच संगीतकारांमध्ये श्रीनिवास खळे यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. असे असले तरी त्यांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. तडजोड करणे त्यांच्या स्वभावात नव्हते. पैसे मिळवण्यासाठी त्यांनी कधीही काम केले नाही. मनाला आनंद देणार्‍या चालींचीच त्यांनी निर्मिती केली. मागणी तसा पुरवठा हे तत्त्वच त्यांना मान्य नव्हते. जवळपास ८० हून अधिक गायक-गायिकांनी खळेंच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणी गायली आहेत. त्यामध्ये पंडित भीमसेन जोशी, सुधीर ङ्गडके, वसंतराव देशपांडे, लतादीदी, आशाताई, सुमनताई, माणिक वर्मा, सुलोचना चव्हाण यांच्यापासून हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अरुण दाते, सुधा मल्होत्रा, सुरेश वाडकर, देवकी पंडीत, कविता कृष्णमुर्ती आणि शंकर महादेवन याच्यापर्यंत अनेक गायक-गायिकांचा समावेश आहे.

पणजीत एकाचा खून

पणजी शहरात काल एकाचा खून करण्याची घटना घडली. परवा पहाटे ४ वा. तौफिक अहमद (१९) या युवकाचा अज्ञातांनी पंप डोक्यात घालून खून केला. तौफिक हा ताळगाव येथे राहायचा व पणजीत एका भेळपुरीच्या गाडीवर काम करायचा. काल तो एका हॉटेलच्या खोलीत झोपला असता तिथे येऊन अज्ञातांनी त्याच्या डोक्यावर प्रहार केल्याने तो जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुलगी जन्मल्यास मातेला ५ हजार रुपये

मुलींच्या जन्माला उत्तेजन देण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने अनेक योजना राबविण्यास सुरुवात केली असून गोवा राज्याच्या बालक विकास व महिला कल्याण खात्याने ‘ममता’ ही नव्या योजनेची अमलबजावणी सुरू केली आहे.

नौदलाच्या ‘हंसा’ची ५० वर्षे पूर्ण

आणखी ४५ मिग विमाने नौदलाच्या ताफ्यात घेणार

भारतीय नौदलाच्या आयएनएस - हंसा या विमानवाहू जहाजाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असून गोव्यात स्थापित या जहाजाने देशाच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत महत्त्वाचे योगदान दिल्याचे जहाजाचे कमांडिंग ऑफिसर रवनीत सिंग यांनी सांगितले.

५ सप्टेंबर रोजी ‘हंसा’ सेवेची ५० वर्षे पूर्ण करणार आहे.

म्हापशात रसायनांद्वारे पिकविलेली अडीच टन केळी केली नष्ट

म्हापसा यार्डमध्ये केळी विक्रेते रसायनामध्ये केळी बुडवून पिकवत असताना म्हापसा पोलिसांनी त्यावर छापा टाकून त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवताच अडीच टन केळी त्या रसायन द्रव्यासहीत बुधवारी जप्त करण्यात आली होती. काल गणेशपुरी-म्हापसा येथील कचरा टाकण्यात येणार्‍या जागेत त्याची विल्हेवाट लावण्यात आली. केळ्यांची किंमत ५५ हजार रु. होती.

‘इंदिरा बालरथ’ योजना अडचणीत

शिक्षण खात्यात इंदिरा बालरथ योजनेखाली वाहन चालक व क्लिनरची भरती करणे लांबणीवर पडल्याने या योजनेसाठी आणलेल्या २३ बसेस खाजगी विद्यालयांना देण्याची सरकारवर पाळी आली.

पणजीत युवकाचा खून

गणेशमूर्ती

Story Summary: 

गणेशमूर्ती नेताना भाविक. (छाया : निवृत्ती शिरोडकर)

गणरायाच्या स्वागतासाठी गोमंतकीय सज्ज

Story Summary: 

आज घरोघरी श्रीगणरायांचे आगमन होणार असून असून त्यामुळे घरोघरी आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. गणेश चतुर्थीचा साजरी करण्यासाठी विविध सार्वजनिक गणेश मंडळेही सज्ज झाली आहेत.

शहरी भागातील लोक गेल्या दोन दिवसांपूर्वीच गावी गेले होते. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवसांची सुटी सरकारी कर्मचार्‍यांना असते परंतु शनिवार रविवारही मिळाल्याने वरील कर्मचार्‍यांना सलग चार दिवस सुटी मिळाल्याने उत्साह वाढला आहे.

चतुर्थीनिमित्त कदंबच्या विशेष बसगाड्या

Story Summary: 

कदंब महामंडळाने गोवा-मुंबई, गोवा कारवार, गोवा बेळगांव व गोवा-सावंतवाडी या मार्गांवर खास गणेश चतुर्थीनिमित्त सुरू केलेल्या गाड्यांमुळे भाविकांची चांगली सोय झालेली असून २७ रोजीपासून सुरू झालेल्या या गाड्यांतून मुंबईहून भाविक गर्दी करून गोव्यात येऊ लगले असल्याचे तसेच गोव्यातून मोठ्या प्रमाणात कारवारला जाऊ लागले असल्याचे कदंब महामंडळातील सूत्रानी सांगितले.

गेल्या २७ रोजीपासून मुंबई-गोवा मार्गावर दोन विशेष आरामदायी बसगाड्या सुरू करण्यात आलेल्या असून त्या पूर्ण भरून गोव्यात येऊ लागल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. गोवा मुंबई मार्गावर कदंबची एक वॉल्वो बस चालू असून भाविकांसाठी ती अपुरी पडणार असल्यानेच या दोन आरामदायी बसगाड्या सुरू करण्यात आल्या असून प्रवाशांकडून ७०० ते ९०० रु. असे तिकीट दर आकारले जात आहेत.

रसानयनांद्व्रारे केळी पिकविण्याप्रकरणी म्हापशात फळविक्रेता ताब्यात

Story Summary: 

म्हापसा मार्केट यार्डमध्ये रसायनांचा वापर करून केळी पिकविण्याचे प्रकार चालल्याच्या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर म्हापसा पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडील केळ्यांचे घड तसेच घडांनी भरलेला टेम्पोही ताब्यात घेण्यात आला.

म्हापसा यार्डात विविध प्रकारच्या फळांची विक्री होते. उत्सवाच्या दिवसांत मागणी वाढलेली असते त्यामुळे काही फळविक्रेते रसायनांचा वापर करून झटपट फळे पिकविताच असे बोलले जायचे. काल याठिकाणी एका जागृत नागरिकाला फळविक्रेत्याने केळ्यांचे घड रसायनांत बुडवून ठेवल्याचे दिसून आले.

अण्णांना डिस्चार्ज राळेगणसिद्धीला रवाना

अण्णा हजारे यांना गुरगाव येथील इस्पितळातून काल डिस्चार्ज देण्यात आला. लोकपाल विधेयकासाठी १२ दिवस उपवास केल्यामुळे त्यांना थकवा आला होता. त्यासाठी काही दिवस उपचारांकरिता त्यांना डॉ. नरेश त्रेहान यांच्या मेदांता मेडिसिटी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. डिस्चार्जनंतर ते आपल्या गावी राळेगणसिद्धीला रवाना झाले.

गोव्यात मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणार्‍या महिलेस मुंबईत अटक

मुंबईहून मुलींना गोव्यात आणून वेश्या व्यवसायात ढकलीत असल्याचा आरोप असलेल्या शाहिन पठाण (३५) हिला परवा पेडणे पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीने मुंबईत अटक करून गोव्यात आणले.

अवैध रितीने मुलींना आणणे (प्रतिबंध) कायदा १९५६च्या कलम ४, ५ व ७ खाली तिला अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार

डिचोली येथील घटना

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी डिचोली येथील एका अल्पवयीन मुलाविरुद्ध डिचोली पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.

सदर मुलगी गरोदर राहिल्यामुळे हा बलात्काराचा प्रकार उघडकीस आला. गेल्या मार्च महिन्यात सदर मुलाने आपणावर बलात्कार केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी डिचोली पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरिष मडकईकर हे तपास करीत आहेत.

समुद्रात वादळामुळे मच्छीमारी ठप्प

अरबी समुद्रात वादळ झाल्याने गेल्या चार दिवसांपासून राज्यातील मच्छीमारीवर परिणाम झाला असल्याचे मांडवी फिशिंग सोसायटीतील सूत्रांनी सांगितले.

पणजी लगतच्या मालीम जेटीवरून रोज समुद्रात ३५० ट्रॉलर्स मच्छिमारीसाठी जात असतात. मात्र, अरबी समुद्रात वादळ झालेले असल्याने गेल्या चार दिवसांपासून हे ट्रॉलर्स मच्छिमारीसाठी समुद्रात उतरू शकले नसल्याचे मांडवी फिशिंग सोसायटीतील सूत्रांनी सांगितले.

वितरित केलेले औद्योगिक महामंडळाचे भूखंड विनावापर

गोवा औद्योगिक विकास महामंडळाने वेगवेगळ्या लोकांना दिलेल्या व विनावापर पडून असलेल्या भूखंडांच्या बाबतीत सरकारच्या कृती दलाने अद्याप अहवाल न दिल्याने गोवा औद्योगिक विकास महामंडळाला या भूखंडांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेणे शक्य झालेले नाही.

फलोद्यान महामंडळाकडे ३५० अर्ज पडून

गोवा फलोद्यान महामंडळाकडे सध्या नव्या गाड्यांसाठी सुमारे ३५० अर्ज पडून असून सरकारने आर्थिक तरतूद करून मान्यता दिली तरच अर्जदारांना गाडे मिळू शकतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

ओमर अब्दुल्लांच्या टिप्पणीवरून वाद

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना वाचविण्यासाठी तामीळनाडू विधानसभेने जसा ठराव केला त्याप्रमाणे अफझल गुरुच्या संदर्भात जम्मू काश्मीर विधानसभेने ठराव संमत केला असता तर कोणी गप्प बसले असते का अशी प्रतिक्रिया ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

मातृभाषेसाठी अनोखा उपक्रम

चवथ - लहानपणीची, आजची आणि उद्याची...

- विजय प्रभू पार्सेकर देसाई, नानेरवाडा- पेडणे.

पूर्वी श्रावण महिना हा महिलांपुरताच शाकाहारी होता. सोमवार-गुरूवार सोडल्यास घरातील पुरूष मंडळी मांसाहार करीत. मात्र अनेक वेळा श्रावण महिना मघा नक्षत्रात येत असल्याने मासे मिळत नसत. साहजिकच पुरूष मंडळी सुता पुनवेची (नारळी पौर्णिमेची) वाट पाहात असत. मात्र आम्ही बालमंडळी वाट पाहात असू ती वज्याची. म्हणजेच गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी आणल्या जाणार्‍या चिकणमातीची! सुता पुनवेच्या पूर्वसंध्येला चिकणमातीचे तीन मोठे गोळे घराबाहेर अंगणात ठेवलेले बघितल्यानंतर आम्हा बालगोपाळांचा जीव ‘नेवर्‍यांत‘ पडत असे. सुतापुनवेच्या दिवशी चवाय धुवून वगैरे झाल्यानंतर मधोमध खुटा मारला जात असे. आणि त्याच दिवशी बाहेर ओसरीवर ठराविक वेळ मूर्तीकार कै. नीळकंठ चणेकर गणपती निर्मिती करीत असत. देऊळवाड्यावर त्यांची एकमेव गणेश निर्मितीची शाळा होती.

श्री संकल्प

रोजच्या चिंता, विवंचनांनी घेरलेली माणसे, महागाईने पिचलेला, दहशतवादाच्या सावटाखालील देश अशा निराशाजनक वातावरणात काही दिवसांसाठी का होईना, आनंद व उत्साहाची पखरण करीत अवतरणारा गणराया यावर्षी मात्र एका वेगळ्या, भारलेल्या वातावरणामध्ये घरोघरी प्रकटणार आहे. अण्णा हजारे यांच्या ऐतिहासिक आंदोलनाने जाग्या झालेला समाजपुरूषावर आपल्या कृपाशीर्वादाची छाया ठेवण्यासाठीच जणू तो येतो आहे. एवढ्या वर्षांत कधी नव्हे ती राष्ट्रचेतना जागी झाली आहे. ‘मी आणि माझे कुटुंब’ एवढ्यापुरते पाहात आलेला मध्यमवर्ग देशाला वेढून राहिलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आणि आपल्याला अप्रत्यक्षपणे लुटणार्‍या राजकीय नेतृत्वाविरुद्ध पेटून उठलेला गेल्या काही महिन्यांत आपण अनुभवला. देशाच्या कानाकोपर्‍यातून झालेल्या जनतेच्या या उठावाने तिरंग्याची शान अधिक वाढली. धर्म, जाती, पंथ, भाषा अशा भेदाभेदांनी समाजात फूट पाडूनच जे आपले सत्ताशकट हाकत आले, अशा राजकीय पक्षांसाठी एक धडाच अण्णांच्या नेतृत्वाखालील या जनआंदोलनाने जणू दिला.